Skip to main content

नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग १


नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग १

नारद पुराणात  देवर्षी नारदांनी केलेली आदिदेव श्रीनारायण यांची स्तुती. मूळ संस्कृतातील मी मराठीत मांडण्याचा यत्न करत आहे. सनाकादिक मुनिवराना आदिनारायण जगदीश्वर यांच्याविषयी अधिक माहिती विचारताना नारद भगवंताची स्तुती करताना वदले. ( इथे एक गोष्ट लक्षात घ्या की , ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असलेले आणि श्रीमहाविष्णूच्या सर्वात निकट भक्त असूनही त्यांची भगवंतांविषयी अजून जाणून घेण्याची जिज्ञासा दर्शवली ही अर्थातच जगत कल्याणा साठीच आहे)

जे परातत्वाच्याही पार असून ,जे प्रकाशस्वरूप परमात्मा , संपुर्ण जगताच्या अंतर्यामी वसलेले असून जगातचं कार्यकारण भाव आहेत, जे सगुणात प्रकट आणि निर्गुणात अप्रकट रुपात आहेत त्यांना माझा प्रणाम असो. जे मायारहित आहेत, ज्यांचं परमात्मा हे नाम आहे, माया ज्यांची शक्ती आहे, समस्त जगत ज्यांचं स्वरूप आहे, जे योगीजनांचे ईश्वर आहेत  जे स्वयं योगस्वरूप असून योगगम्य आहेत अश्या सर्वव्यापी भगवान श्रीविष्णुना माझा नमस्कार असो.

जे स्वतः ज्ञानस्वरूप , ज्ञानगम्य आणि ज्ञानाचा एकमेव हेतू आहेत, जे ज्ञानेश्वर , ज्ञेय, ज्ञाता तथा विज्ञानसंपत्तीस्वरूप आहेत त्या परमात्म्याला माझा प्रणाम आहे. जे ध्यानस्वरूप, ध्यानगम्य तथा ध्यानधारणा करणाऱ्या साधकांच्या पापाचा  विनाश करतात , जे ध्यानाचे ईश्वर ,  श्रेष्ठ  बुद्धीने युक्त ध्याता , ध्येयस्वरूप आहेत त्या परम ईश्वराला माझा नमस्कार असो.

सूर्य , चंद्रमा , अग्नी , ब्रम्हादी देवता , सिद्ध, यक्ष , असुर तथा नागगण हे ज्यांच्या शक्तीने युक्त झाल्यावरच काही कार्य करू शकतात, जे अजन्मा , पुराणपुरुष आणि स्तुतीचे अधीक्षक आहेत अश्या परमात्म स्वरूपाला मी सदोदीत वंदन करतो. जे ब्रम्हाजींचं रूप धारण करून सृष्टीकर्ता , विष्णुरूपात सृष्टीचं पालन आणि कल्पांती रुद्ररुप धारण करून जे संहारास प्रवृत्त होतात आणि एकर्णवाच्या जलात अक्षयवृक्षाच्या पानावर बालकासमान आपल्या चरणारविंदाचं जे रसपान करत शयन करतात त्या अजन्मा परमेश्वराला मी नित्य भजतो.

क्रमशः भाग १ समाप्त

© संकल्पना संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०९/०२/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...