Skip to main content

नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग ४ व अंतिम


नारदपुराणातील देवर्षी नारदकृत श्रीविष्णूस्तुती भाग ४ व अंतिम

  अश्या प्रकारे ज्यांच्या स्वरूपाचं गुणवर्णन अनेक विद्वान करू शकत नाहीत, त्या भगवान विष्णूंना मी  भजतो. ज्यांच्या नामाच्या मोहिमेचा पार शोधण्यात देवता, असुर आणि मनुष्य सुद्धा असमर्थ आहेत अश्या अद्वितीय भगवंताची स्तुती मी क्षुद्र जीव काय करणार. महापातकी मनुष्य ज्यांच्या नामचं स्मरण करताच पापमुक्त होतो अश्या भगवंताची स्तुती माझ्या सारख्या अल्पबुद्धिजीव कशी करू शकेल.

ज्यांच्या नामाचं कीर्तन कोणत्याही प्रकारे श्रवण केल्या नन्तर  पापी मनुष्य अत्यंत शुद्ध होतो आणि शुद्धात्मा मनुष्य मोक्षाला प्राप्त होतो. निष्पाप योगीजन आपल्या मनाला बुद्धीत स्थापित करून ज्यांचा साक्षात्कार करतात, अश्या ज्ञानस्वरूप परमेश्वराला मी शरण जातो.  सांख्ययोगी सर्व भुतांमध्ये आत्मरुपाने परिपूर्ण अश्या ज्या जरारहीत आदिदेव श्रीहरी यांचा साक्षात्कार करतात , अश्या ज्ञान स्वरूप परमेश्वराचं मी भजन करतो.

सर्व जीव ज्यांचं स्वरूप आहेत , जे स्वतः शांतस्वरूप आहेत, सर्वसाक्षी ईश्वर सहस्त्र मस्तकांनी सुशोभित आणि भावरूप आहेत, अश्या भगवान श्रीहरिना मी वंदन करतो. भूत आणि भविष्य या चराचराला व्यापून जे दशांगुळे वर आहेत अश्या जरामृत्यूरहित परमेश्वराला मी नित्य भजतो. जे सुक्ष्माहून अतिसूक्ष्म, महानाहून अत्यन्त महान आणि गुह्याहून अत्यन्त गुह्य आहेत अश्या अजन्मा परमेश्वराला मी सतत सतत प्रणाम करतो.

जे परमेश्वर ध्यान , चिंतन,  पूजन श्रवण आणि नमस्कारमात्र केल्याने जे जीवाला परम पद प्राप्त करून देतात त्या भगवान पुरुषोत्तमाला मी प्रणाम करतो.

अश्या प्रकारे त्या परम ईश्वराची देवर्षी नारदांनी केलेली स्तुती ऐकून सनकादिक अत्यन्त हर्षित झाले. त्यांच्या नेत्रातून आनंदाश्रु वाहत होते. जो मनुष्य रोज प्रातः उठून या स्तोत्राचं पठण करेल, तो पापमुक्त शुद्धचित्त होऊन अंती विष्णु लोकाला प्राप्त होईल.

इतिश्री नारदकृत श्रीविष्णुस्तुती समाप्त

© संकल्पना संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१२/०२/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...