Skip to main content

Posts

Showing posts from December, 2015

रविराज नमन

  रविराज नमन    रविराज तू आशीष दे ये लीनता बनती रहे तेरे ह्रदय मेंही सदा श्रुष्टि की धग जलती रहे ।। तू यूं सदा अंगारबन निर्माण वश चलता रहे तेरा नियम जलकर किरण बनकर यूँही आता रहे ।। तू मौन है पर तेरी जुबाँ यूँही हमें जीवित रखे तू कांप उठे और फिर ये आग तेरी शूल रखे ।।  तू शांत हो तो ठण्ड भी हमको सताने पर तुले तब तू इसे बस इकही  झलक में तापकर जलमे तुले।। तू राग है इस श्रुष्टि का जो हर समय कहता है ये जो जल  रहा  सबके लिए वो आग बन बहता रहे।।  तू है जीवन  तू ही किरण तू आग और जल भी है तू तेरे ह्रदय का प्रेम भी परिवर्तन करे हर पल ही तू।। अब ये नमन स्वीकार कर मेरा ह्रदय अंगार कर तेरी तरह हर एक प्राणी कुछ करे  यह स्वीकार कर।।                                प्रसन्न आठवले

प्रेम स्वप्न

  प्रेम स्वप्न      मी तूला जग मानिले तूही मनी हे जाणिले समजून हे सर्वस्व माझे मी तूझ्यावर वाहीले । मग काय आता बोच ही देसी मला तू  भंग हां ।।   मी तूला …….         नाही पुढे जर जायचे तर पाऊले का टाकली तूही किती माझ्यात अन मीही तूझ्यातच मग्न रे होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।। मी तूला …….   दोघे कुठे आहोत हे फासे असे का सांडले मीही तूझी आहे परी तू का मला अव्हेरले कालच्या वाटेवरी तू भेटशी मजला कधी मी तूला …….    हे मानूनी मी वाटेवरी आहे कधीची थांबलेली     मला तो शब्द आणि प्रेम ही मज का दिले ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।। मी तूला …….   मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाऊके तरीही तूझी आहे परी ही आस तू का सोडली हे शेवटी मी सांगते माझे तूझ्यातच जग सख्या ।।   मी तूला …….       कवी  : प्रसन्न आठवले 

गीत गणेशायन १

  गीत गणेशायन १     प्रेममयी मूर्ती तू शशी विलसे माथा रवीतेजची मुखमंडली बुद्धिचा दाता ओमकारा साकारा त्रिगुणांचा धाता कार्याचा आद्यची तू विघ्नांचा त्राता ।।   सूर्य चन्द्र ग्रह तारे नक्षत्रे नभी विहरति तव नामे दिन उगवे निशिकर संभ्राता अवघे भूमण्डल तू त्रिलोकी महता स्वामी तू सकलांचा मोक्षाचा दाता ।।   प्रेममयी मूर्ती …….    रत्नाचा मुकुटची तो शोभे तव माथा वकृतुण्ड श्यामवर्ण वामे करी शुण्डा तेजाची नेत्रे दो रिपु हो  भयभीता शूर्पकर्ण उच्चमती संकट संक्रांता ।।   प्रेममयी मूर्ती ……….    उदरी तू धारियले प्रमरूपे भक्ता त्यावरी तो सर्प जणू भक्तभय रक्षा तुंदिल तनु चपलचरण  करी लिलये नृत्या तव चरणी काव्य सुमन हर्षे स्विकार्ता ।।                                  प्रसन्न आठवले   

तूझे सूख

तूझे सूख    तूझे गूज मनीचे मी हे जाणलेले तू झ्या काळजाचे धुके पाहिलेले ।। मी शोधून हे कसे मांडलेले जसे जाणिवांचे थवे सांडलेले ।।   मला वाटले मी आहे सखा ग  तूझ्या भावनांना जाणेंन मी ग तरी हे तुला का न वाटे कळेना   तू झ्या अंतरी व्यंचना ही कशी ग ।   तू झे गूज ………    जिथे पोचलो तिथे हास्य आहे जिथे पाहिले तिथे बाग़ आहे तरीही कळेना अजूनी कसे ग तू झ्या अंतरी अश्रू  लाचार आहे ।।   तूझे  गूज ……….    मी शब्दातूनि काही सांगेन तरीही तूला जाण आहे उरी काय दाटे तू अजूनी मला मानसी एक स्पर्शी तू ला अंतरी का न विश्वास वाटे ।।   तूझे गूज  …….…।       मला वाटते चूक ती कालची मी बोलून गेलो नकोतेच काही उमगले मला की  तू गेलीस फिरुनी  पून्हा बोलले ना  तू वाटे न काही ।।   तूझे गूज ……   मी परकाच याची मला जाण आहे सुखाचा मी स्वप्निल अनं भास् आहे तरीही कळावे तुला हे कधी की   तू झी मैतरी जी सखे ख़ास आहे ।।   तूझे गूज    ...

नवा दिवस

    नवा दिवस    चला चला रे पून्हा नवा हां आनंदाचा दिवस उगवला प्राची वरती प्रभा उषेची घेवून आला सूर्य उगवला ।। उत्साहाचे सळसळ शिरवे संचारुन फिरी येऊ द्या रे दवात भिजल्या गवतावरचा पायाना ओलावा द्या रे ।।  पुन्हा नव्या या दिवसाची ती शक्ति घेवून जागे व्हारे पुन्हा नव्याने कामा लागा जुने कालचे सोडून द्या रे ।।  नैराश्याचे रंग गळाले जाणा गेला राजनीनाथची आता आला दिन सोन्याचा पुन्हा उगवला सवितानाथही ।।  सारे सारे काळोखाचे राज्य संपले सोडून द्यारे नव्या दिनाच्या नव्या जगाच्या गाण्या संगे ताल धरा रे ।।   कवी : प्रसन्न  आठवले    

नाते

  नाते  का मन लावू या नात्याला सागर लागेना हाताला ।। जीव नको हां गुंतू द्यावा मग पून्हा का चिंता वाहा ।। वळणावर सोडून जे नाते  पून्हा मन त्या वाटे जाते ।।  दूर दूर सुख आहे भासे फूल कुठे हा काटा  हासे ।। का उगवावा येथे पुन्हा नाते की मृगजळ ते  पुन्हा ।। वाटो कोणा काही काही  पून्हा का मी झळ सोसवी ।। या दुःखानो परतुंन या रे वाट्याचा मज हिस्सा द्या रे ।।   हां जीव कुठे  गुंतवू का नये मज   सुख असे का येऊ नये ।। कवी : प्रसन्न आठवले घेतली याक्षणी जीव हां हरखूनी  ।।

प्रतिभेचे देणे

  प्रतिभेचे देणे      मी प्रतिभेचे देणे तूजला पुन्हा मागतो शारदे तुला वन्दितो तू ला प्रार्थितो  हे गजवदना हे गणराया हरसूता मोरया आता दे मज शब्द सम्पदा माथा ठेवितो   लाख चूका घ्या उदरामाजी हे दीन घना गौरीसूता हे तू स्वामी तू जला प्रार्थियतो  विद्येचा तू धाता तू तर आद्य प्रदाता दे मज ठायी शब्दखाण ती हर हर ओमकारा  तूझ्या वीना ही वाणी मूकच मुषकवाहना शरदातिरि तूझ्या मंदिरि दास मी आहे तू झा हेदेवी तू कृपावंत हो स्फूर्ति सूधा हो जरा करुनी वंदन ठेवूनि मस्तक तव चरणी माते तूझ्या कृपेचा प्रसाद देसी विश्व तू झे भासते तू असशी तर जिंकून घेईन शब्दांची जननी आता ठेवून मस्तक पायी रुधिरार्पण करितो आता विनवूनी तू ज चरणावर एक मागणे गातो  सारे जीवन अर्पीन काव्या साठी मी  माझे  सारे जीवन अर्पीन काव्या साठी मी  माझे     कवी : प्रसन्न  आठवले 

श्रावण

    श्रावण      हिरवाळीच्या गालीच्यातून तृणपुष्पांची शाल पांघरुन जलबिंदुची चादर ओढून श्रावण आला बरसत बरसत ||   आकाशाच्या चारी दिशानी निसर्ग आपुल्या अष्ट भुजानी सोडून दिधल्या अनंत धारा श्रावण आला बरसत बरसत ||   नभो मंडळी दाटी झाली मेघांची ती गर्दी जमली वसुंधरा ही तृप्त जाहली श्रावण आला बरसत बरसत ||   ऋतुपर्व हे सुरु जाहले लगबग लगबग सारे करती दशोदिशाना हर्ष भरुनी श्रावण आला बरसत बरसत ||   आता सारे फुलले मोदे रंगांचीही झाली उधळण निसर्गातही अवघी धुंदी श्रावण आला बरसत बरसत ||     कवी : प्रसन्न आठवले 

स्वातंत्र्य

  स्वातंत्र्य      मन आज तराणे गाई तो दिन सोन्याच्या आला हां देश  गुलामी तोडून निर्वेध स्वतंत्रची झाला || त्या दिशा उजळल्या साऱ्या त्यावेळी चंद्र नभाला उच्चारव बोलत होता हां देश स्वतंत्राची झाला || बलीदाने घडली अगणित त्यासाठी लढले असतील कितीकानी प्राणही दिधले संसार उधळले असतील || रक्ताने वा रक्तावीण तरी प्रयत्न सारे फळले हे भाग्य आम्हा अर्थासह स्वातंत्र्य काय ते कळले || या देशासाठी ज्यानी गमवीले प्राणही आपुले प्राचीवर उदयासाठी रुधीरही सांडले आपुले || करू त्याना वंदन आपण करू त्याना याद सदोदीत लढले अन अमर जहाले करू त्याना याद सदोदित ||                 प्रसन्न आठवले

बेगडी देशप्रेम

बेगडी देशप्रेम आता चार दिवस देशप्रेम लावतील बिल्ले छातीला ठेवतील डीपी आइकॉन रिंगटोन मोबाइलला ।। घेतील शपथा प्रेमाच्या देशासाठी त्याग्याच्या जातील सुद्धा सियाचेनला भेटी घेतील जवानांच्या ।। आणि पुन्हा वर्षभर शांत आपल्या कामात सर्व व्यस्त घड्याळापाठी समस्त धावतील होऊन तंदुरुस्त ।। मी आणि माझ देशप्रेम मनात ठेवीन कायमच नको रिंगटोन डीपी काहीही एकदाच दाखवून द्यायच।।   कवी :  पसन्न आठवले 

मन ये गाये सरगम

मन ये गाये सरगम रिमझिम गिरे सावन या गाण्याच्या  चालीवर हे गाण लिहिलंय    मन ये गाये सरगम छेड़े सूर ये ऐसी धुन तेरेही खयालो में डूबा रहे हर पल मन ।।धृ ।। ऐसेही बेमौसम बरसे घटायुं जैसे के साजनसे मिलने चली प्रीतम आजा ना मेरे साजन लगे ना कही ये मन ।।१।। तेरेही खयालो ...... अब तो  तुम्हारी यादे है हरपल जैसेके सावन में बिजली है आँगन खींचा जाए रे हरदम तू ही मेरा कणकण ।।२।। तेरेही खयालो में .....  मूश्किल है अबतो रहना तूम्हारे बीन जैसे के मछली का मूश्किल है पानी बीन  अब ना सताना तूम जल्दी से आना तूम तेरेही खयालो में ....   कवी : प्रसन्न आठवले

पराग कथन

पराग कथन फूलाफूलातील पराग बोले जन्मच माझा पूनर्निर्मिण्या।। इतूके माझे काम असे की जन्म जगी या पुन्हा जन्मण्या ।।१।। कोणा आवडे फूल छान तर कूणा तयातील रंग आवडे ।। कुणी म्हणे हे नाजुक साजुक कुणा तयातील गंध आवडे।।२।। कुणास वाटे वेणी करुया माळू सुंदर केसातूनीया कुणास वाटे गजरा करुया घालू आणि सुंदर दिसूया ।।३।। पण हे माझे भाग्य जगी  याआनंदाला कारण मी रे कुणा मिळाले असे भाग्य जे लहान जन्मी महान मी रे ।।४।। मला लाभला असा जन्म की पुनः पुन्हा मी असा येतसे ज्या योगाने जगण्या माझ्या नवा नवा तो अर्थ येतसे।।५।। कवी : प्रसन्न आठवले

विजय गान

विजय गान   मृदुंग भंग दम्भ पर कलेश कंठ मिथ्य पर विराट पर्व पंथ पर नमामि सार्थ चेतना ।।१।। कुसुमी हस्त वज्र पर धरे धरा ये खड्ग पर चले सदा ही धर्म पर व्रजा करे निखर्व पर ।।२।। रिपू  जले ये अंगरा प्रभा जो भानु सागरा पुनः पुनः प्रहाररा प्रकट प्रतापी ये धरा ।।३।। हजार हस्त साथ है सदा तुम्हारी पाथ पर चले करे प्रताप ये तुम्हारी एक चेत पर।।४।। ध्वजा धरे विजित पर यशोहीगान जीव्ह पर चले ये खड्ग शत्रू  पर विजय तूम्हारी राह पर।।५।। कवी : प्रसन्न आठवले

आस

आस मी तूला जग मानिले तू ही मनी हे जाणिले समजून हे सर्वस्व माझे मी तू झ्यावर वाहीले ।। धृ ।। मग काय आता टोचणी  देसी मला तू भंग हां नाही पूढे जर जायचे तर पाऊल का रे टाकले ।।   तू ही किती माझ्यात अन मीही तू झ्यातच मग्न रे होते कसे ते कालचे पण स्वप्न ते का भंगले ।।१।। दोघे कूठे आहोत हे फासे असे का सांडले मीही तुझी आहे परी तू का मला अव्हेरले।। त्या कालच्या वाटेवरी तू भेटशी मजला कधी हे मानूनी वाटेवरी आहे कधीची थांबले ।।२।।  तू मला तो शब्द आणि प्रेम ही मज का दिले ते शब्द तर आहेत रे पण भावना का संपली ।। मीही तूला आता कधी भेटिन हे ना ठाउके तरीही तू झी आहेच  मी पण आस का तू सोडली ।।३।। हे शेवटी मी सांगते माझे तू झ्यातच जग सख्या पण एकदा भेटेन  ही आशा मनी या जागलेली जरी सोडले आहे मला तू एकदा येशील मागे  हीच साधीशीच माझी मागणी मी मांडलेली ।।४।। कवी : प्रसन्न आठवले