Skip to main content

कालच्या मॅचचा मला वाटलेला महतवाचा मुद्दा , जो दुर्लक्षिला गेला.


कालच्या मॅचचा मला वाटलेला महतवाचा मुद्दा , जो दुर्लक्षिला गेला.

कालच्या मॅचचा खूप महत्वाचा पैलू जो बरेच जणं दुर्लक्षित करत आहेत. त्यावर फक्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे, न्यूझीलंडचा खेळ नक्कीच उल्लेखनीय झाला यात वाद नाही. पण इंग्लंडच्या शेवटच्या जोडीने ५० व्या षटकात हव्या असलेल्या १५ रन्स केल्या हे नक्कीच क्रेडीटेबल आहेच. या गोष्टीकडे बऱ्याच क्रिकेट रसिकांचं दुर्लक्ष झालं. निदान तितकं क्रेडिट शेवटच्या जोडीला देणं गरजेचं आहे.
कोणत्याही अश्या उत्कंठावर्धक मॅच मध्ये शेवटची जोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व सर्व प्रकारच्या इतक्या दबावाखाली ६ बॉल आणि १५ रन्स हे टार्गेट पूर्ण करू शकली नाही तरी ते कदाचित फार महत्वाचं वाटलं नसतं . फार तर लोकं  म्हणाले असते कि त्यांनी प्रयत्न केला.
पण इथे तर त्यांनी १५ रन्स काढल्यामुळेच सामना बरोबरीच्या उत्कंठेला आला.

एक क्रिकेट रसिक म्हणून मला वाटलेला खूप महत्वाचा मुद्धा मांडला.. यावर मतमतांतरे असू शकतात आणि त्याचा स्वीकार आहे. 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...