Skip to main content

देवकी - १

देवकी -१

सर्व दुःखांचा अंत हा शेवटी मृत्यूत होतो.  अर्थात तोदेखील या देहातील भोगांबाबत अस म्हणता येऊ शकेल. पण अश्या भोगांच्या योगातून पळून जाण्यासाठी,   मृत्यू हे पलायनअस्त्र आहे असही म्हणता येईल, कदाचित भेकडपणा. कारण शास्त्रावचन असच सांगतं की, भोग हे निमूट भोगून नष्ट केले जावेत वा समाप्त केले जावेत.  पण या जन्मजन्मांतरीच्या बंदीवासाला काय म्हणता येईल. ना ही मृत्यू ना ही सुटका. हा फक्त भोग आहे कित्येक जन्मांच्या कर्माचा, त्यायोगे प्रारब्धातील पुंजीत जमा पापसंचयाचा, पुण्याची समस्त गंगाजळी आटून गेल्यानन्तर उरलेल्या भकास सत्याचा आणि त्यामुळे समोर हात जोडून उभ्या असलेल्या नरकवासाचा.

घोर घोर पाप जाहले असणार आपल्या हातून , अन्यथा, अन्यथा  देवकांची कन्या, राजा आता कुठले राजा , पण एकेकाळचे महाराज उग्रसेंन यांची पुतणी आणि स्वयंघोषित महाराज कंस म्हणजेच माझे प्रिय.......... ज्येष्ठ भ्राता यांची भगिनी असलेली मी, आज अशी कारावासात खितपत पडलेच नसते. इतकी लाडा कोडात वाढले होते मी. पिताश्री देवक यांच्या सात कन्यांमध्ये मी सर्वात धाकुली, अर्थातच लाडाची. दिनाचा  कित्येक काळ मी खाली उतरलेली आठवत नाही असं मातेने सांगितलेलं आठवतंय.

कारण चार ज्येष्ठ भ्राता आणि त्यानंतर सहा ज्येष्ठ सख्ख्या व पाच चुलत भगिनी यानंतर माझा जन्म. म्हणजे मला लाड करायला माता, पिता, सर्व भ्राता, भगिनी  , अर्थात माझे सख्खे चार आणि चुलत नऊ. यामुळे आणि मी सर्वात कनिष्ठ, त्यामुळे असेल पण माझे इतके लाड झाले तितके क्वचितच कोणाचे झाले असतील.

त्यात आमचा कुकर वंशीय राजपरिवार. मथुरेचे अनेक वर्षांचे राजे आम्ही. याकारणे तर माझं कौतुक अजूनच व्हायचं. मागेल ते मला मिळायचं. अर्थात मिळत होतं त्यापेक्षाही समाधानी हा माझा स्वभावविशेष मातेला प्रथमपासून स्मरत असल्याचे ती सांगते. त्यानुसार  मी विशेष हटवाद केल्याचे तिलाही आठवत नाही. कदाचित यामुळे देखील मला उचलून घेण्यासाठी अहमहिका अर्थातच चढाओढ असे.

कित्येकदा मातेने मला काही काही प्रहर आणि क्वचित दिनसुद्धा न पाहिल्याचं ती अगदी कौतुके सांगत असे. अर्थात यात अनेकदा गोड विवाददेखील होत असत,  कधी दोनही माता आणि इतर भावंडं यांत प्रत्येकजण आवर्जून सांगे की, मला देवकीला कधीही घेता आलं नाही अनेक अनेक मास. यात विवादापेक्षाही कौतुक भाव जास्त ओसंडे प्रत्येकाच्या बोलण्यात, हा भाग वेगळा.

अश्यातच पिताश्रीनी आणि काकश्रीनी मिळून माझा विवाह
यादवांचे राजे

भाग १ समाप्त .......
क्रमशः

© संकल्पना मांडणी व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...