Skip to main content

जानकी पुनःवनवास १

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास १

एका नाजूक विषयाला हात घालून त्यावर आधारित कथाप्रवाह लिहावा अस काही दिवस मनात होत. त्याच अनुशंगाने वाचन करताना एक गोष्ट आढळली की यावर फार काही लेखन झालेल नाहीये. विषय गंभीर आहे. पण त्यातील नाट्य , भाव, मनोविष्कार , भावनांचे आंदोलन, आणि यातील प्रत्येक पात्राचा स्वतःचा दृष्टिकोण , स्वतःचे भाव, स्वतःच्या भावना , मनातील स्थित्यंतरं , संवाद  जर झालेच असतील तर त्यांचं आदानप्रदान , प्रतिसाद मनात आलेले विचार. यातील सर्वच व्यक्तिमत्व उच्च दर्जाची, जाणती आणि कमितकमी प्रतिसादात जास्तीत जास्त भाव प्रकट करणारी अथवा कधी कधी प्रतिक्रियेशिवाय भाव आक्रसुन प्रकट वा अंतर्गत चिंतन करणारी आहेत . याच गोष्टीने माझ्यातल्या लेखकाला आव्हान दिल आणि आवाहन केल. म्हणून हा प्रपंच हाती घेण्याचा निश्चय केला.

विषय खुप गहन आहे गूढ आहे आणि खुप कमी साहित्य उपलब्ध आहे. यातील कथावस्तु ही मानवी रूपातील अलौकिक माणसांची असल्यामुळे कोणत्याही व्यक्तित्वाच्या प्रतिमेला धक्का न लागता लेखन करण्याचा पूर्ण निर्धार आहे. पण नाटयरूपान्तरण करताना विषयाच्या संदर्भात स्वैरता आणि काल्पनिक संवादांचा वापर व उपयोग फक्त कथेतले भाव पूर्ण रूपाने प्रकट व्हावेत या हेतुनेच केला आहे.

हे सर्व विस्ताराने लिहिण्या मागचे प्रयोजन वाचकानी वरील सर्व बाबी विचारात व ध्यानात घ्याव्यात .

आता इतकं सगळ लिहिल्यानंतर मुख्य विषयाची ओळख करून देतो. या लेख वा नाट्यरूपांतरणासाठी निवडलेला विषय :

श्रीराम व जानकी चौदा वर्ष वनवास संपवून रावण मर्दन करून , सीतामाई अग्निपरीक्षा देऊन  आणि विभिषणाला राज्य देऊन पुन्हा आयोध्येला आलेले आहेत.  स्वागताला सम्पूर्ण अयोध्या सज्ज आहे.बंधु भरत व शत्रुघ्न आणि तिन्ही माता ज्या क्षणाची गेली १४ वर्षे आतुरतेने वाट बघत आहेत तो क्षण जवळ आलाय.

प्रत्येकाच्या चेहऱ्यावर १४ वर्षानंतर प्रथमच अलौकिक आनंद दिसतोय, जणु स्वर्गसुख प्राप्त झाल्यासारखा. सर्व नगरी , सर्व राज्य गुढयातोरण , पताका, ध्वज, यानी सज्ज आहे. सगळीकडे मंगलवादयाचा जयघोष , सनई चौघडे, यांचा निनाद चालू आहे. सर्व प्रजाजन नाच , गाणी यात मग्न आहेत. विजयाचा जल्लोष तर आहेच पण प्रभुराम सीतामाईसह लक्ष्मण हनुमान यांसह परत येत आहेत हा आनंद, हर्ष, उल्हास ओसंडून वाहात आहे. नगराची आणि राज्याची शोभा स्वर्गालाही लाजवेल अशी आहे. दृष्ट लागण्यासारखी.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२७/११/२०१७

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...