Skip to main content

सुखाचा शोध - २

ll ॐ  ll. श्री गणेशाय नमः ll

सुखाचा शोध  -  २
.
आदिमानव ही संकल्पना पुराण काळात कुठेही उल्लेखित नाही. ही संकल्पना वा शोध हा पाश्च्यात्य देशातून आला. अर्थात त्या मागे संशोधन आहे, अभ्यास आहे, हे नककीच. पण हिन्दू संस्कृतित सर्व लिखाण हे माणूस पुढारल्यानन्तर आहे. किंबहुना आपण मागासलेले असु ही संकल्पना आपल्या कोणत्याही लिखाणात आढळत नाही.

तरीही उपलब्ध ज्ञानावरुन अस म्हणता येईल की माणूस हा कधीतरी आदिमानव होता. मग तिथून सुरवात केली तर हेच लक्षात येईल की प्राण्यापासुन वेगळा होत होत माणसाला स्वतःच वेगळ अस्तित्व ,ओळख, वा व्यक्तित्व सापडल आणि तिथे मानवाची प्रगति सुरु झाली असावी. पण ही वाट वाटते तितकी सुलभ नककीच नसणार. तरीही भाव, भावना आणि ते व्यक्त करण्याची माध्यमं माणसाला गवसलि अथवा लक्षात आली , तेंव्हाच प्रगतीला सुरवात झाली.

प्रथम दुःख काय झाल असेल, ते लक्षात कस आल असेल, त्याहुन महत्वाच ते घडू नये म्हणून प्रयास, अथवा का घडल यांच् आश्चर्य, अघटित घडलय याची जाणीवया सर्व गोष्टीत अनेक प्रश्नांची उत्तर दडली आहेत. एक कल्पना करू की दोन आदिमानव एकत्र फिरत आहेत. या दरम्यान दोघांपैकी एकाला लागल,खरचटल अथवा इजा झाली. ती त्याने कशी व्यक्त केली असेल. आपण आज इतके प्रगत आहोत की , याची कल्पना करण सुद्धा मुश्किल आहे. तरीही विचार केला की लक्षात येत  की, वेदनेची जाणीव हे पाहिले भाव असु शकतात. एक अनुमान.

हाच विचार पुढे नेऊ पुढच्या भागात. आज इथेच थांबु.

© संकल्पना आणि लेखन प्रसन्न आठवले
०१/११/२०१७
शुभंभवतु

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...