ll ॐ ll. श्री गणेशाय नमः ll
सुखाचा शोध - २
.
आदिमानव ही संकल्पना पुराण काळात कुठेही उल्लेखित नाही. ही संकल्पना वा शोध हा पाश्च्यात्य देशातून आला. अर्थात त्या मागे संशोधन आहे, अभ्यास आहे, हे नककीच. पण हिन्दू संस्कृतित सर्व लिखाण हे माणूस पुढारल्यानन्तर आहे. किंबहुना आपण मागासलेले असु ही संकल्पना आपल्या कोणत्याही लिखाणात आढळत नाही.
तरीही उपलब्ध ज्ञानावरुन अस म्हणता येईल की माणूस हा कधीतरी आदिमानव होता. मग तिथून सुरवात केली तर हेच लक्षात येईल की प्राण्यापासुन वेगळा होत होत माणसाला स्वतःच वेगळ अस्तित्व ,ओळख, वा व्यक्तित्व सापडल आणि तिथे मानवाची प्रगति सुरु झाली असावी. पण ही वाट वाटते तितकी सुलभ नककीच नसणार. तरीही भाव, भावना आणि ते व्यक्त करण्याची माध्यमं माणसाला गवसलि अथवा लक्षात आली , तेंव्हाच प्रगतीला सुरवात झाली.
प्रथम दुःख काय झाल असेल, ते लक्षात कस आल असेल, त्याहुन महत्वाच ते घडू नये म्हणून प्रयास, अथवा का घडल यांच् आश्चर्य, अघटित घडलय याची जाणीवया सर्व गोष्टीत अनेक प्रश्नांची उत्तर दडली आहेत. एक कल्पना करू की दोन आदिमानव एकत्र फिरत आहेत. या दरम्यान दोघांपैकी एकाला लागल,खरचटल अथवा इजा झाली. ती त्याने कशी व्यक्त केली असेल. आपण आज इतके प्रगत आहोत की , याची कल्पना करण सुद्धा मुश्किल आहे. तरीही विचार केला की लक्षात येत की, वेदनेची जाणीव हे पाहिले भाव असु शकतात. एक अनुमान.
हाच विचार पुढे नेऊ पुढच्या भागात. आज इथेच थांबु.
© संकल्पना आणि लेखन प्रसन्न आठवले
०१/११/२०१७
शुभंभवतु
Comments
Post a Comment