Skip to main content

Posts

Showing posts from December, 2022

खरी श्रद्धा !! (बोधकथा) - १

खरी श्रद्धा !!  (बोधकथा) - १ श्रद्धा जर 100% असेल तर शंका  मनात येणारच नाही जिथे शंका आहे तिथे श्रद्धा अशक्त असते. मला एक वाचलेली गोष्ट आठवते. त्यानंतर माझा मुद्दा कळेल. एकदा एका दुष्काळग्रस्त गावात, एक साधू आले. त्यांनी सांगितलं की, उद्या देवळात आपण प्रार्थना करूया. त्या प्रार्थनेनंतर या गावात मुसळधार पाऊस पडेल. गावा तील सर्व लोक देवळात, रात्री, जमा झाले. त्या साधूने सुरवातीला एकच प्रश्न केला की, आपल्यापैकी  कोणी कोणी छत्री आणली आहे?. कारण प्रार्थनेनंतर पडणाऱ्या मुसळधार पावसात छत्री नसेल तर, घरी कसं जाणार. यावर गर्दीतून फक्त एकच हात वर आला. त्या एकाच माणसाने छत्री आणली होती.  त्यावर साधू म्हणाला की, या गावात एकच खरा श्रद्धाळू आहे. कारण त्याला पूर्ण विश्वास वाटतो आहे की, प्रार्थने नंतर पाऊस येणारच. पण तुम्ही बाकी सर्वजण, या विचारानेच आला आहात की, जाऊन तर बघू. अश्या शंकेखोर वृत्तीने, फक्त बघायला आला आहात, प्रार्थनेसाठी नाही. मला विश्वास आहे या गोष्टी नंतर, तुम्हाला एकतर शंका येतील किंवा श्रद्धा. कारण शंका आणि श्रद्धा एकत्र राहू शकत नाहीत. © संकल्पना व लेखन : प्रसन्न आ...

आध्यात्म विराम ७

आध्यात्म विराम ७ कर्मगतीच्या भोगात व उपभोगात जीव आपला मार्ग, गती, स्थिती आणि स्थान यातील काहीही जाणत नाही. सर्वसामान्यपणे या विश्वातील किंवा या भूलोकीचे जीव, आपल्या आजच्या स्थितीला,भोग, उपभोग यांना जाणतो आणि मन बुद्धी याद्वारे त्यांचेच चिंतन, चिरंतन करतो. ह्याला आत्मकेंद्री जीव म्हणातात. पण ही आत्म केंद्रित वृत्ती, जीवाला भोगातून बाहेर पडून उपभोगांना प्राप्त करण्याकडे नेण्याचा प्रयत्न करते. ही बुद्धी व वृत्ती, अनंत काळ याच भूतलावर भोग व उपभोग यांच्या चक्रात, जीवाला गुंतवून ठेवते. देह, बुद्धी, मन व वाचा, याच आत्मकेंद्रित वृत्तीतून कर्म करतात. प्रत्येक जन्मात, देह सोडताना, हेच संचित घेऊन, आत्मा व मनोमय कोष, आपला पुढील प्रवास सुरू करतात.   अनंताकडून अनंताकडे नेणारा हा प्रवास असतो. यामध्ये फक्त आणि फक्त, आज भोगत असलेले भोग,जीवाला ग्रासतात आणि इतर जनांना प्राप्त झालेले किंवा होणारे उपभोग, मनाला व्यथित, क्षतिग्रस्त, प्रेरित, उद्युक्त करून कर्मरत ठेवतात.  इथे होणारी जीवाची तगमग, तळमळ, अतृप्त इच्छा, अतृप्त भावना या अनिष्ट आणि इष्ट मार्गाकडे नेणाऱ्या असतात. परंतु सर्वसामान्य जीव, यात...

आध्यात्म विराम ६

आध्यात्म विराम ६  म्हणजेच ईश्वरी व्यवस्थेत, मानवी व्यवस्थेच्या एकदम विरुद्ध तत्व असतं. कमी प्रगत, कच्च्या विद्यार्थ्यांना ईश्वर किंवा ईश्वरी व्यवस्था विशेष सहाय्य करते. यामधे जे अज्ञानापोटी मागे आहेत किंवा ज्यांना नित्य कर्म करत असल्यामुळे, मागील अनेक जन्मात गती मिळाली नाही अश्या जीवांना ईश्वर विशेष सहाय्य करून, पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. हे सहाय्य अर्थातच, त्यांची कर्मफल गती सुधारून, पुढे जाण्याचा मार्ग सुकर व्हावा, इतकेच केले जाते.  अनुत्तीर्ण किंवा कमी टक्केवारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना, ज्याप्रमाणे उत्तीर्ण होण्यासाठी व्यवस्था करावी, त्या स्वरूपाचे, हे सहाय्य असते. परंतु यामधील विशेष गुह्य, जे ईश्वरी व्यवस्थेचे खास वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे, जे विद्यार्थी, जाणीवपूर्वक, विकारवश, मोह, लोभ यांनी मदांध होऊन, स्वार्थात बुडून, अहंकारग्रस्त, सत्ता, पैसा, अधर्म यांच्या अधिपत्याखाली,अनितीपूर्वक, दुर्व्यवहार, दुराचार, भ्रष्ट आचार करतात, त्या जीवांच्या अधोगतीची जबाबदारी, कर्माफळाचे भोग, हे त्या जीवांच्या पुढील दुर्दशेला कारणीभूत असेल. अश्या दुर्जन जीवांना सुद्धा, सुधारण्याची संधी, ई...

आध्यात्म विराम ५

आध्यात्म विराम ५ (नवीन लेखमाला) कालच्या विषयात पुढे जाताना, अजून थोडं खोलात जाऊया. काही जीव, हे आत्ममार्गात, अग्रेसर आहेत, हे ईश्वर किंवा ईश्वरी अंश जाणत असतात. अश्या जीवांच्या मार्गात आलेली, दुःखे, संकटं, अडथळे, अडचणी हे त्यांच्या आत्मिक प्रगतीतील पायऱ्या आहेत, हे ईश्वरी व्यवस्था जाणून असते. असे देहधारी जीव, त्यातून यशस्वी पणे जाण्यास सक्षम असतात. म्हणून अश्या जीवांना,सहाय्याची आवश्यकता नाही, याची जाण सद्गुरुना असते.  म्हणूनच, सद्गुरू त्यांना सहाय्यार्थ क्वचित येतात. असे जीव अनेकदा म्हणताना आढळतात की, मला कधीही देव सहाय्य करायला येत नाही. पण हे अर्धसत्य आहे, याची त्यांना त्यावेळी, जाण नसते. उरलेलं अर्धसत्य हे आहे की ईश्वर, ब्रम्हांडातील प्रत्येक जीवाप्रमाणेच, यांच्याही पाठीशी असतोच. पण फक्त साक्षी असतो. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत त्यांना आवश्यक तितकेच सहाय्य, ईश्वर आपल्या अंशरुपात करतोच करतो, हे निर्विवाद सत्य आहे .  पण आपण स्वतः आत्म् मार्गात नक्की कोणत्या स्थितीला व स्थानावर आहोत, हे असे जीव जाणत नसल्यामुळे, त्यांना, या क्वचित सहाय्याची कल्पना येत नाही. परंतु तरीही, त्यां...

आध्यात्म विराम ४

आध्यात्म विराम ४ (नवीन लेखमाला) कालचाच विषय पुढे नेऊ. याच कारणाने असे खरे संत, साधू वा महाराज आणि स्वामी आपल्या भक्तांना वा साधकांना किंवा त्यांच्याकडे आलेल्या सामान्य जनांना, इतकी कृपा कधीच करत नाहीत, ज्यायोगे, तो जीव, प्रपंचात, कर्मसागरात हरवून जाईल आणि मूळ उद्देशा पासून इतका दूर जाईल की, तो भवसागरात, बुडून जाईल.  असे ज्ञानी जन, आपल्या सद्गुरू रूप अधिकारात, इतकीच कृपा करतात की, भक्त वा साधक, निराशेने, दुःखातिरेकाने, आत्मवंचनेने मार्गभ्रष्ट न होता, मार्गात राहतील. एकदा सदर जीव मार्गात राहिला की, प्रारब्ध, संचित आणि उत्तम कर्म योगाने, तो पुढे जात राहील. ही कृपेची पद्धती अद्भुत असते. सद्गुरू सर्वज्ञानी असल्या कारणाने, कधी कधी कृपा वा सहाय्य न करण्यात सुद्धा, साधकाचं हित आहे, हे जाणल्यामुळे, अशी कृपा न करण्याचा मार्ग सुद्धा अश्या ज्ञानी जनांकडून योजला जातो काही उदाहरणं घेऊ म्हणजे मुद्दा समजेल आणि पुढे जाता येईल. आपण दुःखातून, वाईट परिस्थितीतून, आयुष्यातील अत्यंत कमजोर काळातून जात असताना. सद्गुरू आपल्या ज्ञानाची, धैर्याची, चिकाटीची, स्थिरतेची परीक्षा पाहताना, कृपा न करण्याचा निर्णय घे...

आध्यात्म विराम ३

आध्यात्म विराम ३ (नवीन लेखमाला) वाटेत निर्माण झालेल्या निसर्ग निर्मित गोष्टी, मानवाने निर्माण केलेल्या गोष्टी या सर्वात आपण रस्ता चालत होतो आणि आपल्याला पुढे जायचं आहे, हेच जीव विसरून गेले. मार्ग चुकला, मार्गभ्रष्ट, ध्येयभ्रष्ट झालेला जीव, आहे त्या कार्यात, कर्मात, संतुष्टता मानून, त्यातच येथेच्छ रमणारा जीव, कधी कर्मफल मार्गाचा वाटसरू होतो, हे त्या जीवाला जाणवत नाही, समजत नाही, उमजत नाही.  आपण का कुठे आणि कशासाठी आलो आहोत, कुठे जायचं आहे हा मूळ उद्देश व ध्येयच विसरलं गेल्या कारणाने, कोणत्या मार्गाने जाण्यासाठी आपण निघालो होतो किंवा आपल्या मूळ पुरुषाला, निर्मात्याने सांगून पाठवलं होतं, तो उद्देश वा ध्येय वाहून गेल्यामुळे, पुढील कोणत्याही पिढीला, त्या गोष्टीचं भान राहिलं नाही. इथे एक माकडांची गोष्ट किंवा व्हिडिओ क्लिप बघितलेली आठवते.  एका पिंजऱ्यात काही माकड ठेवण्यात आली आणि उंचावर केळीचा घड. एक शिडी ठेवलेली होती, त्या घडाकडे पोचण्यासाठी. ज्या ज्यावेळी एक माकड वर जाई, त्यावेळेला इतर मकडांवर पाणी मारलं जाई. ती माकडं, पाहिल्या माकडाला, वर जाण्यापासून अडवत असत. त्यानंतर आळीपाळीने म...

आध्यात्म विराम २

आध्यात्म विराम २ (नवीन लेखमाला) अंतराळातून किंवा ब्रम्हांडातून येणाऱ्या ईश्वरी किंवा सर्व प्रकारच्या संदेशांच्या प्राप्तीची व्यवस्था अर्थात reception system, त्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था अर्थात processing mechanism, त्यानंतर पृथक्करणाची व्यवस्था अर्थात analysing methods आणि निष्कर्ष, अनुमान व निर्णय घेण्याची व्यवस्था अर्थात conclusion and decision making abilities ही सर्व व्यवस्था, या एका देहात इंद्रिय, बुद्धी व मनरुपात निर्माण करणारा ईश्वर, खरतर किती महान वैज्ञानिक, सर्वज्ञ, शक्तिमान असला पाहिजे, याची कल्पना व जाणीव, काही असाधारण जीवांना, संत सज्जन, ऋषीमुनी यांच्या देहात प्राप्त होते. कारण शेवटी मानवी देह हाच शेवटचा टप्पा आणि एकमेव आशास्थान आहे.  खरतर हे सर्व विज्ञान आहे आणि ही सर्व व्यवस्था आधुनिक विज्ञानातील वेगवेगळ्या आविष्कारात आपण आता पाहतो. पण मग त्या विधात्याला प्राप्त करण्याची काय गरज आहे. हे जन्मोजन्मीची कर्म व्यवस्था सांभाळत मनुष्य जगतात ये जा करत राहू शकतो. भक्तिमार्ग, योगयागमार्ग, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग, या सर्व मार्गांचं ज्ञान स्वतः नियंत्याने, जगाला का दिलं. ...

आध्यात्म विराम १

आध्यात्म विराम १ (नवीन लेखमाला) भोग आणि ईश्वर या लेखमालेच्या माध्यमातून, भोग, उपभोग, मन, बुद्धि, देह यांचा व्यापार, समस्या आणि समाधान, यांचा उहापोह केल्यानंतर, आता पुढील टप्प्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. भोग आणि ईश्वर या पहिल्या पायरीवर स्थिरावून, विचार केल्यानंतर आता मोक्ष, मुक्ती या प्रवासात पुढील पायरीवर, काही काळ विश्राम अर्थात विराम करून चिंतन करूया. माझे सद्गुरू, श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज, यांच्या कृपाप्रसादाने, आता या विषयावर काही काळ लिखाण करून, मग पुढे जाऊया, अशी इच्छा उत्पन्न झाली आहे. म्हणून विषयाला सुरुवात करूया.  देहाचं असणं आणि देहातीत असणं, यातील भेद, देहातील जीव, देह सोडल्यापश्चात जाणतो. अर्थात तेंव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणूनच कोणतीही गोष्ट, कर्म, धर्म, भोग आणि उपभोग, हे देह असेतोवर, साध्य करून घ्यावं. अनेक धर्मग्रंथ, धर्मशास्त्र, धर्मज्ञान, पुराणं, वेद, संत साधू, सज्जन हेच सांगून गेले आहेत . सर्वच महानतम ज्ञानी जनांनी, हेच सांगण्यासाठी जन्म खर्ची घातले. कारण, देह सोडण्यापश्चात जे समजतं, जाणवतं, उपजतं, ते त्यांना, देहात असताना समजलेलं असतं. ते त्यांच...

भोग आणि ईश्वर ६२६

भोग आणि ईश्वर ६२६   सुखाची प्रत्येकाची व्याख्या ही, वेगवेगळी असते. अगदी एका व्यक्तीच्या बाबतीत सुद्धा ती काळानुरूप बदलती असते. उदाहरणार्थ, सामान्य परिस्थितीत व्यक्तीच्या अपेक्षांची उंची मर्यादित असते किंवा असू शकते. स्वप्न आणि वास्तव यातील भेद, परिस्थिती जाणत असलेलं मन, ओळखत असल्यामुळे, अपेक्षा मोघम असतात, पण स्वप्न वेगळी आणि मोठी असू शकतात. त्यांच्या पूर्ततेसाठी, मनुष्य अनेक खटपटी लटपटी करत असतो. किंबहुना सांसारिक जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. जीवनात अनेक बदलातून जाताना, अनेकविध चढउतार पाहताना, शिखर आणि पायथा, या दोन्हींचा अनुभव घेत घेत पुढे जावचं लागतं. मन हे सर्व स्थितीत तितकच अविरत पुढे जात राहील, असं होत नाही. याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे, मनाची चंचलता.  ही चंचलता लवचिकता ते अती स्थिरता या दोन टोकां पर्यंत ताणली जाते. काही मनं पटकन परिस्थितीचा आलेख जाणून, त्यानुसार बदलून, पुढे जातात अर्थात adjust होतात. पण ही elasticity गरजेप्रमाणे असेल तर, योग्य असते आणि प्रसंगी परिस्थितीला वळवण्याची ताकद निर्माण करू शकते. पण ही लवचिकता फक्त परिस्थिती नुसार वळण्यापुरती असेल, तर माणूस...