Skip to main content

अभद्र युतींचा इतिहास आणि काँग्रेस !!


अभद्र युतींचा इतिहास आणि काँग्रेस !!

एकूणच काँग्रेसचा गतइतिहास आणि आघाडीतील सम विचारी पक्ष सोडून इतरांशी केलेल्या युती यांचा अभ्यास केला तर त्यांनी अश्या युतींचा उपयोग आपलं अस्तित्व, वैभव वाढवून अश्या अभद्र युतीतील भागीदार पक्षाचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच केला आहे. म्हणून साधारण सहा महिन्यात या अभद्र युतीचा चोथा होऊन सेनेला लोटा मिळणार हे नक्की.

गत इतिहासात दोन मोठी उदाहरणं आहेत एक चौधरी चरणसिंग आणि चंद्रशेखर. त्यातील चरणसिंग यांना तर बहुमत सिद्धही करू न देता लगेचच पाठिंबा काढून त्यांना औटघटकेचं पद मिळवून दिलं. उद्देश एकच, जनता पक्ष फोडणे. चंद्रशेखरांना दिलेला पाठिंबा एका क्षुल्लक कारणावरून काढून घेतला. त्यांचा उपयोग व्ही पी सिंग यांचा जनता दल पक्ष संपवणे यासाठी केला गेला. इतिहासानुसार आजघडीला दोन्ही पक्षांनी शकलं शकलं झाली आणि जनता पक्ष तर पूर्ण संपला.

काँग्रेस हा पक्ष याही वेळी या युतीचा उपयोग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच करेल. पण ते हे देखील जाणतात की, जितका जास्त काळ सेना सत्तेत राहील तितकी त्यांच्या इतर राज्यातील मतांवर परिणाम होतील. एकमात्र नक्की , जितका वेळ ही अभद्र युती टिकेल , तितका काळ तिघेही आपली अनेक वर्षांची भूक भागवण्यासाठी करतील. अर्थातच त्याचा राज्याच्या तिजोरीला आणि पर्यायाने जनतेला त्रास होणार हे निश्चित.

असो आता सेनेनेच आपलं अस्तित्व व्यक्तिगत महत्वाकांक्षेपायी पणाला लावायचं ठरवून , इतक्या जुन्या युतीचा त्याग करायचं ठरवलं असेल तर त्याला कोण काय करणार !

बाकी देखते रहो. पण सहा महिन्यांच्या आत निवडणुकीला तयार रहा. कारण काँग्रेसचा इतिहास यास साक्षी आहे.

©® प्रसन्न आठवले
११/११/२०१९




Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...