Skip to main content

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७
llश्रीगणेशाय नमःll
    llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll
 
विद्येचे , वाङ्मयाचे , शब्दांचे , बुद्धीचे दैवत श्रीगजानन आणि देवी श्रीशारदा यांना सादर वंदन. परमपावन, मंगलमय, जगतकारण आणि जगतपालक भगवान श्रीकृष्ण यांना प्रणिपात. माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी माझ्या अल्पमतीतुन हे कार्य करवून घेण्याचे योजिले आहे त्यांनाही साष्टांग दंडवत. 

हे तिन्ही लोकांतील देव ऋषी, गुरूवर आपण स्वये येऊन माझ्या लेखणीत अध्यात्मिक रसनिष्पत्ती करावी. त्यायोगे श्रोते व वाचक यांचे नेत्र व कर्ण तृप्तीप्रत न्यावेत. पण त्यातील तृप्तता पुढील वाचनाची अतृप्ती वा अभिलाषा जागृत करेल हे सुद्धा योजावे, ही नम्र प्रार्थना. ज्यायोगे आपले अस्तित्व आणि  या कथेतील आपलाही सहभाग, कथेच्या संपूर्ण यात्रेत, निश्चित राहील आणि वाचकांना यातील शब्द, अर्थ, गहनार्थ, काव्यात नाथांनी मांडलेली अद्भुतता, रसाळता यांचे यथार्थ दर्शन या गद्य प्रवासात  प्राप्त होईल. 

हे काव्य वाचताना नाथांचा एक एक शब्द किती अनमोल आहे याचा प्रत्यय पदोपदी येतोच. पण त्याचा अंशमात्र मला माझ्या वाचकांच्या नेत्रमार्गे हृदयापर्यंत पोहोचवता  येवो हीच मनोकामना ठेवून व ही कथा पूर्णत्वाकडे नेण्याच्या या दृढ संकल्पात आपण महायोगदान द्यावे, हा आर्जव करून,  आता आपण इथून पुढे मूळ कथेकडे वळूया. 

अर्जुनाचा नातू  राजा परीक्षित हा आपल्या सभेत बसून महर्षी ज्ञानयोगी तपस्वी शुक यांना प्रश्न विचारतो आहे. 

"हे महायोगी ऋषींवर कृष्णचारित्रामध्ये विशेष करून भीमकी अर्थात रुक्मिणी हरण हे विशेष करून ऐकावयाची माझी इच्छा आहे." 

शुक मुनींचा प्रश्नार्थक चेहरा पाहून राजा परीक्षित पुनः वदता झाला 

"हे ऋषीवर कृष्णकथेची गोडी इतकी अवीट आणि माधुर्यपूर्ण आहे आणि ती आपल्या अमृतमय वाणीतून ऐकून माझे श्रोत्र अर्थात कर्ण मस्तिष्क मार्गे माझे हृदय व आत्मन हे अतृप्ती चाच अनुभव घेत आहे. म्हणून ते पुनः पुनः आपल्या मुखाने ऐकण्याची इच्छा जागृत होत आहे. 

आपण हेदेखील जाणता की, या कथेच्या श्रवण किर्तन या योगाने जे ज्ञान मिळेल ते जर यथायोग्य जाणले तर प्राणीमात्र सर्व योग प्राप्त करून मोक्षाप्रत , अर्थात विधात्याच्या ध्येयाप्रत  पोहोचतो. म्हणूनच आपण माझ्यासह समस्त श्रोतृवर्गाला तृप्ती अतृप्तीच्या या सागरात निथळून काढावे आणि या अमूल्य पुण्याची प्राप्ती करून द्यावी. . हीच आपल्या चरणांशी प्रार्थना आहे."

राजाचं हे आदरयुक्त आणि अंतःकरणातुन आलेलं कथन ऐकून मनोमन आनंदी झालेले ऋषीवर शुक राजाला वदले. 

"हे राजन, ईश्वरचरित्र हा एक अद्भुत रम्य असा लीलांचा अमृतसंचय आहे. सादरीकरण करताना तुझ्याप्रमाणेच श्रोता जर प्राप्त झाला तर तो एक अलौकिक योगच असेल.  याचा कथा सादरीकरण कर्त्यासही महद आनंद विनासायास प्राप्त होईल. 

हे राजा वासुदेवाच्या तपोबलाने प्रत्यक्ष त्रैलोकीच्या नाथांना त्याची भार्या अर्थात देवकी हिने आपल्या गर्भात धारण केलं . कृष्ण ज्यावेळी या भूलोकात देवकीच्या गर्भात तेजोमय स्वरूपात प्रकटले त्यावेळी त्यांची कृष्णशक्ती अर्थात महालक्ष्मी गर्भरूपात विदर्भ देशी प्रकटती झाली. अर्थातच जशी कणकासवे कांती आणि सुर्यासवे त्याची दीप्ती ही येतेच तद्वत देवी भूलोकी प्रकटली." 

ll शुभम भवतू ll
ll वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं ll देवकी परामानंदम कृष्णम वंदे जगतगुरुं ll

ll श्रीएकनाथमहाराज की जय ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

ll श्रीकृष्णार्पणामस्तू ll

०३/१२/२०१९
९०४९३५३८०९
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...