Skip to main content

काश्मीर भाग १

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग १

काल लकिली गाड्यांमुळे घरी होतो म्हणून मोटाभाई अर्थात गृहमंत्री म्हणून व प्रस्ताव मांडणारे म्हणून त्यांचं उत्तरा दाखल त्यांनी केलेलं भाषण पूर्ण पाहिलं. तस पाहिलं तर भाजपात उत्तम वक्त्यांची वानवा नाही. इतर पक्षांना ते शोधावे लागतात. पण इथे माणसं संघाच्या मुशीतून घडून समाजात येतात. त्यापैकीच एक अमितभाई.

मुळात राजकीय पातळीवर गुप्तपणे पडद्यामागे हालचाली करणं हा अमितभाईचा हातखंडा. त्यात सध्या तरी त्यांचा हात धरणारा कोणी नाही. त्यातून त्यांना मोदींजींसारखा खांदा पाठीराखा , मित्र , योद्धा, लढवैय्या निडर माणूस साथीला मिळालाय. बाकीच्या सर्व वा बऱ्याच प्रकरणी अमितभाई सारथ्य करतात मोदी फक्त बघतात की योग्य दिशेने गोष्टी घडत आहेत ना , ठरल्याप्रमाणे.

याही वेळी मोदीजी शेवटच्या भाषणाला हजर राहून आपल्या या योध्याचं मनोधैर्य वृद्धिंगत करण्याच काम चोख बजावून गेले. एकतर मुद्दा जळजळीत ३७० चा. ७० वर्षात अजून फुगवून त्याला आगीसारखा धगधगीत केलेला. चुकीचा असून फक्त भाजपा व सेना सोडून कोणीही त्याला तात्विक सुद्धा विरोध न केलेला.

अश्या ज्वलंत मुद्दा हातात घेऊन तो मुळासकट सोडवायचा म्हणजे अफाट धैर्य , तयारी, आत्मविश्वास, योग्य माणसाची साथ , वरच्या व्यक्तीचा वरदहस्त आणि खंबीर पाठिंबा आणि सरतेशेवटी नशिबाची साथ या सर्व गोष्टीबरोबर नियोजन हे सर्व योग जुळून यावे लागतात. एक एक मुद्दा बघूया

१. धैर्य म्हणाल तर ज्याने कॉंग्रेस राजवटीत चिदम्बरम सारखा नालायक मनुष्य गृहमंत्री असताना २००२ च्या दंगली प्रकरणी चौकशीला तोंड दिलंय , तेही यशस्वी त्या माणसाच्या अफाट धैर्याची तुलना कशाबरोबर होऊ शकते, फक्त सरदार पटेलांच्या धैर्याशी.

२. तयारी. आजच वाचलेल्या एका लेखानुसार याची तयारी मोदींजींनी जवळजवळ एक वर्ष आधी सुरू केली होती, अजित डोवाल यांना हाताशी धरून, अर्थातच पडद्यामागे अमितभाई असणार यात वाद नाही. ही सर्व तयारी कोणालाही कसलाही वास लागू न देता करणं हे आताच्या काळात कसोटीचं आहे. पण मोदीजी आणि डोवाल त्यात मास्टर आहेत आणि मास्तर सुद्धा.

३. आत्मविश्वास हा मोदी आणि शहा या दोन नावांच्या जन्मापासून त्यांना देणगी दाखल मिळालाय अर्थातच आईच्या गर्भातूनच आणि संघाच्या तालमीत तो हिमालया ऐवढा झालाय. आत्मविश्वासाचं अजून एक उत्तम उदाहरण म्हणजे या योजनेची तयारी वर्षभर आधीपासून सुरू होती. मध्ये मेच्या निवडणुका. म्हणजे मोदीजी आणि अमितभाई यांना किती आत्मविश्वास असेल निवडून येण्याचा, मानलं पाहिजे.

४. योग्य माणसांची साथ. इथे मोदीजी अमितभाई डोवाल यांच्याबरोबर एक नाव जोडावं लागेल, ते म्हणजे काश्मीरचे मुख्य सचिव श्री सुब्रमण्यम ज्यांनी या मोहिमेच्या तयारी डोवाल व मोदीजी यांना गेले वर्षभर साथ दिली. या व्यतिरिक्त सर्व अनामिक माणसं ज्यांनी हे इप्सित साध्य व्हावं म्हणून आपली आपली कामं चोख बजावली, ती सर्व शाब्बासकीस पात्र आहेत.

भाग १ समाप्त
© लेखक : प्रसन्न आठवले
०६/०८/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...