Skip to main content

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग ४

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग ४  पुढे
खरतर आज ४था आणि अंतिम भाग करणार होतो. पण काल रात्रीच काश्मीर प्रश्नावर वाचत असताना काही लेख आणि त्या अनुषंगाने माहिती हाती लागली. म्हणून या विषयात तो विषय गुंतलेला असल्यामुळे थोडं विषयांतर होतंय पण ती माहिती देणं मी गरजेचं समजतो. म्हणजे काही गैरसमज वा अपसमज असतीलच तर ते दूर होतील. 
काश्मिरफ हे एक संस्थान होत. ब्रिटिश काळात ते ब्रिटिशांच्या अंमलाखाली होत. स्वातंत्र्याच्या वेळी काश्मीरचे राजे हरिसिंग होते हे सर्वांना ज्ञात असेल. साधारण १९३२ ला त्यावेळच्या काश्मीर संस्थानात घाटातील एक मुस्लिम नेता शेख अब्दुल्ला (फारुख अब्दुल्ला यांचे वडील) यांनी महाराज हरिसिंग हटाव मोहीम सुरु केली होती. याआधी हि मोहीम फक्त काश्मिरातील मुस्लिम लोकांसाठी सुरु करण्यात आली होती साधारण १९३९ ला अधिक तीव्र करण्यात आली. आणि पूर्वी जो पक्ष काश्मीर मुस्लिम कॉन्फरेन्स नावाने सुरु केला होता शेख अब्दुल्ला यांनी तो १९३९ मध्ये नॅशनल कॉन्फरेन्स नावाने बदलण्यात आला. १९४६ जुन मध्ये अब्दुल्ला यांनी काँग्रेस आंदोलनावरून प्रेरणा घेऊन महाराजा हरिसिंग हटाव धर्तीवर एक आंदोलन उभं केला. 
यात शेख अब्दुल्ला यांना अटक करण्यात आली. त्यांची सोडवणूक करण्यासाठी नेहरू स्वतः बॅरिस्टर बनून अर्थात शेख यांचे वकील बनून काश्मिरात गेले. हे सर्व त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचा विरोध असताना सुद्धा केलं. प्रत्यक्ष सरदार पटेल यांना सुद्धा त्यांच्या या शेख अब्दुल्ला यांच्याप्रती असलेल्या सहानुभूती बद्दल आश्चर्य आणि चिंता वाटत होती. कारण शेख यांचा उद्देश एकच होता तो म्हणजे येन केन प्रकारेण काश्मीरवर कब्जा मिळवायचा अर्थात सत्ता हस्तगत करायची. कारण ते घाटीतील मुस्लिम होते आणि त्याना राजा हरिसिंग यांचं राज्य मान्य नव्हत. पण काश्मीरची सत्ता हस्तगत करायची होती. त्यांची हि मनीषा सर्वांना माहित होती, अर्थातच नेहरू याना सुद्धा. मध्यप्रांतातील डी पी मिश्र यांना लिहिलेल्या पात्रात सरदारांनी आपली नेहरू यांच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 
त्याच सुमारास जुलै १९४७ मध्ये विभाजनाची घोषणा झाली आणि जी काँग्रेसने स्वीकृत केली होती. त्यानुसार राजा हरिसिंग यांना पाकिस्तान आणि हिंदुस्तान यामध्ये एकाची निवड करण्याचं स्वातंत्र्य होतं . स्वतःलॉर्ड माऊंटबॅटन यांनी राज़ा यांना ते पाकिस्तानात जावेत म्हणून बुद्धिभेद करण्याचा हरप्रकारे प्रयत्न. हरप्रकारे यासाठी कि हे करताना प्रत्यक्ष राजा हरिसिंग , त्यांचे प्रशासक  यांच्या मार्फतदेखील त्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. स्वतः सरदार पटेल यांनी जे इतर संस्थानांशी देखील चर्चा करत होते, त्यांनी दोन वेगळी पत्र लिहून राजा आणि त्यांचे पंतप्रधान रामचंद्र कॉक यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला कि, काश्मीर राज्याचे हित विनाविलंब भारतात जोडलं जाण्यातच आहे. 
महाराजा हरिसिंग याची द्विधा मनःस्थिती झाली होती. ते विचार करत कि, जर पाकिस्तानशी जोडलो गेलो, तर एका सांप्रदायिक व धार्मिक राष्ट्राशी जोडलं गेल्यानंतर माझ्या राज्यातील अल्पसंख्यांक (काश्मिरात त्यावेळी अल्पसंख्याक म्हणजे काश्मिरी पंडित, काश्मिरातील इतर हिंदू आणि लडाखमधील बौद्ध ) यांचं भवितव्य समाप्त होईल. एक राजा म्हणून आपल्या प्रजेबद्दल अत्यन्त संवेदनशील राजा म्हणून हरिसिंग हे ज्ञात होते. म्ह्णूनच आपल्या प्रजेच्या अहिताचा निर्णय कसा काय घ्यायचा याबद्दल ते साशंक होते, त्याच बरोबर हे पण सत्य आहे कि, काश्मिरातील बहुसंख्य असलेला मुस्लिम समाज भाषा संस्कृती या दृष्टीने पंजाबी आणि पाकिस्तानी मुस्लिमांहून भिन्न होता. म्हणून त्यांचं हित  व संस्कृती यांचं रक्षण होणं गरजेचं होत. 
त्याच   दरम्यान रामचंद्र कॉक यांच्या कार्यपद्धती विशेषतः व्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांच्याप्रती त्यांच्या पक्षपाती धोरणाबद्दल राजा हरिसिंग यांनी त्यांना जुलै १९४७ मध्ये बरखास्त केलं. त्याजागी सरदार पटेल यांच्या मदतीने पंजाब प्रांताचे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मेहरचंद महाजन यांची मदत मिळाली. काश्मीर विलीनीकरणाच्या प्रश्नावर होत असलेल्या विलंबामुळे जिना यांना काश्मीर हातातून जाणार हा धोका लक्षात आला. त्यांनी टोळीवाल्यांच्या मदतीने अर्थात त्यांना काश्मिरात उत्तर काश्मीर भागातून घुसवून मिळेल तितका काश्मीर हातात घेण्याचं ठरवलं. 


भाग ४ समाप्त 
© लेखक : प्रसन्न आठवले
१०/०८/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...