Skip to main content

काश्मीर भाग ३

दुसरा सरदार पटेल अर्थात गृहमंत्री श्री अमितभाई शाह अर्थात मोटाभाई - भाग ३  पुढे

कोणत्याही माणसाच्या राष्ट्रप्रेमाची काही मोजमाप असू शकतील असं म्हणता येणार नाही. पण काही मापदंड वा प्रमेयं नक्कीच मांडता येऊ शकतात. त्यासाठी भारतात हजारो वर्षांची परंपरा, लाखो करोडो उदाहरणं  आहेत , ज्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या राष्ट्रप्रेमाची प्रचिती येऊ शकते. अर्थात यात कोणावर कोणतीही शंका घेण्याचा प्रश्न नाही. तरीही राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या व्यक्ती बाबत निश्चित विधानं , अर्थातच सकारात्मक , करता येऊ शकतात.

हे विस्ताराने मांडायचं कारण म्हणजे अमितभाईंसारखी संघीय परिभाषेत तयार झालेली माणसं  काळाच्या कोणत्याही कसोटीवर १००% खरी  उतरू शकतात आणि स्वप्नातसुद्धा त्यांच्या राष्ट्रप्रेमावर शंका तर सोडाच, पण कल्पनादेखील करता येणार नाही. प्रत्यक्ष ३७० संदर्भातील नियोजन मला नाही वाटत कि एखाद्या वर्षाचा परिपाक असेल. यामागे निश्चित काही वर्षांचं वा दशकांचं नियोजन असणार यात शंकाच नाही. अशी अनेक राष्ट्रीय कर्तव्य मोदी आणि शाह या जोडीने गेल्या ५ वर्षात निःसंशय पार पाडली असतील. काही समोर आली. तर काही आलीही नसतील.

प्रत्यक्ष अमितभाईबद्दल बोलायला खर तर अनेक तास कमी पडतील. मुख्य अमितभाईच वैशिष्ट्य म्हणजे खालून वर चढत आलेला माणूस, आतून बाहेरून साफ (अर्थात राजकारणासाठी आवश्यक लपवाछपवी , जी अनेक प्रसंगी गरजेचीच असते, ती सोडून माणूस दिलदार, सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य, जे मी स्वतः वाचलं आणि काही त्यांच्या जवळ असणाऱ्यांकडून ऐकलं , ते म्हणजे समोरच्याला स्कॅन करण्याचं कसब. कोणतीही व्यक्ती जी त्यांच्या समोर येते, तिला क्षणमात्र नजरेत पारखण्याची कला वा दैवी देणगी अमितभाईकडे आहे. अजून एक गुण त्यांच्यातला माणसं ओळखून जोडणं आणि जोडलेली माणसं योग्य कामासाठी नियुक्त करून त्यांच्यातील गुणांचा, अर्थातच, राष्ट्रकार्यासाठी उपयोग करून घेणं. 

कोणत्याही गोष्टीचं नियोजन करण्यात, त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. अस नियोजन करताना बारीक बारीक तपशील डोक्यात ठेवून, त्यानुसार येऊ शकणारी छोट्यातील  छोटी अडचण , अडथळा हे आधीच हेरून त्यांच्या वाटा बंद करणं वा समोरच्याला त्या बंद करण्यास सांगणं, हे त्याचं खूप मोठं वैशिष्ट्य म्हणता येईल. अर्थात इतका सखोल विचार करणारी माणसंच कठीण कार्य यशस्वी करून दाखवतात. या नियोजनात अजून एक मुख्य गोष्ट जी फार थोडया व्यक्तींना अवगत असते ती म्हणजे समोरच्या शत्रूच्या, (शत्रू म्हणजे व्यापक अर्थाने राजकीय व राष्ट्रीय दोन्हीप्रकारचे),   हालचाली व आपल्या योजनेनुसार त्याची पावलं काय असतील हे अचूक ओळखून कार्य पुढे नेणं वा त्यानुसार नियोजन करणं हा मोठा गुणविशेष आहे.

या एका गुणात अनेक गुण दडलेले आहेत.  शत्रूचे गुण , प्लस मायनस सर्व गोष्टी जाणणं , त्याचा स्वभाव, त्याच्या कमजोरी , त्याची बलस्थानं या गोष्टी समजणं , त्याच्या जवळ असणाऱ्या वा त्याच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांची देखील स्वभाववैशिष्ट्य , त्यांची नियोजनाची व कामाची पद्धत माहिती करून घेणं , विपरीत परिस्थितीत त्याने केलेल्या गोष्टी वा कृती, आयत्यावेळी आलेल्या आपत्तीवर त्याची प्रतिक्रिया व कृती, त्याच्या टीममध्ये असलेली कमजोर माणसं जी योग्य वेळी आपल्याला कामी येतील वा येऊ शकतील, त्यासाठी त्यांना आधीपासून चुचकारून ठेवणं. या नमूद केलेल्या व न केलेल्या सर्व गोष्टी ध्यानात घेऊन, आपलं नियोजन पक्क करणं या सर्वात वाकबगार असलेली आताच्या घडीलाच नव्हे तर कोणत्याही काळात श्रेष्ठ व्यक्तित्व म्हणजे मोदी आणि शाह.

नक्कीच चाणक्यनीती कोळून प्यायलेली माणसचं असू शकतील वा कुणास ठाऊक घातक काँग्रेसी षडयंत्र निकामी करायला योग्यवेळी आलेली चाणक्याची प्रतिरूपं असतील. अर्थात हा माझा कल्पनाविस्तार. 

लिखाण विस्तृत होत चाललंय , पण आता विषयाला हात घातलाच आहे तर पूर्ण करू , जितके भाग होतील तितके.

भाग ३ समाप्त
© लेखक : प्रसन्न आठवले
०९/०८/२०१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...