Skip to main content

होतो गहिरा श्रावण अजुनी


होतो गहिरा श्रावण अजुनी
स्वरतरंग तव येता कानी
मल्हाराची साथही अवखळ
धारा पडल्या वीज चमकुनी
होतो गहिरा श्रावण अजुनी

त्या तालाच्या हिंदोळ्यावर
स्वार होऊनी आले ते स्वर
अचूक वेळा साधून आली
स्वर सर येई अजुनी भिजूनी
होतो गहिरा श्रावण अजुनी

भिजले अंगण भिजले अंग ही
ओलेते स्वर हृदयात पोचूनी
होतो आता स्पर्श स्वरातून
आस ही अवघी जागी करुनी
होतो गहिरा श्रावण अजुनी

धारा धारा जाणीव गेली
थेंबांचीही ओळख झाली
नुसते पडणे नव्हते त्यांचे
तुझीच सय सखे येई त्यातूनी
होतो गहिरा श्रावण अजुनी

अवघे मन हे तुज बोलावत
स्पर्शही व्हावा तव ओलावत
जगताचे का भान रहावे
स्वर तव गेले ज्याला भिजवून
होतो गहिरा श्रावण अजुनी

मुकेपणाने श्रावण बोले
बाह्य जगती तनही डोले
आतून येई साद तुज प्रती
कळेल का  तुज हृदयामधुनी
होतो गहिरा श्रावण अजुनी

गंध दरवळे मोदे आता
स्वरात तव ती आली आर्तता
जाणीव जागी झाली आणिक
श्रावण हर्षे  मुक्त होऊनी
होतो गहिरा श्रावण अजुनी

कवी : प्रसन्न आठवले
०९/०३/२०१९
०९:५१

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...