Skip to main content

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग २


गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग २

नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||

हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||

पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||

चैत वार्‍याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३|

गीत गदिमा
संगीत सी रामचंद्र
गायिका आशा भोसले
चित्रपट संत निवृत्ती ज्ञानदेव

अश्या नैराश्याच्या , त्या अद्वितीय सत्पुरुषांच्या , स्थितीत त्यांना नकारात्मकता जाणवत नाही. तर त्यांचा शोध चालू असतो, त्यांना हव्या असलेल्या उत्तराचा. ती स्थिती काही चमत्काराने अथवा कसल्याशा ध्यासाने वा सततच्या चिंतनाने अचानक पालटते. आणि मनःचक्षुना एक दिव्य साक्षात्कार होतो. त्या स्थितीचं यथार्थ वर्णन या गीतात मांडलंय.  मुळात हा एखादा ज्ञानेश्वर माऊलींची रचना वाटावी इतका सुंदर शैलीत ग दि मा नि मांडलाय. त्याबद्दल त्यांचे चरणस्पर्श. कारण ही भाषाशैली माऊलींच्या अभंगात वा रचनांमध्ये आढळते.

ही दिव्य स्थिती चपखल शब्दात मांडताना ते लिहितात की, मनातील या नैराश्याग्रस्त अंधाराचा अचानक नाश व्हावा असाच चमत्कार वा अस नवल घडलंय. पण हे घडलं अचानक वा आपसूक नाही तर , वर्तले म्हणजे कोणीतरी काही कथन केल्यामुळे वा वर्तन केल्यामुळे हे घडून आलंय. कारण वर्तले म्हणजे वर्तन म्हणजे कायिक वा आत्मिक कर्म अथवा वर्तणे म्हणजे वार्ता करणे वा सांगणे असाही होऊ शकतो.

यातील कर्म म्हणजेच वर्तन वा कथन वा दोन्ही एकत्र घडून आल्यामुळे हा ज्ञानाचा जो अलौकिक प्रकाश आत्म्याने अनुभवलाय , हाच कदाचित दिव्य साक्षात्कार जो माऊलींना जाणवतो तो त्यांनी यात व्यक्त केलाय. मुळात माऊली स्वतः अवतारी पुरुष. त्यामुळे अनेक दिव्य शक्ती घेऊन जन्माला आलेले. त्यांना साक्षात्कार हा खरतर एक औपचारिक गोष्ट. पण एखादा साधक जेंव्हा भक्तीमार्गात वा ज्ञानमार्गात रत असतो त्या स्थितीत त्याला साक्षात्कार होतो वा होईल त्या स्थितीला त्याची अवस्था चपखल शब्दांकित केली आहे, या गीताद्वारे.

विषयवस्तू उपभोगणं आणि त्यासाठी देह झिजवणं किंवा संसारात रममाण होणं हे वास्तविक सामान्य लक्षण आहे. पण एखादा

क्रमशः भाग २ समाप्त
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...