Skip to main content

सद्गुरूंना भावांजली :

सद्गुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी पावन दिनानिमित्त सद्गुरूंना भावांजली :

भ्रमित थकीत मन स्थिर राहो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

ब्रम्हाचे चैतन्य तुम्ही हो
नामाचा आदर्श तुम्ही हो
नामी झाला रत तुम्ही हो
श्रीगुरुपदा सार्थ तुम्ही हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

गुरू भेटीस्तव त्यागिले घरा
चरण झिजवूनी फिरले धरा
श्रीतुकाई माय भेट हो वरा
चरण धरुनी तुम्ही  सेवा केली हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

त्रयोदशाक्षरी मंत्र मिळवूनी
शिष्योत्तम हा धर्म राखुनी
प्रभू रामाचे दर्शन होऊनि
जगता दिधला सिद्धमंत्र हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

गोंदवले ग्रामास परतुनी
नामसेवा ही एकच जननी
तीच ईश्वराची स्वरधुनी
केले ग्रामा पावन तुम्ही हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

नामाची महती सांगूनी
करा सार्थ जन्मालागूनी
साधा हाच जन्म पावनी
जगा सांगितले जपा नाम हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

उभा जन्म वाहिला नामा
घेऊनि नामा म्हणा श्रीरामा
तेरा कोटी होता जप नामा
दर्शन प्रभूंचे होई वचन हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

घेऊनि नामा करा कर्म हो
नाम माना एकची धर्म हो
नाममहती देऊनी मर्म हो
साधा हित आपुले साधक हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

प्रसन्न साधक वृत्ती राहो
चिंतामणी या नामी पाहो
आठवले नामात रत हो
सेवा मानून घ्यावी गुरु हो
श्रीगुरु रामनामी मन दृढ राहो

© कवन :प्रसन्न आठवले
३१/१२/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...