Skip to main content

पराधीन आहे जगती" या गीताच्या चालीवर

गीतरामयणातील "पराधीन आहे जगती" या गीताच्या चालीवर

कर्मगती बांधे मनुजा कर्मबंधनात
कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप

कर्म करुनी सुटला इथून
नाही कोणी ऐसा
भोगणेच हे  निर्वाण
एक मार्ग ऐसा
कर्म एकही ना करणे हाही कर्मभाग
कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप

अकर्मी न राहू जाणे
येथ कोणी जीव
कर्मत्याग करणे जगणे
कर्म भोग भाव
पूर्वकर्म केले जे जे भोगणे हे प्राप्त
कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप

जन्म मृत्यू फेरा इथला
कर्मगती जोडून
विधाता रचतो खेळ
जीव अडकवून
तुझे कर्मभोग जाण प्राक्तनी तुझ्याच
कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप

फेर असा कर्माचा हा
नशिबात येई
एक एक जीव त्यात
गुंतुनिया जाई
लक्ष लक्ष जन्माचा रे खेळ चाललेला
कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप

यात मार्ग सुटकेचा रे
भक्ती, नाम हाच
जोड जोड नामा आणिक
प्राप्त मोक्ष भाग
कर्मबंधनातून सुटण्या नाम हाच मार्ग
नाममार्ग जाणी मनुजा युगे युगे सार्थ
कर्म हेच आहे पुण्य कर्म हेच पाप

© कवी : प्रसन्न आठवले
०३/०१/२०१९
१६:२९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...