Skip to main content

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १८ व अंतिम

श्रीराम श्रीकृष्ण संवाद १८ व अंतिम

सरतेशेवटी इतकंच सांगीन की कलियुगात ईश्वरप्राप्ती तसेच कर्मफलत्यागाचा सर्वात उत्तम व उन्नत मार्ग कोणता असेल , तर त्याच एकच उत्तर म्हणजे नामस्मरण करणे वा नाम घेणे. नाम घेताना नामात इतके तद्रूप व्हावे की घेणारा साधक, नाम म्हणजे साधन व ईश्वर म्हणजे साध्य हे एकरूप व्हावेत. हीच नामसाधनेची खरी कसोटी आहे.

नाम हे शंकारहित , पूर्ण श्रद्धेने, हेतूरहीत, समाधानाने, ईश्वर समीप नव्हे सोबत आहे हे लक्षात घेऊन व आपल्यासाठी घ्यावे. कलियुगी घोर पातके घडणार आहेत, ज्ञान अज्ञान, चांगलं वाईट, प्रवृत्ती निवृत्ती यांचा घोळ होईल. आसक्ती हीच विश्वाची सूत्रसंचालक होईल. लालसा , दुष्ट वासना, मोह, लोभ, काम, क्रोध, हे सतत प्रभावी असतील.

चांगल्या भावना, चांगली माणसं, चांगुलपणा हे दुर्मिळ होत जाईल. म्हणून यावर आपण स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी एकच औषध घ्यावं, ते म्हणजे नामस्मरण. कोणत्याही देवतेच,  इष्टदेवतेच, सद्गुरुच, वा ईश्वराचं नाम घेऊन त्याच्या स्मरणास कोणत्याही क्षणी,  लक्षात येईल, उमजेल जाग येईल त्यावेळी सुरवात करावी.  नाम स्वतः पवित्र आणि सात्विक आहे. ते आपल्या सोबत येणाऱ्या प्रत्येक साधकाला शुद्ध करून घेतं. म्हणून त्वरित व संकल्पाने नाम घेण्यास सुरू करावे.

एवढे बोलून श्रीकृष्ण , श्रीराम दोघे ध्यान लावून उभे राहिले. जणू दोन देह, दोन ज्योती एक व्हाव्यात त्याप्रमाणे श्रीकृष्ण श्रीराम दोन्ही एकरूप होत गेले आणि प्रत्यक्ष श्रीनारायण साक्षात शंख चक्र गदा पद्म पितांबर धारी, त्रिनेत्र धारी श्रीमहादेवांसमोर उभे राहिले. देवी जानकी व देवी रुक्मिणी या दोन्ही देवी एकरूप होऊन नखशिखांत सालंकृत देवी लक्ष्मीरूपात श्रीमहानारायणा समीप उभ्या राहिल्या.

त्रिपुरारी आणि देवी पार्वती या अलौकिक दृश्याने मंत्रमुग्ध झाले. समस्त विश्वाचं तेज एकाच ठिकाणी अर्थात कैलासावर प्रकट होऊन विश्व व्यापून उरलं. महाविष्णू आणि महालक्ष्मी यांचं ते तेजोमय रूप पाहून महादेव व माता पार्वती अति आनंदी झाले.  सर्वांनी एकमेकांना डोळे भरून पाहून घेतल. त्यांनी लोकोत्तर कार्यासाठी आणि लोक कल्याणासाठी केलेल्या या प्रदीर्घ चर्चेत ज्ञानाचा कलश ज्ञानवृद्धीसाठी जगाच्या हाती सुपूर्त केला. तदनंतर  महादेव आणि महाविष्णू यांनी समाधानाने आपापल्या स्थानी स्वभार्येसह प्रस्थान केले.

अश्या ज्ञानप्रदानाच्या गोष्टी युगायुगात होतच असतील. प्रभुकृपेने त्या आपल्यापर्यन्त पोहोचते करण्याचा आनंद त्याच भगवंताच्या मर्जीने मला मिळाला हा अद्भुत योग आहे.

ll श्रीनारायणाय नमः ll श्रीमहादेवाय नमः ll
ll देवी श्रीमहालक्ष्मी नमोनमः ll देवी श्रीपार्वती नमोनमः ll

© संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...