Skip to main content

जानकी पुनःवनवास ८

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ८
.
या सर्व तयारित आणि उत्सवाच्या धुंदीत हनुमान प्रभुंचा निरोप घेऊन आयोध्येकडे प्रस्थान करते झाले. कारण प्रभुना भ्राता  भरताची निष्ठा पूर्ण माहित असते आणि म्हणून तेही चिंतेत असतात. यास्तव हनुमंताला पुढे धाडून निरोपाची व्यवस्था करण्यात आली आहे. हनुमंत तर क्षणाचाहि विलंब न लावता प्रभू आज्ञेची पूर्तता करण्यासाठी प्रस्थानार्थ झाले.

इकडे भरत क्षण क्षण आजच्या दिवसाची प्रतीक्षा करत आहे, पण मानवी मनाचाच हा सुद्धा अलौकिक गुण भरताला , प्रभुना, नव्हे समस्त अयोध्यावासीयाना प्रत्ययास येतो. १४ वर्ष सहज गेली पण आज एक एक क्षण हा युगासमान भासत आहे.  भरत स्वयम संध्यासमयाची प्रतीक्षा करत असतानाच, वायुवेगाने आलेल्या हनुमंताच उद्दाण भरतासमोर येऊन समाप्त होत.

काहीसा अचंबित झालेला भरत एका क्षणात सावरून हनुमंताला ओळखतो आणि प्रसन्न प्रणिपात करतो. हनुमान त्यावर वाकून पाया पडायला जाणार तोच भरत त्याला अडवून म्हणतो

"सर्वश्रेष्ठ रामभक्ता ख़र तर मीच तुझ्या चरणावर मस्तक ठेवण योग्य आहे आणि तेच ज्येष्ठ भ्राता श्रीराम यानादेखील अपेक्षित असणार."

"भ्राता भरत अस का म्हणता आहात माझ्या हातून काही अपराध घडला असल्यास मी आपली क्षमा मागतो."

"नाही हनुमंता आपण तर ते पुण्यपुरुष आहात ज्याना श्रीरामांचा सहवास अखंड लाभला आणि जे प्रत्यक्ष्य प्रभुंचे श्वास आहेत. मी अभागी त्यावेळी मातुलगृही जाऊन विश्राम करत होतो जेंव्हा मातेने त्याना ........(एक दीर्घ श्वास घेऊन ) मला पामराला त्यांचा वियोग प्रारब्धी आला. नककीच माझे शतजन्माचे पापकर्म त्याच वेळी फलरूपात मजसमोर उभे ठाकले. (आणि एकदम भानावर येत) . क्षमा करा माझी  अल्पमति क्षणिक कुंठित झाल्याने पूर्ण विस्मृत झालो. आपण खुप प्रवास करून आला असाल, मी आपल्या जलपनाचा प्रबंध करतो. "

"क्षमा भ्राताश्री . आपण तसदी नका घेऊ प्रभुकृपेने मला काहीही कष्ट पडत नाहीत प्रभुकार्यात. किंबहुना त्यांच्यां असीम कृपेने कोणतेही कार्य मी लीलया करू जाणतो. आपण आसन ग्रहण कराव . माझ्यासारख्या दासासमोर आपण तिष्ठत उभ राहण सयोग्य नव्हे"

" अरे पवनसुता तू दास नाहीस तुझी जागा माझ्याही हॄदयातच आहे. आपणच स्थान ग्रहण करून या आपल्या बंधुस उपकृत करावे, हे नम्र निवेदन स्वीकार कराव. "

हा वार्तालाप अजुन किती काळ चालला असता, पण अचानक मारुतिरायाला प्रभुंच्या कथनाची आठवण झाली आणि ते वदणार, इतक्यात भरत म्हणाला

" हनुमंता माझे आणि तुझे प्रभु कसे आहेत, सर्व कुशलमंगल आहे ना आणि माता जानकी व भ्राता लक्ष्मण सकुशल आहेत ना. त्यांचाच संदेश घेऊन तुझ आगमन झालय ना. आता अजून किती प्रतीक्षा करावी लागेल,कारण प्रभुनी मला वचन दिल होत आणि त्यानुसार ..............."

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
२७/०१/२०१८

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...