आनंद चित्रपट उलगडून बघतानाच्या वाटेवर आज या चित्रपटातील अजून एका गाण्याच भावविश्व जाणून घेऊ
आनंदच्या व्यक्तिमत्वाचे दोन पैलु फारच थोड्या ठिकाणी वा प्रसंगात हृषिदानी दाखवलेत. जगासाठी हसमुख आणि सदाबहार असलेला आनंद अंतर्मुख होऊन मनातील व्यथा जीवनाची अगतिकता व्यक्त करत स्वतः मध्ये डोकावलेला या गाण्यात बघायला मिळतो आणि ते गाण म्हणजे
कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझसी दुलहन बदन चुराये चुपकेसे आये
कँन्सर होण्याआधी त्याच्या प्रेयसीबरोबर असलेल त्याच स्वतःच विश्व . त्या सुवर्णकाळाच्या मनात साठवलेल्या आठवणी. जणू हा आठवणींचा हिंदोळा, हे , त्याच्या एकट्याच्या मालकीच असलेल जग फक्त एकटाच असताना, आनंद या गाण्यात, पुस्तकातली मागची पान पुन्हा वाचून बघावीत अस या गाण्यातले भाव दाखवतात.
कवी योगेश यांचे शब्द आणि सलिल चौधरी यांच् सुमधुर संगीत आणि या गाण्यातल्या अव्यक्त भावना व्यक्त व्हाव्यात या साठी मदत करणारा वाद्यमेळ. आणि या भावना सखोलपणे आणि चपखलपणे आपल्यापर्यंत पोचवणारा मधुर आवाज मुकेश यांचा. या त्रयीवर कडी म्हणजे हे भाव सुत अन सुत , रेघ अन रेघ आणि शब्द अन शब्द आपल्या expressions मधून आपल्या काळजापर्यंत सहजी पोचवणारा चेहरा अर्थात राजेश खन्ना. हा चित्रपट आणि विशेषकरून हे गाण. इतक्या सार्थपणे, अभिनयातून मांडण्याची ताकद असलेला कसदार अभिनेता. ज्याची चेहर्याशी रेश अन रेश बोलते.
परत या गाण्याकड़े वळताना.
कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझसी दुलहन बदन चुराये चुपकेसे आये
मेरे खयालों के आंगन में
कोई सपनों के दिप जलाये दिप जलाये
गत काळातील त्या सुवर्णमयी स्वप्नवत वाटणाऱ्या क्षणाना ,त्या हरवलेल्या आनंदाला आठवत, त्या क्षणाना जवळ बोलावत, त्याना चुचकारत, त्यांच्यां आठवाने सूखावलेला आनंद त्या "कोणाला"तरी एकप्रकारे बोलावत आहे. त्या आठवणी आता जवळ नसण्याचा काहीतरी हरवल्याचा एक सूक्ष्म भास , एक कारुण्याची झालर त्याच्या आजच्या जीवनाचा गाभा असल्याची सल त्याला बोचते. त्याला मनात हे प्रत्यक्ष नसून ही स्वप्नच आता आयुष्याचा, जगण्याचा भाग आहे, किंवा इतकंच आता हातात उरलय ही जाणीव तो व्यक्त करतोय.
गाण्यात ऐकूण तीन कड़वी आहेत त्यांचाहि विस्ताराने आढावा घेऊयात पण ......
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०१८
Comments
Post a Comment