Skip to main content

आनंद ३

आनंद चित्रपट उलगडून बघतानाच्या वाटेवर आज या चित्रपटातील अजून एका गाण्याच भावविश्व जाणून घेऊ

आनंदच्या व्यक्तिमत्वाचे दोन पैलु फारच थोड्या ठिकाणी वा प्रसंगात हृषिदानी दाखवलेत. जगासाठी हसमुख आणि सदाबहार असलेला आनंद अंतर्मुख होऊन मनातील व्यथा जीवनाची अगतिकता व्यक्त करत स्वतः मध्ये डोकावलेला या गाण्यात बघायला मिळतो आणि ते गाण म्हणजे

कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझसी दुलहन बदन चुराये चुपकेसे आये

कँन्सर होण्याआधी त्याच्या प्रेयसीबरोबर असलेल त्याच स्वतःच विश्व . त्या सुवर्णकाळाच्या मनात साठवलेल्या आठवणी. जणू हा आठवणींचा हिंदोळा, हे , त्याच्या एकट्याच्या मालकीच असलेल जग फक्त एकटाच असताना, आनंद या गाण्यात, पुस्तकातली मागची पान पुन्हा वाचून बघावीत अस या गाण्यातले भाव दाखवतात.  

कवी योगेश यांचे शब्द आणि सलिल चौधरी यांच् सुमधुर संगीत आणि या गाण्यातल्या अव्यक्त भावना व्यक्त व्हाव्यात या साठी मदत करणारा वाद्यमेळ. आणि या भावना सखोलपणे आणि चपखलपणे आपल्यापर्यंत पोचवणारा मधुर आवाज मुकेश यांचा.  या त्रयीवर कडी म्हणजे हे भाव सुत अन सुत , रेघ अन रेघ आणि शब्द अन शब्द आपल्या expressions मधून आपल्या काळजापर्यंत सहजी पोचवणारा चेहरा अर्थात राजेश खन्ना. हा चित्रपट आणि विशेषकरून हे गाण. इतक्या सार्थपणे, अभिनयातून मांडण्याची ताकद असलेला कसदार अभिनेता. ज्याची चेहर्याशी रेश अन रेश बोलते.

परत या गाण्याकड़े वळताना.

कहीं दूर जब दिन ढल जाये
सांझसी दुलहन बदन चुराये चुपकेसे आये
मेरे खयालों के आंगन में
कोई सपनों के दिप जलाये दिप जलाये

गत काळातील त्या सुवर्णमयी स्वप्नवत वाटणाऱ्या क्षणाना ,त्या हरवलेल्या आनंदाला आठवत, त्या क्षणाना जवळ बोलावत, त्याना चुचकारत, त्यांच्यां आठवाने  सूखावलेला आनंद त्या "कोणाला"तरी एकप्रकारे बोलावत आहे. त्या आठवणी आता जवळ नसण्याचा काहीतरी हरवल्याचा एक सूक्ष्म भास , एक कारुण्याची झालर त्याच्या आजच्या जीवनाचा गाभा असल्याची सल त्याला बोचते.  त्याला मनात हे प्रत्यक्ष नसून ही स्वप्नच आता आयुष्याचा, जगण्याचा भाग आहे, किंवा इतकंच आता हातात उरलय ही जाणीव  तो व्यक्त करतोय.

गाण्यात ऐकूण तीन कड़वी आहेत त्यांचाहि विस्ताराने आढावा घेऊयात पण ......

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०३/०१/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...