।। कर्म गती सिद्धांत ।।
हे मानवा , हे बघ संपूर्ण ब्रह्मांड. याच संपूर्ण अस्तित्व, चलन, आणि अंत माझ्यापासून सुरु होतो. माझ्यातच याची समाप्ती. सर्व चल ,अचल , जीव - सजीव अथवा निर्जीव श्रुष्टीचा कर्ता , धर्ता , हर्ता मीच आहे. इथल्या प्रत्येक प्राणीमात्रावर मी लक्ष ठेवून आहे.
देवा इथे एक शंका आहे देवा .
बोल मी त्याच साठी आलोय.
सजीव ठीक आहे पण निर्जीव वस्तू वर नजर, म्हणजे.
अरे तुझ्या दृष्टीने ती निर्जीव म्हणून मीही निर्जीव म्हणालो. अन्यथा या जगात अस्तित्वात असलेल्या आणि, निर्माण होऊन नष्ट झालेल्या प्रत्येक गोष्टीच महत्व आणि स्थानमहात्म्य मी जाणतो. तू जाणत नाहीस इतकच . आणि या ब्रह्मांडाच चलन अहेतुक, नसून हेतुपूर्ण आहे. ते सतत , निरंतर, व्यवहारी राहावं याचसाठी कर्मसिद्धांताची निर्मिती केली. सर्व गोष्टी आपसूक, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय व्हावयात सुरळीत आणि स्वयंचलित पणे व्हाव यासाठीची सर्व व्यवस्था मी केली आहे. कर्माच्या कोणत्याही व्यवहारात मी कधीही हस्तक्षेप करत नाही. मग चमत्कार वगैरे जे आम्ही म्हणतो ते कसे करता, अथवा होतात. मुळात तुम्ही ज्याला चमत्कार म्हणता तो कर्मसिद्धांताचा एक भाग असतो. कोणाच्याही कर्मात जर एखादी गोष्ट, वस्तू, व्यक्ती त्याची त्याने लिहून ठेवली असेल, तर ती त्याला मिळण्यापासून जगातील कोणतीही व्यक्ती, शक्ती, वा युक्ती त्यापासून त्याला वंचित करूच शकत नाही. इतका साधा आणि सोप्पा सिद्धांत प्राणी मात्राना अवगत असून, वेळोवेळी मी सांगत असून सुद्धा समजत नाही , हे खरंच खेदजनक आहे. आणि याच सिद्धांतावर त्यांना कर्मफल मिळते आणि अपेक्षित असते , पण तरी ते नाकारण्याचा हट्ट असतो. जे आपल्या समोर आलं ते आपलच कर्मफल आहे हे ज्ञात नसावं हे अतर्क्य आहे.
देवा यात मला काही प्रश्न, उपप्रश्न आहेत.
ठीक आहे आज इतकच. उद्या बोलू सवडीने.
क्रमशः
प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment