शब्दाना अर्थ नसतो
शब्दाना अर्थ नसतो तो उद्देश्यातून प्राप्त होतो
शब्द चांगले, वाइट नसतात कधीच
कारणातून त्याना महत्व प्राप्त होते.
शब्द चांगले, वाइट नसतात कधीच
कारणातून त्याना महत्व प्राप्त होते.
शब्द कधीच टोचत नाहीत ,
तर त्यामागचा अर्थ टोचतो , बोचतो, खटकतो.
शब्द कधीच बाण नसतात कधीच तीरही नसतात
त्याना धरून मारणारा, आणि उद्देश्य ठरवतो.
त्याना धरून मारणारा, आणि उद्देश्य ठरवतो.
शब्दजाल जाळ कधीच नसत कधीच अड़कवत नसत
जाळ तर ते शब्द पेरणारा मांडत असतो.
जाळ तर ते शब्द पेरणारा मांडत असतो.
शब्द वाद, विवाद, प्रतीवाद , कधीच नसतात
वाद तर स्वतःची बाजू मांडणारा निर्माण करतो.
वाद तर स्वतःची बाजू मांडणारा निर्माण करतो.
शब्द अर्थवादी, प्रवाही, सकारात्मक वा नकारात्मक कधीच नसतात ,
त्यांचा बोलावता धनी जो अर्थ ध्वनित करतो त्याचा आपण काय अन्वयार्थ
लावतो त्यावर ते अवलंबून असत.
म्हणून शब्दांची किंवा त्यांच्या बाणांची दिशा आपणच ठरवतो.
असं खूप वेळा घडत कि एखाद्या व्यक्तीला आपण डोक्यातून किंवा मनातून
काढून टाकतो. त्यावेळी त्याने उच्चारलेले शब्द, बोल, हे आपल्याला लागत नाहीत किंवा आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही. म्हणजेच आपल्याला शब्द नाही बोचत त्यांचा ध्वनी जो उच्चारणारा असतो तो खटकतो . अर्थ त्याला नन्तर व्यक्तिसापेक्ष आपण देतो.
म्हणजेच प्रत्येक शब्दाला आपण अर्थ प्राप्त करून देतो. मग असं कास म्हणता येईल कि
त्याने माझा अपमान केला, किंवा त्याच्या बोलण्याचा मला राग आला. शक्यच नाही.
कारण दोन पैकी एक असत्य असेलच ना.
म्हणून शब्दाच्या मागे न धावता त्याचा अर्थ , अनर्थ समजून मग त्यातून निष्कर्ष काढा.
यामुळे दोन गोष्टी साध्य होतील.
१. होणारा अनर्थ, वेळेचा अपव्यव, वाद विवाद, प्रतिवाद, चुकीचा प्रतिसाद या सर्व गोष्टी टळतील. गैरसमज होणार नााहीत.
आणि
२ आपण योग्य अर्थापर्यंत पोचल्यामुळे संवाद वाढेल, कारण
खरा संवाद हा मनाचा मनाशी असतो. असवा
शब्द, अर्थ, भाव, हे सर्व एक माध्यम आहे आपणच ठरवलेलं. एक उदाहरण देतो म्हणजे पटेल
१ या आकडयाला आपण एक मानलं आणि जग पुढे गेलं, अन्यथा तो एक शब्दोच्चार आहे निव्वळ;
म्हणजेच सर्व मानण्यावर आहे.
मग आजपासून अर्थ काढा अनर्थ टाळा.
शुभस्य शीघ्रम
प्रसन्न आठवले.
२७/११/२०१७
१८:२३
Comments
Post a Comment