जीवन सुगंध - ८
मायेचा हा पसारा, हा खेळ, हे अजब तर्क वितर्क, हे वेग वेगळे अनेक मार्ग, अनेक क्लुप्त्या, खूप सहज आणि सोप्या वाटल्या तरी त्याचा तोड काढणं तेवढंच अवघड आणि कर्मकठीण काम आहे. माया हि मुख्यतः भगवंताची सावली असल्या मूळे भगवंताच्या मार्गात सर्वप्रथम आड येते. तीच मुख्य वैशिष्ट्य कि ती आधीच बुद्धीचा ताबा घेते. जेणेकरून सद्सद्विवेक बुद्धी काम न करता माणस जे सुचेल त्या तर्क वितर्क या नावाखाली आपल्या सर्व कर्माना बसवण्याचा प्रयत्न करतो.
या योगे हे तो सिद्ध करतो कि मी केलेलं प्रत्येक कर्म अपरिहार्य आणि न्यायसंगत होत आणि प्राप्त परिस्थितीत ते कर्म हे सर्वश्रेष्ठ आणि अंतिम मार्ग होता. या सर्व तर्क वितर्कांचा उदगाता त्याची बुद्धीच असल्याचे त्याला भासत असल्यामुळे तो याच भ्रमात राहतो कि मी कर्ममार्गावर योग्य वाटचाल करत आहे आणि अंतिम सत्य जे परमेश्वर आहे त्या पर्यंत पोचेन. यामध्ये तो बऱ्या वाईट सर्व कर्माना न्यायसंगत मानतो आणि तसे बुद्धीतर्कांने सिद्ध पण करू शकतो. काही विशिष्ट प्राप्त परिस्थितीमूळे त्याचे म्हणणे सिद्ध सुद्धा होऊ शकते. पण ते अंतिम सत्य असू शकत नाही आणि इथेच माया त्याचा बुद्धीभ्रम करते. कसे ते पाहू.
Comments
Post a Comment