Skip to main content

जीवन सुगंध - ८


जीवन सुगंध - ८
 
 
मायेचा हा पसारा,  हा खेळ,  हे अजब तर्क वितर्क,  हे वेग वेगळे अनेक मार्ग,  अनेक क्लुप्त्या,  खूप सहज आणि सोप्या वाटल्या तरी त्याचा तोड काढणं तेवढंच अवघड आणि कर्मकठीण काम आहे.  माया हि मुख्यतः भगवंताची सावली  असल्या मूळे भगवंताच्या मार्गात सर्वप्रथम आड येते.  तीच मुख्य वैशिष्ट्य कि ती आधीच बुद्धीचा ताबा घेते.  जेणेकरून सद्सद्विवेक बुद्धी काम न करता माणस जे सुचेल त्या तर्क वितर्क या नावाखाली आपल्या सर्व कर्माना बसवण्याचा प्रयत्न करतो. 

 या योगे हे तो सिद्ध करतो कि मी केलेलं प्रत्येक कर्म अपरिहार्य आणि न्यायसंगत होत आणि प्राप्त परिस्थितीत ते कर्म हे सर्वश्रेष्ठ आणि अंतिम मार्ग होता.  या सर्व तर्क वितर्कांचा उदगाता त्याची बुद्धीच असल्याचे त्याला भासत असल्यामुळे तो याच भ्रमात राहतो कि मी कर्ममार्गावर योग्य वाटचाल करत आहे आणि अंतिम सत्य जे परमेश्वर आहे त्या पर्यंत पोचेन.  यामध्ये तो बऱ्या वाईट सर्व कर्माना न्यायसंगत मानतो आणि तसे बुद्धीतर्कांने सिद्ध पण करू शकतो.  काही विशिष्ट प्राप्त परिस्थितीमूळे त्याचे म्हणणे सिद्ध सुद्धा होऊ शकते.  पण ते अंतिम सत्य असू शकत नाही आणि इथेच माया त्याचा  बुद्धीभ्रम करते.  कसे ते पाहू. 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...