कवडसा
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,
तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)
कहाणी एका संघर्षाची सुरु …२७
समोरच्या व्यक्तीचा बुध्यांक आणि मूळ स्वभाव ओळखून मग
त्याच्याशी सलगी करण
किंवा न करण हे तो क्षणार्धात ओळखतअसे
त्याला एक प्रकारे त्याची दैवी
देणगी होती. निमिषार्धात समोरच्या
माणसाला आपदमस्तक ओळखणं हा त्याला
सहजसाध्य होत अगदी
फोन वरून बोलणाऱ्या माणसाचा स्वभाव ओळखण हे त्याला
आपसूक
जमत असे.
म्हणून पटकन कोणालाही फार जवळ न करण त्याला जमत असे.
तो माणूसघाणा वाटला
तरी माणासाशी बोलण्या आधी त्याचा
स्वभाव दृष्टीसमोर उभा राहात असल्यामुळे
तो स्वभावानुसार आपलं
वागणं आधीच मनात ठरवत असे .
अश्या या काहीश्या गूढ
स्वभाव वैशिष्ट्य असलेल्या व्यक्तीचा शीतल
विचार करत बसली असताना आशाताई खोलीत येतात.
शीतल पटकन सावरत आईला विचारते कुठे जाऊन आलीस
आई : इथेच बाहेर जाऊन आले जरा फळ आणली उद्या कदाचित
आपल्याला डिसचार्ज मिळेल म्हणून बाकीची तयारी करत होते
तूझं चेकअप झालं का
काय म्हणाले डॉक्टर असुदे मीच भेटीन त्यांना नंतर
शीतल : बर मी पडते जरा थोडा दमल्यासारखं वाटतंय
आई : उगाच जास्त विचार करत बसू नकोस आम्ही आहोत तू
एकटी नाहीस इतका छान भाऊ आणि भावजय मिळाल्यावर का
उगाच चिंता करतेस
शीतल : अग मी फक्त कधी बरी होईन त्याचा विचार करते बाकी
काही नाही
आई : बर झोप तू
शीतल : आई एकदा त्या योगेंद्रला बघून येतेस
आई : का तुला झोप येत नाहीये का
शीतल : अग तस नाही पण त्याच्या कडून कोणीच आलं नाही
म्हणून. एकटाच आहे तो.
आई : असुदे तू खूप विचार करू नकोस झोप
शीतल : माणुसकी म्हणून
आई : जाउन येते
शीतल : किती छान आहेस तू आता मी शांत झोपते अजिबात
डिस्टर्ब करू नकोस
आई : त्याची ख्याली खुशाली सांगेन उठवून
शीतल : काही नको तू जाऊन ये आणि नंतर सांग मला
शीतल झोपली शांत आणि आशाताई योगेंद्रला बघायला त्याच्या रूम
कडे गेल्या.
क्रमशः
Comments
Post a Comment