Skip to main content

कवडसा २६






कवडसा 

(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , 
 
तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)  
 
कहाणी एका संघर्षाची सुरु …२६
 
 
योगेंद्र पुरोहित मध्यम उंची दिसायला सुंदर गोरा रंग काळेभोर डोळे 
 
थोडासा लाजरा बुजरा फार चार चौघात पटकन न मिक्स होणारा. 
 
पण तरीही एक आत्मविश्वास असलेला असा एक उमदा माणूस होता 
 
पूर्ण सकारात्मक दृष्टी असलेला अगदी निराशेच्या गर्तेत गेलेल्या 
 
माणसाला सुद्धा त्याच्या कडे पाहून उत्साह येईल. थोडं गाण्याचं अंग 
 
असलेला गिटार उत्तम वाजवणारा आणि वेळ मिळेल तेंव्हा गिटार 
 
घेवून त्यावर सुंदर गाणी वाजवत बसणं हा त्याचा आवडता छंद होता 
 
नाद होता म्हणा. 
 
पण लोकांमध्ये फार मिक्स होत नसल्यामुळे थोडा माणूस घाणा 
 
वाटणारा पण प्रत्यक्षात बोलायला लागला कि मोहक बोलणारा
 
त्याचा आध्यात्म आणि तत्वज्ञान या विषयाचा छान अभ्यास होता
 
आणि या विषयावर बोलायला लागल्यावर तास चे तास बोलू 
 
शकणारा. आणि हे विषय गहन असल्यामुळे फार गम्य नसलेल्या 
 
लोकांसमोर तो हा विषय आणि त्यावरील मत कधीही मांडत नसे . या
 
विषयावर एक लेखमाला एका मासिकात तो लिहित असे .
 
आणि त्या निमित्ताने त्याचा नियमीत वाचक वर्ग व त्यांच्याशी संवाद 
 
व पत्रव्यवहार होत असे. 
 
तरीही एक होत कि फार गंभीर व्यक्तित्व नव्हतं त्याच. अगदी सहज 
 
आणि नर्म विनोदि शैलीत तो बोलत असे किंवा  त्याचा तो नैसर्गिक 
 
अंदाज होता इतक्या गंभीर विषयात रुची असून सुद्धा इतका विनोदी 
 
शैलीचा कसा असा त्याला ओळ्खणाऱ्याना संभ्रम होत असे. खूप 
 
कमी बोलत असल्यामुळे  त्याच्या तश्या ओळखीपण फार नव्हत्या 
 
किंवा फार वाढवणं त्याला जमत नसावं आणि आवडत नसावं  .   
 
 
क्रमशः 


Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...