Skip to main content

मय्या मी न खाई नवनीत


गोकुळाष्टमी काल साजरी झाली. आज दहीकाला त्यानिमित्ताने संतकवी सुरदास यानी लिहुन अजरमार केलेल्या गीताला मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. "मय्या मोरी मै नही माखन खायौ "


का घेसी आळ मजवरी
मय्या मी का तुझा वैरी 
मी न खाई नवनीत
मय्या मी न खाई नवनीत

भल्या पहाटे हाती देसी
लाठी घोंगडी नाजूक हाती
धाडसी वनी गोधनासंगे
तिथे पावा उरतो हाती 
सांजेला घरी येई परत 
खाई कधी नवनीत 
मय्या मी न खाई नवनीत

बालक मी किती ग सानुला
नाजूक हात कसे पोचती
शिंक्यावर मैय्या तू ठेवसी
गवळीबाळे बळेच देती
मुखी घालीती घास 
मी न खाई ग नवनीत
मय्या मी न खाई नवनीत

मय्या तुझ्या मनी काय ग  
सांगती जन जे विश्वासे तु 
त्यांच्या वचनावर विसंबुन
मज जाणसी का परका तु
तुला पाहुनी भोळी जननी
काहीही गवळीणी सांगतात 
परी मय्या मी न खाई नवनीत 
मय्या मी न खाई नवनीत

असा तुझ्या मनी भेद असता
फुकाचे मी काम का करावे
ही घे लाठी अन घोंगडी
गोधन चरण्या कुणाही द्यावे
मजला हे ना रुचे वागणे
मय्या का खाईन मी नवनीत 
मय्या मी न खाई नवनीत

© ® कवी ः प्रसन्न आठवले

१२/०८/२०२०

०३ः३७

दहीहंडी दिनानिमित्त 












Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...