Skip to main content

श्रीराममंदिर निर्माण कार्य आरंभ झाल्याबद्द्ल क्रुतज्ञता, आभार, शुभेच्छा आणि सदिच्छा !!!!!


श्रीराममंदिर निर्माण कार्य आरंभ झाल्याबद्द्ल क्रुतज्ञता, आभार, शुभेच्छा आणि सदिच्छा !!!!!


५ ऑगस्ट, २०२० हा दिवस खरच सनातन हिंदू धर्माच्या गेल्या सातशे ते आठशे वर्षांच्या जुलमी राजवटीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. गत काळाच्या  आक्रमकांच्या खुणा पुसून तिथे मूळ संस्कृतीच्या स्थापत्याला प्रस्थापित करण्यासाठी, आक्रमकांची सत्ता आणि सद्दी संपल्यानंतर, म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, वास्तविक पूर्ण सक्षमतेने आणि कोणत्याही अडथळ्याविना सोमनाथ पाठोपाठ लगेचच सुरवात व्हायला हवी होती. खात्रीने सांगतो की, जर सरदार पटेल १९५० नन्तर जीवित असते, तर नक्कीच सोमनाथनंतर काशी, मथुरा आणि अयोध्या ही प्रातिनिधीक स्थानं १९५० च्या दशकातच मुक्त झाली असती.

आज या गोष्टीचा विचार केला तर कदाचित, जी गोष्ट ६०, ७० वर्षांपूर्वी सहजी करून तो मुद्दा लोकांच्या हातात जाऊ न देता सोडवून अन्यायाची भावना वेळीच दूर केली असती, तर त्यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या असत्या. 

१. सत्तर वर्षात हिंदूंना जी अखंड अन्यायाची भावना सतत जाणवत राहिली, ती मुळात जागृत झाली नसती. 

२. सोमनाथमंदिरावर फारशी चर्चा न होता तो मामला मंदिर जीर्णोद्धारानंतर पडद्याआड गेला. म्हणजेच अन्यायाचं परिमार्जन झाल्यानंतर हिंदू समाज त्याच्या इतिहासात फार जात नाही. तसाच तो इतर स्थानं मुक्त होऊन जिर्णोद्धार पुर्ण झाली असती तर देशात खुप काही सकरात्मक याआधीच घडलं असतं. 

३. सत्ताधारी पक्ष आपल्या हिताच्या कोणत्याही गोष्टीला फार महत्व न देता मुद्दा डावलण्यात जास्त रस घेतो, म्हणजेच हा पक्ष वा ही संघटना बहुसंख्य असलेल्या हिंदूंच्या विरुद्ध आहे आणि राहील ही भावना प्रबळ होण्यात त्यामुळे भरच पडली.

कारण युगानुयुगे श्रीराम हे जनमनासाचं श्रद्धास्थान, आस्थेचं प्रतीक आणि प्रेरणेचा स्रोत आहेत. वास्तविक सोमनाथ प्रमाणेच काशी, मथुरा व  अयोध्या ही प्रातिनिधिक धर्मस्थानं नक्कीच जीर्णोद्धार करून अन्यायाची भावना बऱ्याच प्रमाणात दूर करता आली असती. असो आता हे बघूया की श्रीराम हे दैवत, ज्यांच्या फक्त नामानेच जगात असुर नाश होतो. त्यांच्या श्रद्धास्थान पुनर्बांधणीला सुरवात व्हायला इतका उशीर का लागावा. 

मुळातच प्रभू श्रीराम हे संयम , गंभीर, शांत आणि धीरता यांचं प्रतीक आहे. संपूर्ण आयुष्य त्यांनी न्यायाची, सत्याची, धर्माची, नीतीची स्थापना करताना कोणताही अन्याय वा कोणत्याही मर्यादांचं उल्लंघन होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. प्रत्यक्ष असुरांना वधताना वा निर्दालन करताना कधीही त्यांना कोणताही मर्यादाभंग वा संयम सुटेल वा तोल जाईल अशी कृती कधीही केली नाही. प्रजेला नितीविरुद्ध कृत्य वाटल्याकारणाने प्रत्यक्ष धर्मपत्नी सीता माऊलींचा देखील त्याग करायला मागेपुढे पाहिलं नाही. 

त्यामुळे आपल्या स्वतःच्या मंदिर निर्माणाच्या कार्याला उचित बळ देताना न्याय कुठेही थोपवला वा लादला जाणार नाही याची पूर्ण काळजी त्यांनी स्वतःच घेतली. वादग्रस्त वास्तू असलेली बाबरी मशीद पाडण्याचं महत्कार्य अर्थातच जनामनासाचा रेटा पाहून त्यांच्याच कृपेने साध्य झालं. त्यांच्या कृपेशिवाय या कार्याचं एक सूत सुद्धा पुढे सरकलं नाही. म्हणून सनातन हिंदू जनसामान्यांच्या भावनांचा आदर ठेवून तरीही न्यायसंगत आणि संयत मार्गानेच हा प्रश्न सुटून तद्नंतरच हे मंदिर स्थापित व्हावं ,ही रामावतारधारी जगतपतींची इच्छा असावी.

याच कारणामुळे अनेक शतकं प्रतीक्षेत आणि लोकांच्या श्रद्धेचा परमोच्च बिंदू असलेलं प्रभुश्रीरामांच्या जन्मस्थानी प्रभूंचं मंदिर कायदेशीर लढाई, प्रक्रिया पूर्ण होऊन, न्यायसंगत मार्ग निघून पूर्ण झालं.  अर्थात यासाठी आवश्यक तो सत्ताबद्दल घडवून आणायचं कार्य प्रभुकृपेनेच झालं, हे वेगळं सांगायला नको.  आता आशा करूयात की, लवकरात लवकर हे भव्यदिव्य आणि अद्भुत मंदिर पूर्ण होऊन आपल्याला अयोध्येत जाऊन त्या दर्शनाचा लाभ घेता येईल. 

अश्या या श्रीराममंदिराच्या यशस्वी लढ्यात कार्य केलेल्या, बलिदान दिलेल्या आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपला अनमोल सहभाग, पाठिंबा, आपलं सहकार्य, आपल्या सदिच्छा शुभेच्छा, आपला खारीचा वाटा उचललेल्या सर्वांचे समस्त हिंदू जनमानस आसूर्यचंद्र ऋणी राहील. त्यांच्या बलिदानाचे ऋण कधीही न फिरणारे आहेत आणि त्या ऋणातच राहणं समस्त हिंदू योग्य समजतील.

पुन्हा एकदा हिंदु जनमानसाच्या आशाआकांक्षांचं प्रतीक असलेलं श्रीराममंदिर उभारणी सुरू झाल्याबद्दल सर्वांना सहर्ष शुभेच्छा .!!

©® लेखन : प्रसन्न आठवले
०६/०८/२०२०
०९ः०२







Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...