कालच्या मॅचचा मला वाटलेला महतवाचा मुद्दा , जो दुर्लक्षिला गेला. कालच्या मॅचचा खूप महत्वाचा पैलू जो बरेच जणं दुर्लक्षित करत आहेत. त्यावर फक्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे, न्यूझीलंडचा खेळ नक्कीच उल्लेखनीय झाला यात वाद नाही. पण इंग्लंडच्या शेवटच्या जोडीने ५० व्या षटकात हव्या असलेल्या १५ रन्स केल्या हे नक्कीच क्रेडीटेबल आहेच. या गोष्टीकडे बऱ्याच क्रिकेट रसिकांचं दुर्लक्ष झालं. निदान तितकं क्रेडिट शेवटच्या जोडीला देणं गरजेचं आहे. कोणत्याही अश्या उत्कंठावर्धक मॅच मध्ये शेवटची जोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व सर्व प्रकारच्या इतक्या दबावाखाली ६ बॉल आणि १५ रन्स हे टार्गेट पूर्ण करू शकली नाही तरी ते कदाचित फार महत्वाचं वाटलं नसतं . फार तर लोकं म्हणाले असते कि त्यांनी प्रयत्न केला. पण इथे तर त्यांनी १५ रन्स काढल्यामुळेच सामना बरोबरीच्या उत्कंठेला आला. एक क्रिकेट रसिक म्हणून मला वाटलेला खूप महत्वाचा मुद्धा मांडला.. यावर मतमतांतरे असू शकतात आणि त्याचा स्वीकार आहे.