Skip to main content

Posts

Showing posts from July, 2019

कालच्या मॅचचा मला वाटलेला महतवाचा मुद्दा , जो दुर्लक्षिला गेला.

कालच्या मॅचचा मला वाटलेला महतवाचा मुद्दा , जो दुर्लक्षिला गेला. कालच्या मॅचचा खूप महत्वाचा पैलू जो बरेच जणं दुर्लक्षित करत आहेत. त्यावर फक्त प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे, न्यूझीलंडचा खेळ नक्कीच उल्लेखनीय झाला यात वाद नाही. पण इंग्लंडच्या शेवटच्या जोडीने ५० व्या षटकात हव्या असलेल्या १५ रन्स केल्या हे नक्कीच क्रेडीटेबल आहेच. या गोष्टीकडे बऱ्याच क्रिकेट रसिकांचं दुर्लक्ष झालं. निदान तितकं क्रेडिट शेवटच्या जोडीला देणं गरजेचं आहे. कोणत्याही अश्या उत्कंठावर्धक मॅच मध्ये शेवटची जोडी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व सर्व प्रकारच्या इतक्या दबावाखाली ६ बॉल आणि १५ रन्स हे टार्गेट पूर्ण करू शकली नाही तरी ते कदाचित फार महत्वाचं वाटलं नसतं . फार तर लोकं  म्हणाले असते कि त्यांनी प्रयत्न केला. पण इथे तर त्यांनी १५ रन्स काढल्यामुळेच सामना बरोबरीच्या उत्कंठेला आला. एक क्रिकेट रसिक म्हणून मला वाटलेला खूप महत्वाचा मुद्धा मांडला.. यावर मतमतांतरे असू शकतात आणि त्याचा स्वीकार आहे. 

लहानपण आणि पावसाळा

लहानपण  आणि  पावसाळा जून आला कि साधारण पावसाळ्याचे वेध लागायचे दिवस होते त्यावेळचे. त्यावेळचे म्हणजे साधारण ७५ ते ८२ दरम्यानचे. वळवाचा पाऊस साधारण २० ते २५ मे ला पडायचा...

गोग्रासवाडी (डोंबिवली) १३

गोग्रासवाडी (डोंबिवली) १३ जून आला कि साधारण पावसाळ्याचे वेध लागायचे दिवस होते त्यावेळचे. त्यावेळचे म्हणजे साधारण ७५ ते ८२ दरम्यानचे. वळवाचा पाऊस साधारण २० ते २५ मे ला पडायचाच. हे सर्व पाऊस न पाडण्याचं लफडं साधारण ९५ ते २००० नन्तर सुरु झालं. २५ मी नंतर पावसाळा दाखल व्हायचा. गोग्रासवाडीत साधारण प्रत्येक खेळाच्या  अलिखित वेळा वा काळ असायचा. मे मध्ये हे खेळ म्हणजे क्रिकेट, लगोरी, करवंटी डब्बा ऐस पैस , भोकंजा हे सकाळी वं आ संध्याकाळी दिवे लागायच्या आत. पण दुपारी पत्ते , कॅरम, यासारखे बैठे खेळ. पट्ट्यांमधले बरेचसे खेळ आता इतिहासजमा झाले असतील, वा काही काळाने होतील. पण पाऊस सुरु होणार असला कि एक वेगळाच भरलेपणा असायचा सगळीकडे. एकतर त्यावेळी पाऊस म्हणजे अक्षरशः धो धो अर्थातच शब्दशः धो धो पडायचा. एकदा सुरु झाला कि, ४,४, दिवस न थांबता पडायचा. पण कदाचित माती भरपूर असल्यामुळे पडलेल्या पाण्याचा निचरा पटकन व्हायचा, म्हणजेच जमिनीत पाणी लवकर जिरायचं. पण गोग्रासवाडीत डोंबिवलीच्या इतर भागापेक्षा मातीचं प्रमाण जास्त असल्यामुळे किंवा डामरी रस्त्याचा मागमूससुद्धा नसल्यामुळे सगळिकडे माती आणि मातीत चि...

देवकी - ५

देवकी - ५ त्या क्षणात माझ्या जागी इतर कुणीही असतं तर कदाचित एक क्षण अशीच अवस्था झाली असती. पण यादवराज वसुदेव , इतकं धीरोदात्तपणे , अभूतपूर्व संयमाने दादाला अडवत आणि खड्गाकड...

देवकी - ४

देवकी - ४ त्या आकाशवाणीत जे ऐकलं त्याने , एक क्षण श्वास बंद झाले. वाटलं सर्व आताच संपलं. कारण दादाचा संताप , त्रागा, क्रोध हे सर्व मी पाहिलं आहे.  क्वचित सेवक सेविका काही चर्चा क...

देवकी - ३

देवकी - ३ खर तर मला त्यांच्या या स्वभावाचा प्रारंभी भारी राग येत असे. इतका शांत स्वभाव राग न येता समोरच्या व्यक्तीला समजावून सांगणं हे खरं तर विचित्र वाटायचं. अनेकदा मी बोल...

देवकी - २

देवकी -२ ज्येष्ठ भ्राता कंस  प्रथमपासून रागीट , महत्वाकांक्षी आणि सत्ता मिळवून ती राबवण्यात नव्हे तर काबीज करून आपल्या कह्यात ठेवण्याची मनीषा बाळगून असलेला. कित्येकदा ...

देवकी - १

देवकी -१ सर्व दुःखांचा अंत हा शेवटी मृत्यूत होतो.  अर्थात तोदेखील या देहातील भोगांबाबत अस म्हणता येऊ शकेल. पण अश्या भोगांच्या योगातून पळून जाण्यासाठी,   मृत्यू हे पलायनअ...