Skip to main content

गोग्रासवाडी (डोंबिवली) ५

गोग्रासवाडी (डोंबिवली) ५

ते सिनेमे बघण्यातली मजा तिथेच संपली, जेंव्हा हे मोठ्या पडद्यावर सिनेमे दाखवणं बंद झालं. मला आजही वाटत की असण्यापेक्षाही, नसताना थोडं मिळण्यातली गोडी वेगळी होती. आज अगदी सर्व आहे आणि यु ट्यूब वर कोणताही जुना, नवा सिनेमा पाहता येतो. पण काही सोयी नसताना जे थोडस, कधी कधी, अस सण, समारंभात सिनेमा बघायला मिळत होतं, त्यातली गोडी अवीट आहे  आणि आजसुद्धा अवर्णनीय आहे. असो.

गणेशोत्सव जिथे भरायचा ते गोडाऊन जिथे आहे तिथेच त्या मागेच गोग्रासवाडी संस्थेने बांधलेली भली मोठी चाळ वजा वस्ती होती. साधारण १५, २० बैठी घर असतील त्यामध्ये. त्यातली काही नाव लक्षात आहेत वानगीदाखल मेहेंदळे (३,४ भाऊ होते ) राजू पेंडसे ( हा स्वामी विवेकानंद मध्ये असताना  वर्गमित्र होता. आता बदलापूरला असतो) पंड्या ( हे सुद्धा ३,४ भाऊ होते, यातील एकाच  कन्हैय्या नाव होतं, पण त्याला सगळे कण्या म्हणायचे ) , वल्लभदास, वाईंगणकर, जोशी इत्यादी आठवतात,  आता .

या गोडाऊन वरून तसच पुढे गेल की, एक छोटंसं बैठ , कौलारू बांधकाम ( बहुदा ही कचेरी असावी. त्यांनतर अजून एक गोठा, पण आमच्यावेळी गोडाऊन म्हणून वापरलं जायचं. त्याच्यावरून पुढे लगेचच दोन्हीकडे मोकळी जागा होती. त्यातील एक राखीव असेल. कारण त्याला कंपाऊंड होत.  एक मात्र छोट मैदान असल्यासारखी मोकळी होती. पण यालासुद्धा कंपाऊंड होत पण ते तोडण्यात आलं होतं.   गोग्रास वाडीच्या चाळीत राहणारी मुलं कधी कधी या छोट्या मैदानावर खेळायची. त्याच मैदानातून पुढे गेल की, गोग्रास वाडीतील तीन प्रसिद्ध देवळ अर्थातच मंदिरं होती. आतसुद्धा आहेत. पण आता पाच आहेत. कारण मधल्या जागेत अजून दोन मंदिरं बांधलीत. 

या तीन मंदिरांपैकी पाहिलं श्रीराम लक्ष्मण, जानकी आणि हनुमान अस एक मंदिर आहे.  चारही मूर्ती संगमरवरातल्या सुबक मध्यम आकाराच्या आणि  सुंदर आहेत. त्यातला हनुमंत एक गुढगा टेकून, खांद्यावर गदा ठेवून बसलेला असा आहे. तिन्ही राम जानकी व लक्ष्मण या मूर्ती उभ्या आहेत आणि यांना सुंदर सुंदर वस्त्र परिधान करून सजवलं जातं, दररोज सुद्धा आणि रामनवमीला विशेष. रामनवमीला इथे कीर्तन सुद्धा असायचं आणि सुंठवडा प्रसाद म्हणून मिळायचा. माझ्या माहितीप्रमाणे मेंदीच्या पानातील गायक भानुदान देशपांडे यांची आई इथे रामनवमीला कीर्तन करायच्या.  जाणकार प्रकाश टाकू शकतात

या मंदिरांची एक आठवण म्हणजे ते दाढीधारी वयस्क पुजारी होते, ते पूजा करत असताना कोणी गेलं की पळीतून शर्करा मिश्रित  दूध द्यायचे तीर्थ म्हणून. आजसुद्धा त्याची गोडी जिभेवर आहे. ते पळीभर मिळायचं तेंव्हा वाटायचं यांनी पूर्ण भांडभर तीर्थ आपल्याला द्यावं. पण थोडक्यात गोडी हे आज पटतंय आणि म्हणूनच आजसुद्धा त्याची चव जिभेवर आहे , जाणवते.  आज कप, दोन कप दूध पिऊन सुद्धा त्या पळीभर दुधाची म्हणजे तीर्थाची चव त्याला नाही, हे नक्कीच.

यातलं दुसरं देऊळ हे

त्रयमुर्ती अवतार मनोहर
रूप साजिरे तेज सर्वदूर
कृपावंत श्रीगुरु जगतीचे
गुरुतत्वाचे आद्य पीठवर

जपा जपा हो दत्त दिगंबर
मना वाटते समाधान जे
तिन्ही लोके फिरुनी मिळेना
आत्मानुभूती देई नाम जे

त्रिशूळ करी आशिष ही देई
सहा हस्त मुखेही तीन ती
अनूसयेने तपोबळाने
तिन्ही देवा बालक केले

दत्त दत्त हे नाम धरिले
कलियुगाचे त्राता झाले
परंपरेचे आद्य गुरू हे
दत्त दिगंबर दैवत साचे

श्रीदत्त दिगंबर यांचं हे दुसरं देऊळ. सुंदर साची छोटी पण प्रभावंत त्रीमुर्ती. हे मधलं देऊळ .

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०३/०८/२०१८

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...