Skip to main content

Posts

Showing posts from November, 2019

श्रीरुक्मिणीस्वयंवर ७

श्रीरुक्मिणी स्वयंवर ७ llश्रीगणेशाय नमःll     llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   विद्येचे , वाङ्मयाचे , शब्दांचे , बुद्धीचे दैवत श्रीगजानन आणि देवी श्रीशारदा यांना सादर वंदन. परमपावन, मंगलमय, जगतकारण आणि जगतपालक भगवान श्रीकृष्ण यांना प्रणिपात. माझे सद्गुरू श्रीब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी माझ्या अल्पमतीतुन हे कार्य करवून घेण्याचे योजिले आहे त्यांनाही साष्टांग दंडवत.  हे तिन्ही लोकांतील देव ऋषी, गुरूवर आपण स्वये येऊन माझ्या लेखणीत अध्यात्मिक रसनिष्पत्ती करावी. त्यायोगे श्रोते व वाचक यांचे नेत्र व कर्ण तृप्तीप्रत न्यावेत. पण त्यातील तृप्तता पुढील वाचनाची अतृप्ती वा अभिलाषा जागृत करेल हे सुद्धा योजावे, ही नम्र प्रार्थना. ज्यायोगे आपले अस्तित्व आणि  या कथेतील आपलाही सहभाग, कथेच्या संपूर्ण यात्रेत, निश्चित राहील आणि वाचकांना यातील शब्द, अर्थ, गहनार्थ, काव्यात नाथांनी मांडलेली अद्भुतता, रसाळता यांचे यथार्थ दर्शन या गद्य प्रवासात  प्राप्त होईल.  हे काव्य वाचताना नाथांचा एक एक शब्द किती अनमो...

शाळा

शाळा, कर्तृत्वाची पहिली पायरी आणि आठवणींचं फिक्स्ड डिपॉझीट !! शाळा , गेल्या दिडशे वर्षातल्या कित्येक पिढ्यांचं बालपण जिथे गेलं , अशी व्यवस्था. गुरुकुल पद्धतीतून आपण इतक्या सहज ज्या व्यवस्थेत ब्रिटिशांमुळे आलो, त्या व्यवस्थेत आता कमीतकमी दहा बारा पिढ्या तरी  नक्कीच घडल्या असतील, गेल्या दिडशे वर्षात. याच व्यवस्थेत वाढलले, मोठे झालेले कित्येक जण आपापल्या लहानपणाला तिथेच सोडून पुढे जातात. पण त्या बालपणाच्या आठवणी आयुष्य व्यापून दशांगुळे उरतात. शाळा , प्रत्येकाच्या आयुष्यातील अनिवार्य गोष्ट. आधुनिक शिक्षण पद्धतीतील मूलभूत घटक. आई वडील यांनतर मानसिक , सामाजिक , बौद्धिक संस्कार, जाण , समज आणि विकास हे साधणारा दुसरा महत्वाचा पैलू.  कदाचित हिऱ्या प्रमाणेच पैलू पडणारा जवाहीर.  आमच्या , म्हणजेच टिळकनगर विद्या मंदिर डोंबिवली या शाळेबाबत नक्कीच या सर्व गोष्टी लागू होतात, हे अभिमानाने सांगताना खरंच आनंद नव्हे तर उर भरून येतो. आज आयुष्यात जे काही आहोत त्या सर्वांचं  श्रेय आमच्या या शाळेला जातं.  आमची १९८२ ची बॅच.  खरतर आमचा काळ, साधारण १९७५ ते १९८२ , राजकीय सामाजिक उत्थाप...

राजकारण

राजकारण हा शह काटशहांचा गेम  आज जो राजा उद्या त्याचा काय नेम प्रामाणिकता गुंडाळून ठेवावी लागते इथे फक्त जेत्याला नमन करावे लागते  पडद्यामागचे खेळ  प्रत्येकावरच नेम  राजकारण हा शह काटशहांचा गेम  शत्रू मित्र सर्व तुमच्या आमच्यात असतं  उगाच भांडणात गुंतून राहायचंच नसतं प्रत्येक दिवस इथे कधीच नसतो सेम  राजकारण हा शह काटशहांचा गेम  वजीर बरेच वेळा शत्रूशी करतो तह  आपल्याच राजाला देऊ शकतो शह  हुशार राजाही करेल वजीराचा गेम  राजकारण हा शह काटशहांचा गेम  इथे घोंगडी भिजत ठेवणं राजकारण डोळ्याने इशारे करणं हे ही राजकारण चारित्र्यवान रडती निलाजऱ्यांना फेम राजकारण हा शह काटशहांचा गेम  मित्र मित्र म्हणत कोणी खंजीर मारतात मित्राला दूर करून वैऱ्याला पूजतात  इथे स्वकीयांचाही नसतो काहीच नेम राजकारण हा शह काटशहांचा गेम  शेवटी ज्याची असते धूर्त चाल दूर नजर  त्याचाच बसेल तिर बरोबर निशाण्यावर कमळपाकळी करेल धनुष्याचा गेम  राजकारण हा शह काटशहांचा गेम  जो जिंकला तोच इथे श्रेष्ठ आणि थोर हरला त्याला उचलायला मिळेना दोर केवू लाग...

राजकीय विश्लेषण १२.११.२०१९

स्थितीचं विस्तृत विश्लेषण ! ( जरा मोठा आहे लेख)  शिवसेनेच्या स्थापनेनंतर बरीच वर्षे सेनेला उपहासाने वसंतसेना असं संबोधलं जायचं. बाळासाहेब हे प्रथमपासून आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध होते. किंबहुना तोच त्यांचा मूलतः स्वभावधर्म होता. पूर्ण आयुष्य ते त्याच शैलीत जगले , वावरले. अगदी आपल्याला त्यामुळे नुकसान होऊ शकतं वा होत आहे हे जाणवून सुद्धा त्यांनी कधीही तो स्वभाव त्यागला नाही वा बदलला नाही. मुळात सेनेची स्थापना ही तत्कालीन कॉमुनिस्ट पक्षाचं मुंबईतील वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी झाली हा बोलवा आहे आणि त्यामागे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे होते अशी वदंता होती.  या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेबांनी आपलं राजकारण पुढे नेलं. १९७५ च्या आणीबाणीला त्यांनी विरोध केला नाही. कारण ते स्वतः आक्रमक स्वभावाचे असल्यामुळे कदाचित ते त्या वेळी त्यांना रास्त वाटलं असेल. साधारण १९८५ पर्यंत सेनेने मराठी माणसाला केंद्रीभूत मानून राजकारण व समाजकारण केलं. माझ्या मते १९८४ ची दंगल ही मुख्यत्वे कारणीभूत ठरली असेल , बाळासाहेबांना हिंदुत्ववादी राजकारणाकडे वळवायला. कारण स्वातंत्र्यवीर सावरकरां नंतर जहाल ...

अभद्र युतींचा इतिहास आणि काँग्रेस !!

अभद्र युतींचा इतिहास आणि काँग्रेस !! एकूणच काँग्रेसचा गतइतिहास आणि आघाडीतील सम विचारी पक्ष सोडून इतरांशी केलेल्या युती यांचा अभ्यास केला तर त्यांनी अश्या युतींचा उपयोग आपलं अस्तित्व, वैभव वाढवून अश्या अभद्र युतीतील भागीदार पक्षाचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठीच केला आहे. म्हणून साधारण सहा महिन्यात या अभद्र युतीचा चोथा होऊन सेनेला लोटा मिळणार हे नक्की. गत इतिहासात दोन मोठी उदाहरणं आहेत एक चौधरी चरणसिंग आणि चंद्रशेखर. त्यातील चरणसिंग यांना तर बहुमत सिद्धही करू न देता लगेचच पाठिंबा काढून त्यांना औटघटकेचं पद मिळवून दिलं. उद्देश एकच, जनता पक्ष फोडणे. चंद्रशेखरांना दिलेला पाठिंबा एका क्षुल्लक कारणावरून काढून घेतला. त्यांचा उपयोग व्ही पी सिंग यांचा जनता दल पक्ष संपवणे यासाठी केला गेला. इतिहासानुसार आजघडीला दोन्ही पक्षांनी शकलं शकलं झाली आणि जनता पक्ष तर पूर्ण संपला. काँग्रेस हा पक्ष याही वेळी या युतीचा उपयोग आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच करेल. पण ते हे देखील जाणतात की, जितका जास्त काळ सेना सत्तेत राहील तितकी त्यांच्या इतर राज्यातील मतांवर परिणाम होतील. एकमात्र नक्की , जितका वेळ ही अभद्...

फॉरवर्ड कॉपी पोस्ट औरंगजेब याविषयी

कर्जबाजारी औरंगजेब आणि त्याला भिकेला लावणारे मराठे. (खूप हसायचे असेल, आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाचा सोहळा पाहायचा असेल, आणि अभिमानाने छाती फुगवायची असेल तर हा लेख वाचाच.) मुघल सल्तनतीला अक्षरशः भिकारी करून सोडले ते मराठ्यांनी.  औरंगजेबाच्या बाप-जाद्यांनी कमवलेली सगळी धन दौलत औरंगजेबाने दक्खनला येऊन खर्च केली.  अत्यंत हट्टी स्वभाव माणसाला दिवाळखोर बनवतो ह्याच हे उत्तम उदाहरण आहे. फ्रेंच इतिहासकार मनुची औरंगजेबाच्या दरबारात काही काळ नोकरीला होता.  हा दक्षिणेत आल्यावर शिवाजी महाराजांना भेटलाही होता.   हा मनुची म्हणतो कि “दक्खनला आल्यापासून औरंगजेबाच्या मोहिमेत दर साल एक लाख माणसे व तीन लाख जनावरे मरत असत.”  ह्या मनुचीच्या बोलण्यात अतिशयोक्ती आहे असे क्षणभर जरी समजले तरीही लढाईत मेलेले, मराठ्यांनी छापा घालून मारलेले, पुरात वाहून गेलेले, चिखलाने, उपासमारीने, रोगराईने, अपघाताने, हाल अपेष्टांनी, आणि उपासतापासाने मेलेले मोगल सैनिक आणि बाजारबुणगे यांची मरायची संख्या स्मितीत करणारे अशीच आहे. आता माणसांची हि स्थिती तर जनावरांच्या बाबतीत तर बोलायलाच नको. धोधो कोसळणाऱ्...

रुद्रस्तुती

ll रुद्रस्तुती ll आता व्हावे रुद्रध्यान  जप जप शिवाचे नाम आता व्हावे रुद्रध्यान ओंकार हा त्रिशूळधारी शिवनाम भवदुःख हारी करा मोक्षप्राप्ती अर्चन जप जप शिवाचे नाम भस्मलेपीयले सर्वांगा शिरी धारियली गंगा त्रिशूळ डमरू स्वजन जप जप शिवाचे नाम उद्धरले जन जन युगे पर्वतीसह शिव विराजे बेलपत्री प्रिय शिव मान जप जप शिवाचे नाम शिवनाम भयनाशक भूत पिशाच्चे भजत कैलास जयाचे स्थान जप जप शिवाचे नाम जाणतो तत्व शिवभक्त  प्रसन्न होता देई सहस्त्र  वृषभेश्वर हा हर हर  जप जप शिवाचे नाम मायापाश सोडवतो भक्तरक्षणी धावतो त्रिभुवनी धाक जाण जप जप शिवाचे नाम वाहतो ही शब्दवेल स्तुतिरुप कवनफुल चरणी घ्यावे न्यून  जप जप शिवाचे नाम  ©® कवी : प्रसन्न आठवले ०४/११/२०१९