जाणिवा, चेतना, संवेदना, साद व प्रतिसाद. २
म्हणजे आता सांगा की इथे सवय मनाला जडली की शरीराला.
घोळ आहे ना ?
आता थोडं वेगळं उदाहरण घेऊ कदाचित कळेल वा घोळ वाढेलसुद्धा. आपली तंद्री लागलेली असते आणि अचानक वीज चमकते वा कोणीतरी हाक मारतं अथवा कसलीतरी चाहूल लागते आणि तंद्री भंगते. पण ती भंगताना कधी कधी आपण दचकतो. तुम्ही म्हणाल झोपेतसुद्धा आपण स्वप्नातून जागे होतो दचकून. मग यात काय
सांगतो. झोपेत असताना पूर्णतः शरीर स्थिर असतं , मन स्थिर असतं आणि अंतर्मन वा सुप्तमन जाग असतं. ह्या स्थितीत अस म्हणतात की आत्मा हा चाहुबाजूचा कानोसा घेण्यासाठी भटकत असतो ज्यामुळे शरीराचा ताबा अंतर्मनाकडे असतो. म्हणजेच बहिर्मन अंतर्मनाच्या कब्जात असतो. परिणामी दिवसभरात वा आतापर्यंतच्या आयुष्यात घडलेल्या अनेकानेक गोष्टींची जणू उजळणी अंतर्मन करत असतं.
याच प्रक्रियेत सुप्तमन ही चाळवाचाळव वा स्मरणातील फाइल्स तपासत असताना काही वेळा त्या आठवणी वा आठवणींचा गुंता रिवाइंड वा पुनर्प्रक्षेपीत केला जातो. बहुदा याच दरम्यान बरीच स्वप्न पडतात. त्यातील बरीचशी सुप्तावस्थेत पडलेली असल्यामुळे पुनः फाइलबंद केली जातात म्हणून आपल्याला कळत नाहीत वा आठवत नाहीत. खूपवेळा आपल्याला एखादी गोष्ट पाहिल्याचं आठवतं पण कुठे ते मात्र स्मरत नाही, ते याचमुळे असावं.
हे सुप्तमनाचं गणित उलगडण हे कठीण आहे. आणि ते उलगडण्याचा प्रयत्न आधुनिक नव्हे तर पुराणकाळापासून सुरू आहे. आपल्या मनाला बांध घालुन वळवणं वा ताब्यात ठेवणं हे अनेकदा करून पाहिलं तरी जमत नाही. कारण ते काबूत ठेवू म्हणून ठेवता येत नाही. त्याला काही सवयी जाणून बुजून लावाव्या लागतात.
यामध्ये खूप मोठं योगदान समर्थ रामदास स्वामी यांचं आहे. जे आपल्याकडे आहे म्हणून आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही वा जाणवत नाही. मनाला चुचकारण्याचे, लगाम घालण्याचे , प्रेमपूर्वक समजावण्याचे, प्रसंगी धाक दाखवून कुंपण घालण्याचे अनेकानेक प्रकार शब्दा शब्दात त्यांनी मांडलेत. याबद्दल त्यांचे खरतर समस्त मराठी माणसांनी शत शत ऋणी असलं पाहिजे.
आशा, निराशा, प्रेम, वात्सल्य, सकारात्मकता, नकारात्मकता, आक्रमकता, अश्या अनेक परिस्थितीत मनाला कसं मार्गावर ठेवायचं याचा जणू नकाशाच त्यांनी शब्दात मांडलाय. यावर एक स्वतंत्र लेखमाला होऊ शकेल, बघूया सद्गुरुकृपेने शक्य झाल्यास नक्की लिहीन.
असो, थोडं विषयांतर झालं. पण मुख्य मुद्दा सुप्त मनाचं हे कोडं आहे खरं खूप अवघड. ते नक्की आत म्हणजे कुठे दडलेलं असतं आणि नेमकं कोणत्यावेळी कसं काम करतं. बघूया.
© संकल्पना व लेखक : प्रसन्न आठवले.
०५/०५/२०१९
Comments
Post a Comment