Skip to main content

जाणिवा, चेतना, संवेदना, साद व प्रतिसाद. १

जाणिवा, चेतना, संवेदना, साद व प्रतिसाद. १

सकाळी सकाळी चहा घेऊन तरतरी येते हा एक सर्व साधारण भाग झाला. नित्याचा असल्यामुळे सवयीनुसार आपण तसं करतो आणि हुशारी किंवा ताजगी आल्याचा अनुभव घेतो. इंग्रजीत याला एक छान शब्द आहे, फील येणं वा फील घेणं.

म्हणजेच कुठेतरी त्या जाणिवेला जागं करतो आपणच, नाव मात्र चहा वा तत्सम वस्तुंचं घेतो. कारण हा फील म्हणजेच अनुभव हा मानसिक आहे की शारीरिक आहे हा प्रश्न आहे. दुसरं एक उदाहरण देतो बघा विचार करून. अपेय पान करणारे सुरवातीला एका घोटात जो अनुभव घेतात तोच अनुभव , ज्याला ते किक म्हणतात, ती यायला एम एल वाढवावे लागतात. म्हणजेच शरीराला तोच अनुभव मनापर्यंत पोचवायला जास्त दारू पिणं गरजेचं असतं. याचं मुख्य कारण म्हणजे आपली मज्जासंस्था चेतवायला, जस जशी एखाद्या पेयाची वा अपेयाची सवय होत जाईल, तस तशी त्या पेय वा अपेय याची मात्रा वाढवावी लागते.

म्हणजेच हा एखाद्या वस्तुमात्राने येणारा अनुभव एक प्रकारे व्यसनाप्रमाणे असतो. जशी जशी मज्जासंस्थेला सवय होईल मात्रा तस तशी  वाढवावी लागते. किंवा जास्त वेळा चहासम पेय प्यावेसे वाटते. याचाच दुसरा अर्थ हा आनंद वा अनुभव काही क्षण टिकतो व जास्त काळ टिकण्यासाठी जास्त मात्रा वा जास्त वेळा ते अपेय वा पेय प्यावेसे वाटते.

यात एक गुंता असा आहे की मागणी शरीराकडून होते की मनाकडून हा पेच खूप कठीण आहे. म्हणजेच सवय वा व्यसन मनाला जडली वा जडलंय की शरीराला हे समजणं थोडं गुंतागुंतीचं आहे. गुंता यासाठी की, ती वेळ झाल्यावर शरीर अस्वस्थ होतं की मन हे त्याक्षणी विचार केल्यास ठरवणं कठीण काम आहे.

आता थोडं वेगळं उदाहरण बघूया. आपल्याला रोज एखादी व्यक्ती ठराविक वेळी व ठराविक ठिकाणी भेटत असेल, तर ज्या दिवशी, काही कारणाने, ती व्यक्ती त्या ठिकाणी दिसली नाही, तर मनात विचार तर नक्कीच येतील, की काय झालं असेल, सुट्टी असेल, बर नसेल, वगैरे. म्हणजे आता सांगा की इथे सवय मनाला जडली की शरीराला.

घोळ आहे ना ?

बघू पुढल्या भागात.

© संकल्पना व लेखक : प्रसन्न आठवले.
२७/०४/२०१९
१९:१९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...