Skip to main content

बंगाल न भूतो निवडणूक  निकाल !!! २

बंगाल न भूतो निवडणूक  निकाल !!! २

कालच्या लेखाला २४ तास होत नाहीत तोवर ममता बानो दुसरा लेख लिहायची संधी देईल अस वाटलं नव्हतं. पण बाईने ठरवलंच आहे की सामना मोटाभाईंच्या हातात आपणहून द्यायचा तर त्याला कोण काय करेल. बघूया एका मागे एक सर्व घटना

आज जवळ जवळ तीन ते चार महिने बंगालमध्ये अराजक सदृश परिस्थिती आहे. ती परिस्थिती निर्माण करण्याचं काम ममताने जाणीवपूर्वक आणि प्राप्त अधिकार व उपलब्ध सरकारी साधनांचा पूर्ण वापर करून भाजपाच्या कार्यकर्ते व समर्थक यांच्यावर दहशत निर्माण करण्यासाठी केला. त्यायोगे एक तात्कालिन आणि तात्पुरता परिणाम साधण्याचा प्रयत्न ममता बानो यांनी केला. जो निव्वळ लोकसभा निवडणुकीत मोदींना कमी जागा मिळाव्यात हे ध्यानात ठेवूनच करण्यात आला.

जो त्यांच्या म्हणजे विरोधकांच्या दृष्टीने मोदींना अडवण यासाठीचा राजमार्ग होता. म्हणून यात होत असलेली लोकशाही विरोधी वा लोकशाहीला मारक, प्रसंगी असंसदीय वा घटनाविरोधी कृती होऊनसुद्धा एकाही विरोधकाने त्याविरुद्ध वा त्याविषयी अवाक्षर सुद्धा काढलं नाही. उलट बंगाल मध्ये एकत्र रॅली काढून त्या परिस्थितीचा आपल्या दृष्टीने फायदा करून घेण्याचा प्रयत्न केला. हे निव्वळ अल्पसंख्याक मतदारांसाठी चालू आहे हे बहुसंख्य मतदार जाणत होते. हे सर्व करत असताना एक गोष्ट ते विसरत होते की ममता या अतिमहत्वाकांक्षी  बाईला खतपाणी घालत आहोत. 

एवढं सगळं चुकीचं होतंय आणि यात दुसऱ्या बाजूला फक्त भाजपा एकटी. शिवाय तेथील पोलिसी अत्याचाराचे व्हीडिओ पाहून बाहेरील व बंगाल मधील एकूणच बहुसंख्य जनमतच पुरेपूर आपल्या बाजूला नव्हे तर जास्तीत जास्त सहानुभूती आपल्या बाजूला असेल याची भाजपाला पूर्ण खात्री होती. बंगाल भाजपाला केंद्रीय नेतृत्वाने सार्थ पाठिंबा दिला. बंगाल मधील परिस्थिती ही देशाच्या इतर भागातील जनतेला एक प्रकारचा इशारा होता , की जर ममता बानो जिंकली आणि राष्ट्रीय राजकारणात उदयाला आली तर उद्या देशातील परिस्थिती काय असू शकेल. याची नोंद घेऊनच उर्वरित भारतात बहुसंख्यांक मतदान झालं हे नक्कीच.

आता वळूया प्रियांका शर्मा एपिसोड कडे. मुळात अश्या प्रकारच्या मेमे हे काही नवीन नाहीत. अनेक कलाकारांचे, राजकीय नेत्यांचे वा इतरांचे असे मेमे बनवून व्हायरल केले जातात. ज्याला किती किंमत असते ते फिरवणारे सुद्धा जाणतात. विरोधकांनी मोदीजी व अमित शहा या सारख्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना सुद्धा सोडलं नाहीये. यांचेसुद्धा कितीतरी मेमे फिरत असतात. बर यात तिला पकडून एक प्रातिनिधीक अटक दाखवून खरतर सहानुभूती मिळवून ममता काही मतं खेचू शकत होत्या. पण अंध झालेल्या ममता बानो आणि त्यांच्या इशाऱ्यापुढे लाचार पोलीस यांनी चुकाच करायचं ठरवलं तर कोण काय म्हणेल. 

तिला सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर करून सुद्धा जामीन न देता सकाळपर्यंत तुरुंगात ठेवलं. याशिवाय तिच्याकडून जबरदस्ती माफीनामा लिहून घेतला. या दोन्ही गोष्टींवर पुन्हा सुप्रीम कोर्टाची नाराजी आणि शेवटी अवमानना नोटीसीपर्यंतची भाषा नाईलाजाने कोर्टाला वापरावी लागली. यातून जायचा तो चुकीचा संदेश देशाला व जगाला गेला की ममता सुप्रीम कोर्टाला सुद्धा जुमानत नाहीये. पोलीस प्रशासनाला आपल्या नोकरीची सुद्धा तमा नाहीये. कारण कोर्ट अवमानना कारवाईत पहिली शिक्षा होईल ती प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना वा अधिकाऱ्यांना.

त्यावेळी त्यांना कोणताही राजकीय नेता वाचवायला येऊ शकत नाही आणि हे अनेक केसेस मध्ये सिद्ध झालंय.  थोडक्यात काय तर बंगाली मुख्यमंत्री आणि प्रशासन घटनेला जुमानत नाही असाच संदेश आपसूक सर्वत्र पसरला. यात लुटीयन मीडिया जाणून बुजून गप्प बसला. कारण हेच उलट घडलं असतं तर प्रचंड गहजब आणि गदारोळ झाला असता, अगदी मेणबत्ती मोर्चा सुद्धा झाला असता. असो जनता सब समझती है और मतपेटीसे समझातीभी है. जे १९ ला आणि अर्थातच २३ मे ला समजेलच.

दुसऱ्या एपिसोडमध्ये परवाच्या अमितजींच्या रोड शो दरम्यान तृणमूल कार्यकर्त्यांनी म्हणण्यापेक्षा तृणमूलच्या गुंडांनी जो धिंगाणा घातला आणि जो राडा केला त्याचा पूर्ण पंचनामा पत्रकार परिषदेत अमितजींनी केलाच पण त्यात हे महत्वाचं त्यांनी सांगितलं की जर त्यावेळी सोबत सीआरपीएफचे जवान नसते तर आपलं वाचणं अशक्य होतं. इतकी जय्यत तयारी बानोने त्या दिवशी केली होती. मुळातच फेब्रुवारीपासूनचं भाजपाच्या अनेक नेत्यांच्या सभांना मज्जाव, अटकाव वा अडचणी निर्माण करून ममताना आणि त्यांच्या चाहत्या विरोधी पक्षांना वाटलं की आपण खूप मोठं काम करत आहोत. त्यातच कालच्या घटनेने अमितजींनी पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाकडे केलेली मागणीवजा तक्रार आणि त्यांच्या मुकपणावर केलेले कठोर भाष्य यांचा उचित परिणाम होऊन न भूतो न भविष्यती अशी घटनेच्या ३२४ कलमाचा स्वातंत्र्योत्तर प्रथम वापर करून निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस कमिशनर यांची बदली करून निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यासाठी योग्य व भयमुक्त  वातावरण निर्माण होईल याची काळजी घेतली.

तरीही ममताबानो आणि विरोधक हे   विसरतात की , अश्या गोष्टीनी बहुसंख्य समाजाची सहानुभूती अनायासे भाजपाकडे वळत होती वा आहे. त्यामुळे आपसूकच पक्षांचं काम सोप्प होत आहे.  अर्थात यात अथक मेहनत आणि श्रम व त्याहीपेक्षा धैर्य तेथील भाजपा कार्यकर्ते व समर्थक जनता यांनी दाखवलं. जे अतुलनीय आहे. आज बंगाल मधील परिस्थिती ही काश्मिरातील १९८७/८८ सालच्या परिस्थितीशी मिळती जुळती आहे. फरक इतका आणि महत्वाचा की आज भाजपा केंद्रात आणि जवळपास २१ राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे तेथील जनतेला नैतिक, आर्थिक आणि मानसिक धैर्य, बाहेरून योग्य नेते व कार्यकर्ते तेथे पाठवून पक्षाने हे नितीधैर्य पुरेसं बांधून ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय.

या साऱ्यांमुळे विशेषतः निवडणूक आयोगाच्या ताज्या कारवाईने भयमुक्त वातावरणात बंगालमधील उर्वरित ९ लोकसभा मतदारसंघात मतदान होईल अशी आशा निर्माण झाली आहे. आज विरोधी पक्षांतर्फे बंगाल मध्ये निवडणूक आयोगाच्या कारवाईविरोधात थयथयाट कार्यक्रम आहे.

पण माझ्या अनुमानानुसार बंगालमध्ये प्रियांका शर्मावरील सुप्रीम कोर्ट आदेशाविरुद्ध जाऊन केलेली कारवाई वा तिला सोडण्यात केलेली अहितकारक दिरंगाई आणि अमितजींच्या रोड शो दरम्यान ममता बानोने मुद्दाम घडवून आणलेली गुंडगिरी यामुळे जमून आलेले हिंदू मतांचे ध्रुवीकरण पूर्ण केले आणि आयोगाच्या कारवाईने तेथील हिंदू जनतेला मानसिक आधार दिला.

या सर्वांचा परिणाम २३ मे ला भाजपाला २५ वा जास्त लोकसभा मतदारसंघात जीत आणि बाकीच्या बऱ्याच मतदारसंघात अद्भुत मतदान यामध्ये परिवर्तित होईल हे सुनिश्चित.

म्हणूनच

फिर एक बार
मोदिजिकीही सरकार !!!!!! 🌷🌷

१६/०५/२०१९







Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...