Skip to main content

Posts

Showing posts from January, 2018

जानकी पुनःवनवास १०

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास १० .या सर्व मानसिक गुन्तागुंतित आनन्दा चा एक समान धागा होता तो म्हणजे प्रभु श्रीरामांचे आगमन, तेदेखील १४ वर्षान्च्या प्रदीर्घ वनवासानंतर. ...

जानकी पुनःवनवास ९

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ९ आता ती घटिका समीप आली आहे. आणि त्या समयाला प्रभुंचे आगमन झाले नाही तर मी अग्निप्रवेश करीन असा माझानिश्चय सुद्धा त्याना ज्ञात आहे. परंतु माझ...

जानकी पुनःवनवास ८

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ८ . या सर्व तयारित आणि उत्सवाच्या धुंदीत हनुमान प्रभुंचा निरोप घेऊन आयोध्येकडे प्रस्थान करते झाले. कारण प्रभुना भ्राता  भरताची निष्ठा पूर्...

जानकी पुनःवनवास ७

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास ७ या सर्व तयारी पासून दूर लंकेला प्रभुंची निघण्याची लगबग आणि विभिषणासह सर्व लंका वासियांचा निरोप घेऊन प्रभु स्वतः देवी जानकी , जाम्बुवन्त, ...

करुणा

प्रारब्ध भोगे बहु पिडलो मी प्रारब्ध योगे कष्टावलो मी प्रारब्ध सोसुन पस्तावलो मी दयाळा कृपा करी ll १ ll योगे वासनेच्या झुंजित आलो लक्षावधी योनि फिरुनी आलो कर्मातला वाटे कु...

भारतीय प्रजासत्ताकाचे महत्व

भारतीय प्रजासत्ताकाचे महत्व सहस्त्रावधी वर्षापासून अस्तित्वात असलेल्या भारतवर्ष या भूमीला १९४७ ला स्वातंत्र्य मिळालं असं का म्हणायचं त्याचा उहापोह खालील मुद्द्यांवर केला आहे. १.  अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश अश्या विशालकाय प्रदेशाला भारतवर्ष हे नामाभिधान कुरुवंशातील राजा दुष्यंत आणि शकुंतला यांचा सुपुत्र आणि सर्वश्रेष्ठ राजा भरत यांच्या नावावरून मिळाले असं इतिहासात आपण वाचलं असेल. त्याच महत्वाच कारण असं कि या भरत राजाने संपूर्ण भूप्रदेश आपल्या अधिपत्याखाली आणला. आणि असा तो बहुदा पहिलाच सम्राट असावा. म्हणूनच त्याच्या नावाने तो संपूर्ण भूभाग म्हणजेच अफगाणिस्तान ते ब्रह्मदेश भारतवर्ष म्हणून ओळखला जाऊ लागला. २. त्यानंतर मौर्य सम्राटांनी  यातील बऱ्याच  भूप्रदेशावर अधिपत्य गाजवल. त्यानंतर अशाप्रकारचा पराक्रम मोंगल सम्राटांनी करून दाखवला. पण तरीही संपूर्ण प्रदेशावर अधिपत्य बराच काळ गाजवणे फार थोड्या सम्राटांना जमले. ३. हे अर्वाचीन काळात फक्त ब्रिटिशाना जमलं. ब्रिटिशांचे हे जणू उपकार म्हणावे लागतील , कि त्यांनी हा संपूर्ण भूप्रदेश एका अधिपत्याखाली आणला.  त्याचप्रम...

नशीबाचे पत्ते

नशीबाचे पत्ते जमलाय आमचा अड्डा जुगाऱ्यांचा मांडलाय खेळ नशिबाच्या पत्त्यांचा  दान पड़ाव आपल्याच बाजूने हाच अट्टाहास ज्याचा त्याचा पत्ते येवोत कसेही हातात डाव असतो प्रत्येकाच्या हातात कर्माचा जमलाय आमचा ......... भिकारी सारेच या खेळात मागतात कोणी भाषणात तर कोणी मागतात देवळात मजबूरी प्रत्येकाची पाया इथे खेळाचा जमलाय आमचा ..... नशिब नशिब म्हणजे तरी क़ाय नशिबी लिहिलय म्हणजे तरी क़ाय जमलेला डाव 'त्यानेच' उधळला हाच आरोप असतो इथे ज्याचा त्याचा जमलाय आमचा ...... कर्माचा वसा आणि नामाचा नेम अचूक साधेल डाव जीवन 'हेम' सोडून द्या प्रवाहात घेऊन नाम बदलेल नशिब जोडून संचित साचा जमलाय आमचा ...... © कवी : प्रसन्न आठवले ०६/०१/२०१७ २२:३९ हेम - सोन

|| ओमकार रे नाम निर्गुण रे रूप ||

|| ओमकार रे नाम निर्गुण रे रूप || ओमकार रे नाम, निर्गुण रे रूप साकार जाहले परब्रम्हस्वरूप ओमकार रे ......... जगता कारणे साधीयले सर्व उपाधी धारसी परी व्यापक मर्म बांधीयले जग सारे, आधार जे कर्म ओमकार रे ........ जड़जीव लक्ष लक्ष जगता धाडले तुझे रूप अंशमात्रे तयामाजी घातले ऊद्धाराया आत्मनः मानव हा जन्म ओमकार रे ....... रूप तुझे गुण तुझे भासती अनेक जयालागी भाव जैसा तैसेची चिंतन तरीही रे सगुणातीत खरे तुझे रूप ओमकार रे ....... काया दिली मानवा साधाया मोक्ष तयासाठी मार्ग तूच निर्मिसी कैक जया ज्ञान जाहले साधेल साधन ओमकार रे ........ उद्धाराया जगता  येसी अवतारे कलीयुगी नाही सगुणी, नामावतारे नाम हेच कर्मधर्म, नाम हेची सर्व ओमकार रे ....... © कवी : प्रसन्न आठवले ०६/०१/२०१८ ०६:३४

आनंद ३

आनंद चित्रपट उलगडून बघतानाच्या वाटेवर आज या चित्रपटातील अजून एका गाण्याच भावविश्व जाणून घेऊ आनंदच्या व्यक्तिमत्वाचे दोन पैलु फारच थोड्या ठिकाणी वा प्रसंगात हृषिदा...