Skip to main content

Posts

Showing posts from April, 2017

कवडसा ३२

कवडसा ३२  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव ,  तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …   ३२ योगेंद्रला भेटून डॉ आशाताईना भेटायला शीतलच्या रूम मधे येतात डॉ : बोला शीतल बाई शीतल : (हसुन आणि लाजून ) काय हो डॉ डॉ: बर शीतल मैडम बस दोघेही आणि आशाताई तिघेहि मनसोक्त हसतात डॉ : कस वाटतंय आता . इथे येऊन बर वाटल ना. शीतल : (प्रश्नाचा रोख लक्षात येऊन ) हो खुप बर वाटल डॉ: मलाही अस म्हणून खुप जोरात हसतात , शीतल पण मनमुराद हसते. डॉ: आशाताई चला आपण आफिस मधे जाऊ बाकी सर्व सूचनां पण देतो आणि सर्व औषध , पथ्य पण सांगतो. आशाताई : शीतल चल मी जाऊन येते . तू उगाचच विचार करत बसु नकोस. ओके. शीतल : हो बाय ये लवकर डॉ : शीतल बेटा बाय आणि गुड़ लक एंड टेक केअर शीतल : थंक्स आणि बाय डॉ आणि आशाताई जातात. इकडे शीतल उदास बसलेली असते आणि अचानक तिचा मोबाइल वाजतो. बघते तर योगेन्द्रचा फ़ोन, ती लगबगिने फोन उचलते शीतल : हैल्लो योगेंद्र : हाय मैडम कश्या आहात शीतल: (मनात हसते पण) आता काय खुश असशील तू योगेंद्र :  का ग शी...

असाच आहेस तू

असाच आहेस तू  असाच आहेस तू खट्याळ पावसा सारखा  कधी बरसतोस तूफान होऊन कधी निःशब्द  आधी असतोस आसमान कोसळणार,  क्षणात असतोस शांत आणि स्तब्ध   कधी असतोस तो क्षितिज विस्तीर्ण विलोभनीय  कवेत सुद्धा न सामावणारा म्हणूनच भावणारा  कधी होतोस कोशात गुरफुटलेला रेशमी कीटक  सूक्ष्म , अनिमिष , अनामिक मुठीत मावणारा  कधी असतोस तो अफाट , सागरीकिनारा   थांग सुद्धा न लागणारा, लागू न देणारा  कधी होतोस तू प्रवाह हातात मावणारा  तू झ्या मनाच्या कक्षा क्षणात अरुंदावणारा  कधी असतोस तो विराट , रौद्र रूप वारा  सोसाट्याचा , सर्व कवेत घेऊ शकणारा  कधी होतोस तू पावलांनाही थारा न देणारा  मनाच्या कोपऱ्यात हरवून गेलेला, जाणारा  किती अकल्पित तुझं रूप प्रत्येक क्षणी  प्रत्येक रूपात  तू झ्या फक्त मलाच कळणारा  मला जवळ असलेल्या मना जवळ असलेला  तुझ्या हृदयात फक्त मलाच सामावणारा  फक्त मलाच सामावणारा, समजणारा  कवी: प्रसन्न आठवले  २४/०४/२०१७ १८....

गुंतणे

गुंतणे  गुंता तूझ्या बटांचा मन सोडवत आहे  अजुनी  तू झेच पाहणे मज ओढवीत आहे  का गुंतलो  तू झ्यात , कि खेळ हा जुनाच  सूटतात का कधीही कोडी अशी मनात  तरीहि पून्हा पून्हा मी मन गुंतवीत आहे  अजूनी  तू झेच .....  त्या रात्र चांदण्याला आहे रुपेरी धार  तू भेटसी न मज,म्हणुनी नावेस  किनार  त्या सागरात तरीही मन बोलवीत  आहे  अजूनी  तू झेच ......  विसरू म्हणून कोणी विसरेल का कधीही  ते प्रेम राधिकेचे  कृष्णास साद घाली  त्या राधिके परी हे मन  तू जसमीप आहे  अजूनी  तू झेच ........  निशिगंध धुंद झाला पाहून कैफ तुझा ग  ती बात हि नाशिली डोळ्यात या तुझ्या ग भिजणे नी  डुंबणे हे झुरणे नशेत आहे  अजुनी तुझेच .......  हि इश्क जादूगिरी हरणे पुन्हा पुन्हाचे  धोका इथे घडीचा हे खेळ नशिबाचे  या खेळण्यात मी ग प्याद्या परीच आहे.  कवी : प्रसन्न आठवले  २४/०४/२०१७ १५.३० ...

तेरे दिदार का मौसम

तेरे दिदार का मौसम हर पल है ये दिल गुलज़ार का मौसम पल पल है तेरे दिदार ....... बनके नगीना बस जाये अंगूठीमे सावन घटासे आ जाये बारिशमें भिगाना प्यार में है तुझे पल पल तेरे दिदार ..... मन क...

श्री स्वामी समर्थ

जातकीय सूत्राला स्मरूनि बोलती स्वामी समर्थ कलियुगातील एक सूत्र जप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ जन्म म्रत्यु हे कर्माधिष्टित ठेव तू ही ख...

विरहात संपली रात्र

विरहात संपली रात्र विरहात संपली रात्र, अन दिवस सुना तो गेला  त्या विरही वळणावरती  का जीव असा   गुंतला  विरहात संपली .......  या वेळी सागर लाटा किती गूढ करती आवाज रात्रीत किनार्यावरती विचार थबकती आर्त  त्यावेळी सागरतीरी  हा जीव उगाच अडकला  विरहात  संपली .......  विरहात दुःख हे पदरी विरहातच आहे जळणे  अन शेवट हाता मध्ये तो केवळ अग्नी उरणे  त्या ज्वाला तरीही सहणे हा केवळ रस्ता उरला  विरहात संपली ........  नभ केवळ देती आस पाऊस येई कधी तरीही  श्वासास लागले भास उरले नच हाती तरीही  पाहणे वाट अन वाट बाकी न उपायच  उरला  विरहात संपली ....  कवी: प्रसन्न आठवले  १७/०४/२०१७ १२.२९

ती ओढ अनावर झाली - 6

ती ओढ अनावर झाली  ती ओढ अनावर झाली  हि  आशा अलगद आली  तूज भवती जीवन माझे  सारे ती मिसळून गेली  ती नजर तूझी रे धुंद  करीतसे मला बेधुंद  तू भाव अनामिक माझे  तूजसमिप ओढून नेसी  ती ओढ .....  हि मनात आली लाट   नकळे तूज आपोआप  कि  कळूनी  सारे सखया  मज याद न का रे करसी  ती ओढ .....  या मनात प्रतिमा ती रे  खिळवून मला ठेवी रे  अन नजर तूझ्या प्रतिमेला  या मनी साठवून ठेवी  ती ओढ ....  तू क्षितिजाचीच दिशा रे  असशी तू दूर सदा रे  मी पाठी तुझ्या सखया  रे  हा प्रश्न मनास विचारी   ती ओढ ....  कवी: प्रसन्न आठवले 

भ्रमरांप्रमाणे गुंजे सदा

भवरे कि गुंजन  भ्रमरांप्रमाणे गुंजे सदा  मन हे तराणे गायी सदा  प्रेमात ग तुझिया सखे  हृदयात या तुझी प्रीत ही  श्वासात माझ्या तुझा गंध हा  जागी या जणू मी आलो सखे   तुझे हात हात असे भास हा  भ्रमराप्रमाणे .......  क्षितिजापुढे प्रेम माझे सखे  तुला बाहणे मना आस हि  तुझे पाहणे मज सुखावे सखे  हृदयात जागा तुझी खास हि  भ्रमराप्रमाणे ......  कवी : प्रसन्न आठवले.  १०/०४/२०१७ १५. ३८

मेघा आयो

मेघा आयो  मयूर नृत्य झंकारत बोले रिम रिम झिम झिम मेघा आ रे  अवनी ताप भी सह ना पाये साजन मोरे मेघा आ रे  घटा घटा मे अंग अंग मे खिचे मन मोरा अब तो आ रे  कैसे बोलू असुवन खोलू नयना मोरे, वर्षा गा रे बादल आ रे  बिन तेरे अब नयन सुखात है रात रूकत है साजन आ रे  भिगी अखियां तरसु रतिया राह तकत हूँ अब तो आ रे  घुमड घुमड कर बादल गरजे चहू और से पवन चले है  बादल चहू और से घीरकर कड कड कड कड तांडव करते    आयो मेघा मोरे साजन मेघा बरसो मेघा घिर घिर मेघा  ढम ढमाक ढम ढोल बजे है गरजत गरजत बिजली सजे है    मोरे साजन आयो रास रचायो सुनकर बिनति मोरे मेघा  घनघोर घंटा बरसत बरसत अवनी डोलत सावनवा आयो रे  मचले चहू ओर फव्वारे गिरती बुंदे छम छम नाचे  चारो और घुमडवा छायो मेघा आयो मेघा आयो रे  कवी : प्रसन्न आठवले  ०६.०४.२०१७ १९.३०

कर्म गती

कर्म गती  जे वाढून दिधले तू कर्मा ते भोग येती  तुज वाट्याला  तरी अधमा तू नच समजून घेसी फिरुनी ऐसी जन्माला  तू ऐसी जासी हा फेरा शतजन्माचा आहे लिहिला  पण कर्म गतीने तू त्यासी वर्धमान अससी केला  किती जन्म भोगसी ठरले पापे  मिळवूनी प्रारब्धी  तरी विनाश काले विपरीत व्हावी ऐसी का रे तुज बुद्धी   जाणारा जातो सोडून तुज त्याचेहि कर्म तयापाशी  तरी दुःखाचे हे डोंगर भासती कर्म तयाचे त्या पाशी  म्हणुनी संतांनी वदले रे तू कर्म तुझे पावन करसी  मग मोक्ष तुझा तूच स्वतः तव हाताने लिहून येसी  हा मन्त्र ठेव जपूनी नेहमी जे करशील ते तू भोगासी रे  मग का कुकर्माच्या राशी रे उभ्या स्वतः तू करासी रे  करणे तुज आहे अन भरणे हे सूत्र ठेवसी लिहूनी  रे  मग डरणे का मरणाला जन्मो जन्मी ये स्मरणी रे  कवी : प्रसन्न आठवले 

कर्म गती सिद्धांत

  ।। कर्म गती सिद्धांत ।। हे मानवा , हे बघ संपूर्ण ब्रह्मांड. याच संपूर्ण अस्तित्व, चलन, आणि अंत माझ्यापासून सुरु होतो. माझ्यातच याची समाप्ती. सर्व चल ,अचल , जीव - सजीव अथवा निर्जीव श्रुष्टीचा कर्ता , धर्ता , हर्ता  मीच आहे. इथल्या प्रत्येक प्राणीमात्रावर मी लक्ष ठेवून आहे.  देवा इथे एक शंका आहे देवा .  बोल मी त्याच साठी आलोय.  सजीव ठीक आहे पण निर्जीव वस्तू वर  नजर, म्हणजे.  अरे तुझ्या दृष्टीने ती निर्जीव म्हणून मीही निर्जीव म्हणालो. अन्यथा या जगात अस्तित्वात असलेल्या आणि, निर्माण होऊन नष्ट झालेल्या प्रत्येक गोष्टीच महत्व आणि स्थानमहात्म्य मी जाणतो. तू जाणत नाहीस इतकच . आणि या ब्रह्मांडाच चलन अहेतुक, नसून हेतुपूर्ण आहे. ते सतत , निरंतर, व्यवहारी राहावं याचसाठी कर्मसिद्धांताची निर्मिती केली. सर्व गोष्टी आपसूक, कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय व्हावयात सुरळीत आणि स्वयंचलित पणे व्हाव यासाठीची सर्व व्यवस्था मी केली आहे. कर्माच्या कोणत्याही व्यवहारात मी कधीही हस्तक्षेप करत नाही. मग चमत्कार वगैरे जे आम्ही म्हणतो ते कसे करता, अथवा होतात...

शब्दाना अर्थ नसतो

शब्दाना अर्थ नसतो शब्दाना अर्थ नसतो तो उद्देश्यातून प्राप्त होतो शब्द चांगले, वाइट नसतात कधीच कारणातून त्याना महत्व प्राप्त होते. शब्द कधीच टोचत नाहीत ,  तर त्यामागचा अर्थ टोचतो , बोचतो, खटकतो. शब्द कधीच बाण नसतात कधीच तीरही नसतात त्याना धरून मारणारा, आणि उद्देश्य ठरवतो. शब्दजाल जाळ कधीच नसत कधीच अड़कवत नसत जाळ तर ते शब्द पेरणारा मांडत असतो. शब्द वाद,  विवाद, प्रतीवाद , कधीच नसतात वाद तर स्वतःची बाजू मांडणारा निर्माण करतो. शब्द अर्थवादी, प्रवाही, सकारात्मक वा नकारात्मक कधीच नसतात , त्यांचा बोलावता धनी जो अर्थ ध्वनित करतो त्याचा आपण काय अन्वयार्थ  लावतो त्यावर ते अवलंबून असत.  म्हणून शब्दांची किंवा त्यांच्या बाणांची दिशा आपणच ठरवतो.  असं खूप वेळा घडत कि एखाद्या व्यक्तीला आपण डोक्यातून किंवा मनातून  काढून टाकतो. त्यावेळी त्याने उच्चारलेले शब्द, बोल, हे आपल्याला लागत नाहीत   किंवा आपण त्याचा विचार सुद्धा करत नाही. म्हणजेच आपल्याला शब्द नाही बोचत त्यांचा ध्वनी जो उच्चारणारा असतो तो खटकतो . अर्थ त्याला नन्तर व्...