कवडसा
(जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)
काळीज सुन्न करणारा तो दिवस आयुष्यात विसरायच म्हटल तरी या जन्मी शक्य
नाही. चार वर्षांपूर्विचा तो काळा दिवस दुर्दैव घेऊन आलाय हे खरच कल्पनेत सुद्धा नव्हत. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी मन
उगाचच बेचैन होत सकाळ पासून. आज जाणवतोय अर्थ नियतीच्या संकेताचा, कारण
वातावरण सुद्धा विचित्रच होत त्या दिवशी. आणि समरच्या इछेविरुद्धच मी
त्याला शहराबाहेरुन भाजी आणि इतर खरेदी करायला पाठवल. आणि तो नाखुशीनेच बाईक घेऊन गेला. खरतर त्याला त्या
दिवशी मस्त आराम करायचा होता सुट्टी असल्यामुळे . खरच मी नाही पण काळाने त्याच ऐकल आणि . . . . .
तो घरातून बाहेर गेला असेल आणि अर्ध्या तासात सर्व जग इकडच तिकडे झाल. अचानक वीज अंगावर कोसळावी तसा तो फोन एका अज्ञात व्यक्तिचा आणि मीच फोन उचलल्यामुळे कानावर झालेला तो बातमीचा आघात माझ किंचाळण, ते ऐकून धावत आलेल्या शेजारच्या काकू आणि त्यापुढल मन सुन्न करणार ते दृश्य........
नंतरचे दोन दिवस काय घडल काही केल्या लक्षात येत नाही. अर्थात कस लक्षात येईल, कारण आपण दोन दिवस सुन्न होतो. काय घड़तय हे कळण्याची मनस्थिति तरी कशी असेल , जेंव्हा मनाचा अर्धा कोपरा कोणी करवतीने कापावा ,तसा काढून घेतला होता माझ्या जीवनाचा सुखाचा सर्व हिस्सा , काळ नावाच्या कुण्या निष्ठुर आणि अज्ञात शक्तिने.
आज चार पाच दिवस झाले, पण अजूनही मन सत्य स्विकारायला तयार होत नाही, आई पासून सर्वानी आपल्या परिने समजावल, पण अजूनही मन हे भीषण आणि कटू सत्य स्विकारू शकत नव्हतं. शर्वरी १०/ १२ दिवस आइकडेच होती. तेराव्या पर्यन्त मी थोडी भानावर आल्याच आठवतय.
सर्व जण आपापल्या घरी पांगले आणि माझी खरी लढाई चालू झाली अस्तित्वाची , दु:खाची, प्राप्त परिस्थितीशी.
तो घरातून बाहेर गेला असेल आणि अर्ध्या तासात सर्व जग इकडच तिकडे झाल. अचानक वीज अंगावर कोसळावी तसा तो फोन एका अज्ञात व्यक्तिचा आणि मीच फोन उचलल्यामुळे कानावर झालेला तो बातमीचा आघात माझ किंचाळण, ते ऐकून धावत आलेल्या शेजारच्या काकू आणि त्यापुढल मन सुन्न करणार ते दृश्य........
नंतरचे दोन दिवस काय घडल काही केल्या लक्षात येत नाही. अर्थात कस लक्षात येईल, कारण आपण दोन दिवस सुन्न होतो. काय घड़तय हे कळण्याची मनस्थिति तरी कशी असेल , जेंव्हा मनाचा अर्धा कोपरा कोणी करवतीने कापावा ,तसा काढून घेतला होता माझ्या जीवनाचा सुखाचा सर्व हिस्सा , काळ नावाच्या कुण्या निष्ठुर आणि अज्ञात शक्तिने.
आज चार पाच दिवस झाले, पण अजूनही मन सत्य स्विकारायला तयार होत नाही, आई पासून सर्वानी आपल्या परिने समजावल, पण अजूनही मन हे भीषण आणि कटू सत्य स्विकारू शकत नव्हतं. शर्वरी १०/ १२ दिवस आइकडेच होती. तेराव्या पर्यन्त मी थोडी भानावर आल्याच आठवतय.
सर्व जण आपापल्या घरी पांगले आणि माझी खरी लढाई चालू झाली अस्तित्वाची , दु:खाची, प्राप्त परिस्थितीशी.
क्रमश:
कवडसा या प्रदिर्घ ब्लॉग कादम्बरीचा लेखक प्रसन्न आठवले ः जे हि कादम्बरी वाचतात त्याना हि विनंति कि त्यानी क्रूपया आपले मत नोंदवावे जेणे करून मला कळेल कि वाचक प्रतिसाद कसा आहे. हि एक प्रदिर्घ कादम्बरी आहे आणि ति रोज या स्वरूपात ब्लॉग वरच प्रसिद्ध होइल.
ReplyDelete