Skip to main content

मित्र

मित्र 

खोल अर्थ असलेल्या अश्या शब्दाची पोकळ व्याख्या करणं इतक्या वर्षात  जमल नाही आणि म्हणून काही लिहिल नाही. पण आज त्याचा खोलवर दडलेला अर्थ उमगल्यावर लिहिण्यावाचून थांबू शकलो नाही आणि म्हणून हा खटाटोप. 
मित्र हा खरच कसा असू शकतो त्याची व्याख्या अनेकांनी त्यांच्या परीने केलेली आहे. पण माझ्या दृष्टीने तो निरागस , निरलस, हृदयाच्या सर्वात आत असल्यामुळे, आतला आवाज ऐकू शकणारा, तुम्हाला समजून वागणारा, प्रसंगी तुम्हाला दटावणारा   असा असावा. काळाच्या कसोटीवर टिकणारी मैत्री कशी असू शकते हे आज पर्यंत कधी समजलच नाही पण समजायला लागल्यापासून आज प्रथम त्याचा अर्थ उमगला, कि अशी मैत्री एका विशिष्ट शब्दात बसवता येणार नाही.
पण आज त्याचा अर्थ हृदयाला भिडलाय आणि बुद्धीलाही पटलाय. कारण असा एक मित्र मला मिळालाय. ज्याच हृद्यय  सश्यासारख मऊ , काळीज कापसासारखा मुलायम, मन स्फटिकासारख अंतर्बाह्य स्वच्छ आणि चुकांची कबुली देऊनही विसरण्याइतक मोठ , बुद्धी अजूनही न कोमेजलेली , जाणीवा प्रगल्भ, विचारांची खोली प्रचंड , स्वतः दुखः भोगूनही मन मान्सरोवरा सारख शांत. 
अश्या ह्या माझ्या मित्राशी मला चिरकाल टिकणारी मैत्री हवी आहे. आणि ती तशी टीको हीच त्या मित्राच्या कल्पनेतील प्रकृत्री परमेश्वरा जवळ प्रार्थना. 

शुभं भवतु

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...