Skip to main content

कालाय तस्मै नमः ३

कालाय तस्मै नमः ३

©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.
 
९. या सर्वात ईश्वराने दिलेली सर्वोच्च देणगी म्हणजे मन. कारण हे मनच माणसाला त्याच्यातील प्राणी या संकल्पने पासून वेगळं करतं. हे मन माणसाला , त्या उच्च कार्यासाठी विचार प्रवृत्त, सक्षम आणि साधक बनवतं.

१०. याच मनात देहाशी तादात्म्य पावणारी भावोत्कट वृत्ती, भौतिकता आणि देहापासून परावृत्त होऊन देवापर्यंत जाण्याची साधू वृत्ती मिळवून देते. त्यासाठी या मनाला चिंतनासाठी प्रवृत्त करावं लागतं. 

११. म्हणजेच प्रवृत, आवृत्त, परावृत्त अशा वृत्तीच्या सर्व अवस्था याच मनाच्या माध्यमातून आत्मा साधू शकतो. त्यातच भगवंतांनी स्वतः, आपलं अस्तित्व सांगताना म्हटलं आहे की, इंद्रियांमधे मी मन आहे. 

१२. जरी आपण या देहाला संगणक किंवा भ्रमणध्वनी स्वरूप मानलं, तरीही या उपकरणांमध्ये नसलेली, self realisation and self upgradation ची किमया आणि गुणवत्ता, या मन असलेल्या देहात विधात्याने भरून ठेवली आहे. 

१३. याच गुणवत्तेला ओळखून, तिला तावून, सुलाखून पुढील मार्गासाठी घेऊन जाणं, हीच प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक जन्माची इतिकर्तव्यता आहे. 

वरील काही मुद्द्यांचा उल्लेख केल्यावर आपण पुढे जाऊया. 

कर्म, कर्मफळ या दोन गोष्टींचा विस्ताराने उहापोह श्रीमद् भगवतगीतेत केल्यावर एक गोष्ट स्वतः भगवंतांनी स्पष्ट केली की, कर्म केलं की फल येणार. पण हेदेखील सांगितलं आहे की माझ्या स्मरणात केलेल्या कर्माच्या फळाची चिंता करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे ईश्वर स्मरणात केलं जाणारं प्रत्येक कर्म हे त्याला अर्पण केल्यासारखं होतं. त्यानंतर त्याची बांधिलकी ही भगवंताच्या पारड्यात जाते. 

आता याचा थोडा विस्ताराने विचार करूया. ज्या ज्या वेळी मन ईश्वर स्मरणात असेल, त्या त्या वेळी देह प्रारब्धात कर्मरत असेल, पण मन हे त्या कर्माशीं निगडीत किंवा बद्ध किंवा संलग्न नसेल. अर्थातच कर्म फलरूपात परिवर्तित होण्याला देहाची गुंतवणूक जास्त महत्वाची नसून, मनाची त्या कर्मातील गुंतवणूक महत्वाची ठरते, असाच निष्कर्ष यातून काढावा लागेल.

म्हणजे कर्मफळ न्यायाला मनाची कर्मात असलेली बद्धता खूप महत्वाची आहे. कदाचित हेच तत्व गुन्ह्यात कायदा सुद्धा वापरतो. आपण खूप वेळा गुन्हेगारी बाबतच्या तपासात किंवा खटल्याच्या कामकाजात हे वाचलच असेल की, पोलिस कधीही त्या गुन्ह्यामागचा हेतू किंवा motive आधी तपासतात, पुढे गुन्हेगार सापडतो. न्यायालय सुद्धा न्याय देताना हेतू किंवा motive बघून मगच शिक्षेचं स्वरूप ठरवते. 

असो. कर्मफल हे कर्मानुसार ठरतं, असही एक शास्त्रवचन आहे. पण नक्की या सर्वाची संगती कशी लावायची याचा विचार केला पाहिजे. त्याबद्दल असं म्हणता येईल की, एखाद्या कर्मातील हेतू किंवा भाव शुद्ध असेल आणि त्या कर्माबाबत काही चुका घडल्या तर, माणसाची वृत्ती, त्याचा त्यामागील हेतू आणि भाव जर गैर, चुकीचा, अन्यायकारक नसेल, तर ईश्वर त्याबाबत नरम धोरण स्वीकारत असावा. 

आता ईश्वर हे ठरवत असेल तर प्रत्येक क्षणी तो नित्य, ब्रम्हांडातील प्रत्येक व्यक्ती व त्या प्रत्येक व्यक्तीचं कर्म, त्यामागील हेतू, भाव, यावर बारकाईने स्वतः तरी लक्ष ठेवून असावा. किंवा त्याने तशी काहीतरी व्यवस्था निर्माण केलेली असणार, हे नक्की. कारण ब्रह्मांडाच्या अत्युत्तम रचनेचा निर्माता हा सर्वोत्तम उत्पादन, व्यवस्थापन व प्रशासन शास्त्राचा देखील जनक आहेच. 

काय काय व्यवस्था आहे, यावर आपण पुढील भागात विचार करूया. आजपुरतं इथेच थांबूया. 
 
ॐ शिवशक्ती रुपाय नमः ll
ॐ शिवाय नमः ll
श्रीराम जयराम जय जयराम ll

©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.
9049353809
9960762179
२६/०३/२०२५

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...