Skip to main content

Posts

Showing posts from September, 2023

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५ © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : अनेक आदर्श व अनेक आदर्शांचे मापदंड त्यांनी त्यांच्या आयुष्यात, प्रत्यक्ष कृतीने घालून दिले. एक गोष्ट न ठरवता करून दाखवली ती म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या धाकाने, दडपणाने, भयाने वा परिणामाने डगमगून न जाता, धैर्याने, पण तितक्याच शांतपणे, त्यास सामोरे कसे जावे. प्रारब्धाचे कोणतेही भोग हे शांतपणे आणि धैर्य राखून त्याचा स्वीकार करून , परंतु त्याने डगमगून न जाता, पुढे जात राहणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे.  श्रीशंकर : त्यांचा अजून एक व्यक्तिविशेष, जो आम्हाला आवडतो, तो म्हणजे आदर्श राजाचा वस्तुपाठच जणू त्यांनी जगाला घालून दिला. राजाने सतत म्हणजे अष्टौप्रहर फक्त जनांचा आणि त्यांच्याच आशा आकांक्षा यांचा विचार करावा.  एकदा राज्यपदी बसल्यावर, स्वतःच्या परिवाराकडे सुद्धा एक प्रजा म्हणूनच पाहावे, याच उत्तम उदाहरण प्रभूंनी स्वतःच्या आदर्शवत जीवनाने, पुढील कित्येक पिढ्याना दाखवून दिलं आहे. राजाने फक्त लोकोपयोगी कार्य आणि लोकांच्या भल्याचाच विचार सतत करणं, गरजेचं आहे. रामराज्य ही एक अशक्य वाटणारी कल्पना, त्यांनी प्रत्यक्ष...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ४ © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले आज कैलासावर स्वये श्रीनारायण आपल्या दोन भिन्न प्रकृती रुपात आणि त्या रूपातील आपल्या अर्धांगीसह आले आहेत म्हणजे नक्कीच काही प्रयोजन वा कोणत्या तरी कार्याचे नियोजन करून अथवा करण्यास आले असावेत असा कयास करूनच श्रीमहादेवानी पृच्छा केली " आज कैलास पर्वती आपण मूळ स्वरूप त्यागून या रुपात प्रकट झालात. काही प्रयोजन आहे का ? " श्रीराम : आपल्या दर्शनाची वेडी आस आम्हाला आपल्या प्रत घेऊन आली. अनेक वर्षे झाली आपली फक्त समाधी अवस्थेत ध्यानयोगातच भेट होत आहे. म्हणून विचार आला की प्रत्यक्ष रुपात, आपले दर्शन घ्यावे. त्याच उद्देशाने आज उपस्थित झालो. येऊन पहातो तर काय, प्रत्यक्ष श्रीकृष्ण तेसुद्धा, देवी रुक्मिणीसह, समोर पहावयास मिळाले. दर्शन तर झालेच, पण काही सद्विचार ऐकण्याचे भाग्य आणि योग जुळून आला. श्रीकृष्ण : प्रभू आपण अगदी मनकवडे आहात, अर्थात आहातच म्हणा. भक्तांच्या मनातील भाव भक्तांनी न वदता, आपण जाणता. यात गुंजभरदेखील मिथ्या वचन नाही. काय कैलासनाथ.  श्रीशंकर : अर्थात आम्ही पूर्ण सहमत आहोत. प्रभू श्रीराम म्हणजे साक्षात भक्तवत्स...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३

श्रीराम श्रीकृष्ण संवाद ३  © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : परंतु आपल्यामध्ये काही साम्य स्थळं सुद्धा आहेत. श्रीराम : अर्थात  श्रीकृष्ण : आपण दोघांनीही एका स्त्री खल प्रवृत्तीला संपवलय. जस आपण त्राटीका आणि आम्ही पुतना, आम्ही कर्णाला तो युद्ध थांबवून रथातून खाली उतरला असताना वधावयास लावले आणि आपण मित्रकर्तव्या स्तव वालीवध केलात. दोन्हीमध्ये उद्देश एकच खल प्रवृत्ती नष्ट करणे आणि जर ती त्या व्यक्तींबरोबर संपणार असेल व त्यासाठी कोणत्या ही मार्गाचा वापर गरजेचा असेल तर, तो न्याय नीतिसंमत आहे. उद्देश मात्र खल नव्हे तर खलप्रवृत्ती नष्ट होण गरजेच आहे.  श्रीराम : आम्ही असं मानतो की, जे घडावं हे नियती विहित आहे, ते फक्त घडवण्याचं कार्य करण्याचं स्वातंत्र्य मानवी देहात असतं. हे अर्थात आमचं जीवना बद्दलच तत्वज्ञान आणि श्रद्धा.  श्रीकृष्ण : अर्थातच म्हणूनच मानवी जन्मात मुख्य कर्म हे सज्जन रक्षण आणि खल निर्दालन हेच असावं, विशेषतः तुम्ही सत्ताधारी असताना. पण सर्वसामान्य जीवास मात्र निज कर्तव्य आणि या देही आल्याचं सार्थ कर्म कृतीत आणून मिळालेला जन्म संचित कमी करून, ...

श्रीराम श्रीकृष्ण संवाद २

श्रीराम श्रीकृष्ण संवाद २ (काल्पनिक) © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : आपण स्वयं हे जाणता की, त्यातील बारा विद्या आणि अठ्ठेचाळीस कला आपणाकडून प्रारब्धवश प्राप्त झाल्या.  श्रीराम : आपल्या वाग्चातुर्याबद्दल आपण ख्यात होतात, हे जाणून आहोत, पण आज प्रत्यय सुद्धा आला. तसं पाहिलं तर, आपल्याला आपले चातुर्य, हर एक क्षेत्रात दाखवण्याची संधी प्राप्त झाली, काळाच्या विशिष्ट परीघ रेषेवर आपण जन्माला आलात. त्यावरही कडी म्हणजे आपण त्या संधीचे सोनं केलंत.  श्रीकृष्ण : सत्य आहे, कदाचित हा त्या काळाचा महिमा असेल. आपला काळ हा सत्ययुग संपून, त्रेतायुग चालू झाल्याचा काळ. जडदेही मानवाच्या वासनारूपाचे, पूर्ण प्रकटीकरण झालेच नव्हते. त्यामुळेच आपल्याला अति दुष्ट दानव पाहण्यास मिळाले. परंतु मानवी रुपात तश्या अभिव्यक्ती अपवादानेच आढळून आल्या असतील.  आमच्या युगात सर्व दानवी शक्ती, या मानवी रुपात प्रकट होऊन आल्या होत्या. त्यादेखील एकाच घरात. जस की सदाचारी वसुदेव आणि त्यांचा मेहुणा दुराचारी कंस. बर कंसाच्या घरात पिता राजा उग्रसेन सुशील आणि सद वर्तनी. पण पुत्र कंस. सख्खे चुलत बंधू कौरव व पा...

जन्म आणि नामस्मरण लेख २

जन्म आणि नामस्मरण लेख २ ©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले.  १. स्वतःमधील दोष व अवगुण दूर व्हावेत म्हणून : .  मनाच्या गाभ्यात असलेले भय, भूक, निद्रा व मैथुन हे चार मुख्य घटक, ईश्वराने माणसाला सुद्धा दिले, याचं मुख्य कारण, प्रकृती आणि पुरुष यांचा समन्वय साधला जावा आणि मानवी वंश, प्राणीमात्रांप्रमाणेच, अविरत, कोणत्याही अडसराशिवाय वा हस्तक्षेपाशिवाय पुढे जात रहावा, या एकमेव उद्देशाने, हे चार मूळ प्रवृत्ती पर गुण, मनात स्थापित केले. अर्थात मनात स्थापित करताना, विचार, विवेक, बुद्धी यांसह जिज्ञासा, ज्ञानप्राप्तीची लालसा, शिकत पुढे जाण्याची वृत्ती, हेदेखील, त्याचं ईश्वरी अधिष्ठानाने, प्रदान केले.  मुळात एक लक्षात ठेवा किंवा कोरून ठेवा. माणसाला या छोट्याश्या देहात प्रकृती पुरुष यांसह जे जे प्रदान केलं आहे, ते ते सर्व युगाच्या सुरुवाती पासून, ते कल्पांतापर्यंत पुरेसं दिलेलं आहे. हे नक्की. म्हणजेच नराचा नारायण होण्या साठी आवश्यक सर्वच, माणसाच्या ठायी आहेच. पण त्या नराचा असुर करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा बहाल करताना, ईश्वराने फक्त एक कर्मफल नियम त्यात घालून दिला. म्हणजेच कल...

जन्म आणि नामस्मरण लेख १

जन्म आणि नामस्मरण लेख १  ©® संकल्पना, माडणी आणि लेखन : प्रसन्न आठवले मानवी देहात जन्म घेतल्यावर, नामस्मरण का करायचं या मुख्य गाभ्याला धरून लिहिण्यात येणारी ही मालिका आहे. याची मुख्य पाच कारणे आहेत. प्रत्येक कारण विस्ताराने बघून नंतर पुढच्या कारणाकडे आपण वळणार आहोत.  १. स्वतःमधील दोष व अवगुण दूर व्हावेत म्हणून : प्रत्येक माणसात, नव्हे प्रत्येक प्राण्यात, अनेक प्रकारचे दोष असतात. वर्तणुकीचे दोष, स्वभावाचे दोष, चारित्र्याचे दोष, समूहात वावरताना अडसर निर्माण करणारे दोष, मनातील संचितातील दोष, देहबाह्य संस्कारांचे दोष, बाल्यावस्थेत जोपासले गेलेले दोष, आयुष्यात प्रत्येक क्षण घडत जाणाऱ्या घटनांचे दोष इत्यादी अनेक प्रकारचे दोष प्रत्येक माणसात असतात.  दोषांची निश्चित व्याख्या करणं अवघड आहे. पण प्रत्यक्ष दोष म्हणजे आपण वागताना ज्या चुका होतात आणि ज्या चुकांनी स्वतःला आणि दुसऱ्याला हानी पोचते वा पोचू शकते, त्याला दोष म्हणता येईल. किंवा वागण्या तील त्रुटी, कमतरता, अती पणा याला दोष म्हणता येईल.  यात स्वतःला आणि दुसऱ्याला हे मुद्दाम लिहिलं आहे. कारण दुसऱ्याला आपल्या वागणुकीतून अवग...

श्रीराम व श्रीकृष्ण संवाद भाग १ (काल्पनिक)

श्रीराम व श्रीकृष्ण संवाद भाग  १ (काल्पनिक) © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले हा लेख आणि यातील संवाद पूर्णतया काल्पनिक आहे. पुराणात वा इतिहासात याचा शोध घेऊ नये.  यामध्ये कल्पना अशी केली आहे की श्रीराम-जानकीदेवी हे श्रीकृष्ण-रुक्मिणीदेवी हे, कर्मधर्म संयोगाने कैलासावर श्रीमहादेव-देवी पार्वती यांना,भेटण्यास जात आहेत. वास्तविक रुपात, त्यांनी मानवी देह त्याग केला असला तरीही, चैतन्य रुपात ते तत्वरूप चिरंतन आहेत. म्हणूनच त्याच रुपात ते सर्वदूर वावर करू शकतात. याच आधाराने हा लेख लिहिला आहे.  परमात्मा श्रीकृष्ण व माता रुक्मिणी हे माता जानकी आणि प्रभू श्रीराम याना प्रणाम करतात.  श्रीकृष्ण व  रुक्मिणी : प्रणाम तुम्हा उभयतांना.  श्रीराम व जानकी : प्रणाम आमचा सुद्धा.  श्रीकृष्ण : माझ्या अनुमानानुसार आपली प्रथम भेट आहे.  श्रीराम : हो प्रथम भेट आहे.  श्रीकृष्ण : महादेवाच्या भेटीस्तव आला आहात अस दिसतंय.  श्रीराम : हो आपल्या प्रमाणेच.  श्रीकृष्ण: दीर्घकाळापासून काही प्रश्न होते मनात, आपली अनुमती असेल तर वदावे असे म्हणतो. श्रीराम : अवश्य. किंबहुन...