श्रीराम श्रीकृष्ण संवाद ५ © ® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले श्रीकृष्ण : अनेक आदर्श व अनेक आदर्शांचे मापदंड त्यांनी त्यांच्या आयुष्यात, प्रत्यक्ष कृतीने घालून दिले. एक गोष्ट न ठरवता करून दाखवली ती म्हणजे कोणत्याही गोष्टीच्या धाकाने, दडपणाने, भयाने वा परिणामाने डगमगून न जाता, धैर्याने, पण तितक्याच शांतपणे, त्यास सामोरे कसे जावे. प्रारब्धाचे कोणतेही भोग हे शांतपणे आणि धैर्य राखून त्याचा स्वीकार करून , परंतु त्याने डगमगून न जाता, पुढे जात राहणे, हेच मानवाचे कर्तव्य आहे. श्रीशंकर : त्यांचा अजून एक व्यक्तिविशेष, जो आम्हाला आवडतो, तो म्हणजे आदर्श राजाचा वस्तुपाठच जणू त्यांनी जगाला घालून दिला. राजाने सतत म्हणजे अष्टौप्रहर फक्त जनांचा आणि त्यांच्याच आशा आकांक्षा यांचा विचार करावा. एकदा राज्यपदी बसल्यावर, स्वतःच्या परिवाराकडे सुद्धा एक प्रजा म्हणूनच पाहावे, याच उत्तम उदाहरण प्रभूंनी स्वतःच्या आदर्शवत जीवनाने, पुढील कित्येक पिढ्याना दाखवून दिलं आहे. राजाने फक्त लोकोपयोगी कार्य आणि लोकांच्या भल्याचाच विचार सतत करणं, गरजेचं आहे. रामराज्य ही एक अशक्य वाटणारी कल्पना, त्यांनी प्रत्यक्ष...