Skip to main content

Posts

Showing posts from August, 2020

गीत विश्लेषण - जलते है जिसके लिये

 गीत विश्लेषण - जलते है जिसके लिये  जलते हैं जिसके लिये, तेरी आँखों के दिये ढूँढ लाया हूँ वही, गीत मैं तेरे लिये जलते हैं जिसके लिये दर्द बनके जो मेरे दिल में रहा ढल ना सका जादू बनके तेरी आँखों में रुका चल ना सका आज लाया हूँ वही गीत मैं तेरे लिये जलते हैं जिसके लिये  दिल में रख लेना इसे हाथों से ये छूटे न कहीं गीत नाज़ुक है मेरा शीशे से भी टूटे न कहीं गुनगुनाऊंगा यही गीत मैं तेरे लिये जलते हैं जिसके लिये जब तलक ना ये तेरे रस के भरे होंठों से मिले यूँ ही आवारा फिरेगा ये तेरी ज़ुल्फ़ों के तले गाये जाऊंगा यही गीत मैं तेरे लिये जलते हैं जिसके लिये चित्रपट : सुजाता (१९५९) निर्माता निर्देशक : बिमल रॉय  गीत : मजरूह सुलतानपुरी  संगीत : एस डी बर्मन  गायक: तलत मेहमूद  परिणिता, दो बिघा जमीन, देवदास, मधुमती, यहुदी, बंदिनी या महान आणि यादगार चित्रपटांचे निर्माते दिग्दर्शक बिमल रॉय यांचाच सुजाता हा सामाजिक संदेश देणारा आणि अस्पृश्यता या विषयाला मार्मिकपणे मांडून कोणत्याही तिखट भाष्याशिवाय फक्त दृश्यातून हृदयापर्यंत पोचवणारा सहजसुंदर चित्रपट. मुळात बिमल रॉय हे सामाजिक ज...

वाफाळलेला चहा आणि नाम

वाफाळलेला चहा आणि नाम वाफळलेल्या चहाचा परिमळ अर्थात गंध दुरून जरी आला तरी मनाला प्रफुल्लित आणि प्रसन्न करतो. हा बहुतेक सार्वत्रिक अनुभव आहे. पंचेंद्रियांना जाणवणाऱ्या बाह्य गोष्टींमध्ये सर्वात उच्च म्हणजे गंधाचा अनुभव देणारी नासिका अर्थात घ्राणेंद्रिय आणि आवाजाचा प्रत्यय देणारे कर्णेद्रीय.  याचं कारण म्हणजे डोळे उघडून एखादी गोष्ट पहावी त्यांनतर त्या दृश्याचं  ज्ञान होतं. त्वचेपर्यंत एखादी गोष्ट नेली तरच त्याच्या स्पर्शाचं  ज्ञान त्वचेला होतं आणि जिव्हेला त्यापर्यंत एखादी वस्तू नेली तरच त्याच्या चवीचं ज्ञान होतं.  पण कर्ण आणि नासिका  किंवा घ्राणेंद्रिय यांचं तसं नाही. दुरून येणाऱ्या लहरींचं ज्ञान त्या लहरी त्या इंद्रियांपर्यंत पोहोचल्या तरी त्यांना त्याचं ज्ञान होतं. म्हणजेच विश्वनिर्मात्याने जग निर्मिती करून जीवनिर्मिती करताना असे काही संकेत दिलेत ज्यायोगे प्राणी आहे त्या जागी काही गोष्टींचं ज्ञान करून घेऊ शकतो.  अर्थातच यात शरीरातील कर्णेद्रीय आणि घ्राणेंद्रिय या सारखी ज्ञानेंद्रिय आहेत, जी कोणतीही शारीरिक हालचाली न करता, ज्ञान प्राप्त ...

ll माझाराम राजाराम ll

ll माझाराम राजाराम ll   रुप सुंदर घनश्याम वर्ण,  माझा राम पौरुषी सुवर्ण,  धरी धनुष्य जेन्व्हा हाती ,  दुर्जनांची हतबल होय मती निश्चली राम निगर्वी राम  शांतसागर शीतल राम  दृढनिश्चयी  निग्रही राम कर्म क्रियाशील राम  उदार धीरगंभीर राम   मर्यादा पालक राम प्रसन्न सुंदररूप राम जगउद्धाराक राम  मायनाशक राम भक्तवत्सल राम भक्तांहृदयी राम दीनानाथ राम अपराजित राम मंगलदायक राम रघुपतीराघव राम मोक्षदायक राम गुणिजनतारक राम दाताराम धाताराम सुखकारक राम संकटनाशक श्रीराम श्रीराम जयराम श्रीराम राजाराम राजाराम  पतितपावन राजाराम ©® कवी : प्रसन्न आठवले २५/०८/२०२० ०७:४७  

वेड्यांचा देश - भारत अर्थात हिंदुस्थान

वेड्यांचा देश - भारत अर्थात हिंदुस्थान  हा देश खरंच वेड्या लोकांचा देश आहे. सत्तेसाठी वेडे होऊन स्वकीयांचा , स्वधर्मियांचा व स्वदेशाचा गळा घोटणार वेडे या देशाने जसे बघितलेत तसेच या देशाने स्वकीयांसाठी, स्वधर्मियांसाठी आणि स्वदेशासाठी घरादारावर नांगर फिरवणारी कुटुंबाच्या कुटुंबं पाहिलीत. किंबहुना या देशात ज्या काही गोष्टी घडल्या , घडतात आणि घडतील त्या फक्त आणि फक्त वेड्यानीच घडवल्यात. बाकी सगळे  सामान्य जीव. काही प्रातिनिधिक उदाहरणं मांडतो.  आपण वानर आहोत हे ज्ञात असूनसुद्धा त्रिलोकविजयी रावणाच्या बलाढ्य राक्षस सैन्याशी युद्ध करून हजारो वर्ष जीवित असलेल्या आणि मृत्यूला दावणीला बांधलेल्या रावणाला यमसदनी पाठवण्याची जिद्द बाळगून असलेले आणि फक्त प्रभू रामचंद्रांच्या शब्दावर श्रद्धा आणि विश्वास ठेवणारे हनुमंत ,सुग्रीव, अंगद, नल नील यासह अगणित वानरवीर आणि यक्षराज जांबुवंत हे देखील याच वेडेपणाच्या व्याख्येतील वेडे.   कोणत्याही परिस्थितीत सखा अर्जुन याचं रक्षण करण्याचा आपला धर्म पाळण्याचा आणि त्यासाठी कराव्या लागतील तितक्या युक्त्या प्रयुक्त्या करून मार्ग काढून न्या...

सुशांत प्रकरण, महाराष्ट्र आणि काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका.

सुशांत प्रकरण, महाराष्ट्र आणि काँग्रेसची महत्वपूर्ण भूमिका.  संपूर्ण सुशांत प्रकरणात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे कि, काँग्रेस यावर अजून तरी फार काही बोलत नाहीये. याची दोन कारणं  आहेत. एक म्हणजे त्यांचं राजस्थान प्रकरण निस्तरण्यात ते व्यस्त होते. दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील त्यांची भागीदारी हि निव्वळ दिखाऊ आणि शोकेस मधली आहे. अस  माझं स्पष्ट मत आहे. याचं  खूप महत्वाचं कारण कि, सेनेची इतिहासातील प्रतिमा,  त्या प्रतिमेचा त्यांच्या इतर राज्यातील निवडणुकांवर होऊ शकणारा परिणाम जो त्यांना अजून मोजता येत नाहीये. महाराष्ट्रात सत्ताबदल झाल्यानंतर पहिलीच निवडणूक येईल ती बिहारची. ज्यामध्ये मुस्लिम आणि स्थानिक बिहारी मतांची जातीनिहाय व तत्सम गणती कशी होते यावर त्यांचं बराचसा भविष्य अवलंबून आहे. मुस्लिम मत जेडीयू आणि लालूप्रसाद यांचा पक्ष राजद यातच मुख्य विभागली जातील. नितीशकुमार यांनी पाच वर्ष सत्ता हातात राखतानाच ते पहिल्या दोन सव्वा दोन वर्षातच  युती केलेल्या राजद पक्षाशी काडीमोड घेत भाजपाकडे येणं किती गरजेचं होतं ...

मय्या मी न खाई नवनीत

गोकुळाष्टमी काल साजरी झाली. आज दहीकाला त्यानिमित्ताने संतकवी सुरदास यानी लिहुन अजरमार केलेल्या गीताला मराठीत लिहिण्याचा प्रयत्न केलाय. "मय्या मोरी मै नही माखन खायौ " का घेसी आळ मजवरी मय्या मी का तुझा वैरी  मी न खाई नवनीत मय्या मी न खाई नवनीत भल्या पहाटे हाती देसी लाठी घोंगडी नाजूक हाती धाडसी वनी गोधनासंगे तिथे पावा उरतो हाती  सांजेला घरी येई परत  खाई कधी नवनीत  मय्या मी न खाई नवनीत बालक मी किती ग सानुला नाजूक हात कसे पोचती शिंक्यावर मैय्या तू ठेवसी गवळीबाळे बळेच देती मुखी घालीती घास  मी न खाई ग नवनीत मय्या मी न खाई नवनीत मय्या तुझ्या मनी काय ग   सांगती जन जे विश्वासे तु  त्यांच्या वचनावर विसंबुन मज जाणसी का परका तु तुला पाहुनी भोळी जननी काहीही गवळीणी सांगतात  परी मय्या मी न खाई नवनीत  मय्या मी न खाई नवनीत असा तुझ्या मनी भेद असता फुकाचे मी काम का करावे ही घे लाठी अन घोंगडी गोधन चरण्या कुणाही द्यावे मजला हे ना रुचे वागणे मय्या का खाईन मी नवनीत  मय्या मी न खाई नवनीत © ® कवी ः प्रसन्न आठवले १२/०८/२०२० ०३ः३७ दहीहंडी दिनानिमित्त...

श्रीराममंदिर निर्माण कार्य आरंभ झाल्याबद्द्ल क्रुतज्ञता, आभार, शुभेच्छा आणि सदिच्छा !!!!!

श्रीराममंदिर निर्माण कार्य आरंभ झाल्याबद्द्ल क्रुतज्ञता, आभार, शुभेच्छा आणि सदिच्छा !!!!! ५ ऑगस्ट, २०२० हा दिवस खरच सनातन हिंदू धर्माच्या गेल्या सातशे ते आठशे वर्षांच्या जुलमी राजवटीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे. गत काळाच्या  आक्रमकांच्या खुणा पुसून तिथे मूळ संस्कृतीच्या स्थापत्याला प्रस्थापित करण्यासाठी, आक्रमकांची सत्ता आणि सद्दी संपल्यानंतर, म्हणजेच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर, वास्तविक पूर्ण सक्षमतेने आणि कोणत्याही अडथळ्याविना सोमनाथ पाठोपाठ लगेचच सुरवात व्हायला हवी होती. खात्रीने सांगतो की, जर सरदार पटेल १९५० नन्तर जीवित असते, तर नक्कीच सोमनाथनंतर काशी, मथुरा आणि अयोध्या ही प्रातिनिधीक स्थानं १९५० च्या दशकातच मुक्त झाली असती. आज या गोष्टीचा विचार केला तर कदाचित, जी गोष्ट ६०, ७० वर्षांपूर्वी सहजी करून तो मुद्दा लोकांच्या हातात जाऊ न देता सोडवून अन्यायाची भावना वेळीच दूर केली असती, तर त्यातून अनेक गोष्टी साध्य झाल्या असत्या.  १. सत्तर वर्षात हिंदूंना जी अखंड अन्यायाची भावना सतत जाणवत राहिली, ती मुळात जागृत झाली नसती.  २. सोमनाथमंदिरावर फारशी चर्चा न हो...