Skip to main content

पाहिली कविता






कविता

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

सरसरून ये भरभरून ये सळसळून ये 
वर्षा सारखी शिशिरासाराख्री ये  बहरलेल्या वसंतासारखी ये 
शृंगारिक रसासारखी ये मोहरलेल्या गुलमोहरासारखी ये 
अम्रपल्लवा सारखी ये पिंपळ पानासारखी ये ।।१।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

तळमळून येउ नकोस कळवळून येऊ नकोस 
ग्रीष्मा सारखी येऊ नकोस वैशाखा सारखी येऊ नकोस 
उफाळलेल्या समुद्रा सारखी येऊ नकोस 
घोंघावणाऱ्या तुफाना सारखी येऊ नकोस ।।२।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

शांत सागरा सारखी ये शीतल झुळुके  समान  ये 
तांडवा सारखी येऊ नकोस उत्ताना सारखी येऊ नकोस 
समाधिस्थ महेशा सारखी ये ध्यानस्थ र्हुशिकेषा सारखी ये 
पाटीवरील शारदे सारखी ये वक्रतुंड मोरया सारखी ये ।।३।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

विणे सारखी ये झंकारत   घंटे सारखी ये नादावत 
तबल्या सारखी ये थिरकत मृदुंगा सारखी ये वाजत 
सतारीच्या बोलासारखी ये घुन्घरांच्या पावलांनी ये 
मंजूळ बासरी सारखी ये कृष्णाचा  पावा बनून ।।४।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

उसळलेल्या लाटा शांत करणार्या आकाशा सारखी ये 
अंधाराचा नाश करणार्या सुर्य प्रकाशा सारखी ये 
मृगेन्द्रा सारखी ये नरेंद्रा सारखी ये सुरेन्द्रा सारखी ये 
मृगजळा सारखी न येता जलाधारांसारखी ये ।।५।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

गिधाडा सारखी येऊ नकोस गरुडा सारखी ये 
घरीसमान सूर मारून विजेसारखी ये 
कृष्णा सारखी ये आणि योगेश्वरा सारखी ये 
मेनकेसारखी येऊ नकोस राधे सारखी ये ।।६।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

वाट पाहतोय तुझी मी शृंगारिक होऊन ये 
आरक्त नेत्रांनी तृप्त करणार्या सौंदर्ये सारखी ये 
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये 
ये माझ्या कविते ये ये माझ्या कविते ये ।।७।।

ये माझ्या कविते ये  ये माझ्या कविते ये ।।धृ ।।

कवी : प्रसन्न आठवले
माझी पहिली कविता

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...