Skip to main content

Posts

Showing posts from October, 2015

गम

गम कूछ तो गम है या है कशिश या है गीला या कू छ सबब ।। कू छ तो बात है शायद होठोंतक आके रुकती है क्या है रब ।। मुझे मेरे दिल की बात क्या पता क्यूँ लगता है गम कू छ ।। है तो सही एक काटा सा चुभता है दिलमे है तो कू छ ।। कू छ पानीसा कू छ खालिसा अहसास है कू छ दर्द पराया ।। लगता अपना गम है कू छ दिल में काटा है सताया।।   शायर : खूशमिजाज आशिक

लढत

लढत तू राहा खंबीर जग घाव घालेल वर्मी उफाळून येतील पूर वासनेच्या बैलांचे ।। तुझ्या पाठीशी लागतील ढूशी  देवून कळप लाज सोडलेल्या सापांचे ।। खूप होतील प्रयत्न दबाव आणून तुझे मत परिवर्तन करण्याचे ।। तू राहा ठाम कायम चट्टाणासारखी बळ तुला अतूट लढण्याचे ।। घेतील जरी पिशाच्चे घास तुझ्या साऱ्या पुण्याईच्या अनुरूपाचे ।। पूरुन उरशील त्याना तुझे आहे जिगर जिगरबाज लढवय्याचे ।। कोणी नसेंल  यात पण मी असेंन तुझ्या पाठी उभा खात्री बाळग ।। उड़ेल धूळ  धूक्याची जेंव्हा   असेल एक सावली खात्री  बाळग।। कवी : प्रसन्न आठवले

विचार १

विचार १ कधी कधी एखाद्याच् रागावण आपल्याला भावत , राग येत नाही त्याच्या बोलण्याचा,  जर ते निर्हेतुक प्रामाणिक आणि सच्च्या माणसाकडून असेल तर. कारण त्याच्या बोलण्यात राग कमी प्रेम जास्त चिड़ण कमी आणि माया जास्त असते. अश्या वेळी त्याच चिडण खर तर भावालेल असत आपल्याला. किंबहुना त्याच्या रागावण्यात एक आपुलकि दडलेली असते. त्याच ते रागावण आपण मनोमन मान्य केलेल असत. एरवी आपण कुणाच्या बापाला पण भाव देत नसू पण ती व्यक्ति आपल्याला रागावते हे मनात कुठेतरी आपण स्विकारलेल असत . हे तेंव्हाच शक्य असत जेंव्हा ती व्यक्ति प्रामाणिक सच्च्या दिलाची निरलस आणि सदाचारी असते. जेंव्हा त्याचा हेतु साफ निःसंशय तळमळीचा आणि कोणत्याही गैरहेतुशिवाय असतो. आणि अश्याच व्यक्तीचा आपण आदर राखतो त्याच्या चिडण्याला संमानपूर्वक स्विकारतो .

धुंदी

धुंदी हां गुन गुन गुन गुन भ्रमर गुंजतो मन गीत मधुर प्रेमाचे गाते धुंद दिशा मोहरल्या साऱ्या आसमंत प्रेमातच विरते   या रंगीत रेशिम इंद्रधनुच्या रंगातच फूलती कळ्या पाकळ्या वारा मंद स्मित तव घेऊन आला तव आठव तो आला का  तुझ्या  जाणवल्या मज त्या चेहऱ्यावर रेषा बावरल्या मज  घेऊन जा  प्रिया जिथे रे   दशोदिशा का असुसलेल्या का ओढ़ मना जाणवते भासे तुज पाशी ती घेऊन जाते फूले शहारा अंगावर तो तू धुंद चांदणे होऊन जाते कवी : प्रसन्न आठवले

कान्हा

 कान्हा वेंची वेंची मन राधेचे सांडे तव पाठी दमले सगळे गोकुळ अवघे गेले नदी काठी कृष्णा कान्हा रे घनःशामा  ।। सोडुनि दिधले विरही तीजला काय गुन्हा घडला तव नामाची आस लागली हाच पात घडला कृष्णा कान्हा रे घनःशामा  ।। पुनरपी भेटी नच येसी रे काय करे राधा येसी ऐसी आस राखली श्वास तिचा शामा कृष्णा कान्हा रे घनःशामा ।। हेतु तव तू राधा मोहन ब्रीद खरे करीरे तू येई हे एकवार तीज पाहुनी घेई रे कृष्णा कान्हा रे घनःशामा ।। कवी : प्रसन्न आठवले

किलबिल

किलबिल छोट्या छोट्या किलबिल कुंजित आवाजाचा नाद मधुर तो क्षणात भासे तान्हुल्या त्या  देवाचा तो अंश सानुला भास् कसा तो वाटे क्षणभर जणू दुधातच साय साखरी छोट्याश्या त्या जगात त्यांच्या फूल गुलाबी असे भासते जणू वर्खाचि बर्फी घेऊन हातामध्ये देव प्रकटला अश्या सुवासिक दिवसाची ती किती छान अंन आनंदाची अशी जाहली प्रारंभी की पूर्ण दिवस सोन्याच्या झाला कवी : प्रसन्न आठवले

ओढ भेटीची

ओढ भेटीची  एक अनामिक ओढ़ जाणवे  खेचून काही नेते मज का  का वाटे ही हूरहूर नूसती  नसता माझ्या मनात शंका का व्हावी  ही भेट वाटले  का वाटे हा मोदच  भेटूनी  असे अचानक का व्हावे  भासे काही गेले निसटूनी  उरात होते का ही धडधड  का होई हा श्वास जलदही    का पाउल हे पडते अडते  का भासे हे फिरते जगतही पुन्हा कधी का होईल हेही  नच जाणवले कधी कसेही  मृदुल मनाची जाणीव नव्हती  कि हे रम्यच स्वप्न असेही   विसरून गेले जाणीव सगळी  वाटे आता काही न उरले  फक्त एक काळोखी मिणमिण  बाकी सारे स्वप्नी सरले  का रे मजला ओढ जाणवे  तुझा मनाच्या कडे कपारी  का हे आहे असेच स्पंदन  आहे का मी उगा बावरी  निशा भासते गेली संपून  उरे उगवती उषा जणू हि  रंग बदलले दिशा दिशातील   जणू मनातील संपून  तीमिरही  कवी : प्रसन्न आठवले 

जीवन

जीवन  अथांग समुद्र मनाचा पसरुन वाट धूक्यातून शोधे कोणी निळ्या निळ्या या जळा मधूनिया खोली त्याची शोधे कोणी  कूठे निवारा  कू ठे किनारा  कू ठे कवडसा शोधे कोणी कू णा इथे का सूख मिळते   उत्तर शोधून पाहे कोणी  उगा जीवा का त्रागा कोणा का नच रस्ता सापडतो मग कू णी उगीच हां विचार करतो साथ लाभली का न पुरेशी  कू णी कधी हे जाणून घेण्या प्रश्न विचारी मनास आपूल्या समुद्र तरी तो  कू ठे  कू णाला उत्तर देण्या हाती येतो  उरे काही का नसे शेवटी हे नच कोणा कळते कधीही  तरी पुन्हा ती भटकंती रे करसी मिळण्या उत्तर केवळ  कोणा वाटे मज का साथी नसे भेटला आयुष्याचा कोणा वाटे असे भेटला पण का सोडूनि गेला लवकर  कू णी शोधतो अनेक साथी वाटे त्याने उत्तर मिळते कू णी फिरे मग दारोदरि भटकंती ती प्रश्ना पायी  असे  कू णाला ठाऊक उत्तर याचे ते या वाटे सूखीवर पण मग त्याना असे वाटते उत्तर नसते तर किती गम्मत  कू णी मानतो की जग मिथ्या  कू ण...