Skip to main content

आई ती आईच

आई ती आई. ( शेवटपर्यंत जरूर वाचा)

आमच्या बेडरूममधील एका खिडकीवर बाहेरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत (जिथे Ac चं ducting आहे, पण सध्या Ac नाही) बरीच रिकामी जागा आहे, म्हणजे होती. सध्या २ महिन्यांपासून तिथे एका मैना / साळुंकी हिने घरटं केलंय. साधारण एखादं महिने आधी त्यात अंड or अंडी घातलं / घातली.

बहुदा त्याच वेळी २ वा ३ पिल्लं जन्माला आली. आज ती पिल्लं महिन्याची झालीत साधारण. या महिन्याभरातील त्यांच्या सर्व हालचाली कानाने टिपल्यात. मी जितका वेळ घरी असतो तेवढ्या वेळात जेंव्हा जेंव्हा बेडरूममध्ये असतो, तेंव्हा तेंव्हा मी कानाने पूर्ण निरीक्षण करतो.  डोळ्यांनी फक्त त्यांची आई वरच्या घरट्यात जाते आणि बाहेर येते , ते दिसतं. पण बाकी घरट्यातील सर्व हालचाली कानांनी टिपतो, त्याच पृथक्करण करतो आणि काय काय चालू असेल हा निष्कर्ष काढतो. यात खालील मुद्दे माझे निष्कर्ष म्हणून मांडतो.

१. बहुतेक सर्व कामं , अर्थात पिल्लांसाठीची आईच करते. बाप फक्त आईने जास्त आरडा ओरडा केला तर हजर राहून दोन तीन आवाज देतो निघून जातो.

२. पिल्लांचं खाणं आणणं, त्यांना भरवणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांच्या हालचाली टिपणं त्यांचं शिक्षण आणि त्यांना जपणं इत्यादी सर्व आईच करते. बाप फक्त घरटं बांधताना नियमित मदतीला होता, कारण पिल्लं येणार हे निसर्ग नियमाने त्याला समजलं असेल.

३. पिल्लांवर लक्ष ठेवतानाच आमच्या हालचालींवर सुद्धा देखरेख ठेवणं हे महत्वाचं काम आईच करते. खिडकीला लागून गुलमोहराचं बहरलेलं झाड आहे. त्यावर वा खिडकीच्या ग्रील्सवर बसून सख्त पहारा ती देत असते. यात क्षणाचाही कसूर होणार नाही वा होत नाही. आम्ही कोणीही त्या खिडकीच्या जवळ जायचा अवकाश ती जिथे असेल तिथून येऊन विशिष्ट कर्कश्य  आवाजात आरडा ओरडा सुरू करते. मोठी कुतूहलाची गोष्ट आहे.  यात अजून एक म्हणजे ती बराच वेळ ओरडत असेल, विशिष्ट आवाजात,  तर बाबा  हजर होतात , काही काळासाठी. ते दुरून लक्ष ठेवत असावेत.

४. सुरवातीला पिल्लांचा आवाज अगदीच नाजूक येत होता, कान देऊन ऐकावा लागे. पण सवयीने आम्ही ओळखू लागलो. नन्तर तो वरच्या पट्टटीत जाऊ लागला. गेले दोन दिवस मी निरीक्षण केलंय  की,  त्यांचं प्रशिक्षण म्हणजे रीतसर training चालू आहे. आपण जसे शब्द शिकतो तसे त्यांचे विशिष्ट शब्द , म्हणजेच आवाजाचे उच्चारण त्यावरून त्यांचे , त्यांच्या भाषेतील अर्थ, हे चालू आहे. एकदा ओरडणं , दोन वेळा ओरडणं , अनेक वेळा ओरडणं याचं खास training 2 दिवस झाले चालू आहे साधारण पहाटे ४, ४३० नन्तर अर्धा , एक तास. वेळ ब्राम्हमुहूर्ताची कोणीही सांगितली नाही त्यांना. पण आपलं शास्त्र सांगतं त्यावेळी शिकलेलं आयुष्यभर विसरत नाही माणूस , नव्हे प्राणीसुद्धा.

६. आम्ही जवळ गेल्यावर ओरडण्याचा आता पुढचा अध्याय आहे. म्हणजे आता आम्ही बेडरूमच्या दारात गेलो तरीही लगेच सुरू करते ती. खिडकीजवळ गेलं तर आकांडतांडव. या ओरडण्याचे 2 प्रकार मी observe केले काल आज. पूर्वी वाटायचं १००% ओरडणं आमच्या साठी आहे. पण २ दिवसात उमगलं की आम्हाला ओरडताना विशिष्ट आवाज एकाच टोन मध्ये असतो.पण त्यात थोडे variation करून ती थोडा सौम्य टोन पिल्लांवर डाफरायला वापरते. बहुदा ती पिल्लं मस्ती करत असताना , उगाचच भूक भूक करत असताना आणि घरट्याबाहेर येण्याचा प्रयत्न करताना तीन वेगळ्या स्वरात ती ओरडते. त्यात कर्कशपणा कमी धाक जास्त जाणवतो. आमच्यावर ओरडताना तो कर्कश्यपणा स्पष्ट जाणवतो.

या सर्वांमुळे मला माझ्या आईने आम्हाला मोठं करताना काय काय खस्ता काढल्या असतील , काय काय प्रकार केले असतील मनोरंजनाचे , काय काय सुरक्षा उपाय केले असतील, काय काय कष्ट केले असतील , ते सर्व अंदाजाने या एका महिन्यात समजलं. अभिमान वाटला. जे आम्ही पाहू शकलो नाही , अर्थातच लहान असल्यामुळे व आठवत नसल्यामुळे , ते सर्व दृश्य स्वरूपात देवाने दाखवून दिलं , या एका महिन्यात.

देवाचे आभार त्याबद्दल. पण आईचे कसे मानू , म्हणून कृतज्ञता फक्त आणि प्रार्थना हीच आई जन्मोजन्मी मिळावी.

© लेखन : प्रसन्न आठवले
२५/०६/२०१९
२०:२०

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...