Skip to main content

दिलिपकुमार

अभिनय सम्राट  -  शोकांतिकांचा बादशहा

अभिनयाच्या क्षेत्रातील सर्व शिखरं पदाक्रांत करुन उरलेला. ज्याकाळी गाणं म्हणजे अभिनय आणि गायक तोच नट अशी दुय्यम स्थिती असताना त्याने प्रवेश करून अभिनयाच्या व्याख्या स्वहस्ते लिहिल्या. स्वतच्या पडद्यावरील वावराने आणि सहजसुंदर अभिनयाने ज्याने अभिनयाची नव नवीन परीमाण जन्माला घातली . एका चाकोरीबद्ध आणि नाटकी संवाद फेकीच्याकाळात प्रवेश करून हिंदी चित्रपट सृष्टीला काळाच्या पुढे ज्याने नेल. ८ वेळा फिल्म फेअर अॅवॉर्ड जिंकलेला एकमेव अभिनेता. शोकांतिकांचा बादशहा म्हणजेच Tragedy King या किताबाचा जन्मच याच्या साठी झाला प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक सत्यजीत रे ज्याला " an ultimate method actor " अस संबोधतात.

जो भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाच्या क्षेत्रातील पहिला शब्द आहे आणि राहिल . आपल्या सुदृढ सशक्त पण तरीही संयत अभिनयाने व्यक्तिरेखा साक्षात जिवंत करणारा असा हा भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनयाचा अनभिषीक्त सम्राट म्हणजेच सदाबहार दिलीपकूमार उर्फ युसुफखांन

यांचा जन्म ११   डिसेंबर  १९२२ या दिवशी आत्ताच्या पाकिस्तान मधील  खैबर पाख्तून्वा प्रांतातील पेशावर मध्ये लाला गुलाम सरवर यांच्या घरातील . आणि मूळ नाव मुहम्मद युसुफ खान.  वडील जमीनदार आणि फळांचे व्यापारी होते.  त्यांच्या पेशावर आणि देवळाली येथे स्वत:च्या  बागा होत्या. दिलीपकुमार १२ जणांच्या कुटुंबातील ११वा सदस्य .  दिलीपकुमार याचं शिक्षण प्रसिद्ध बर्न्स स्कूल देवळाली येथील १९३० च्या दशकातील, ज्यादरम्यान  त्यांचं कुटुंब पेशावर सोडून मुंबईला येवून स्थिरावलं . शिक्षण पूर्ण करून साधारण १९४० ला दिलीपकुमार यांनी  घर सोडून पुणे येथे स्वत:च कॅन्टीन आणि फळाचा व्यवसाय चालू केला.

एकदा साधारण १९४३ मध्ये बॉम्बे टाकीज ची मालकीण असलेल्या देविका राणी यांनी  औंध मधील मिलिटरी कॅन्टीन मध्ये ५ '१०" उंची असलेल्या  युसुफ खानला पहिलं.  कारण आदल्याच वर्षी बॉम्बे टाकीज सोडून गेलेल्या अशोक कुमार साठी हिरोच्या शोधत असलेल्या देविका राणीला तो भावून गेला   आणि "ज्वार भाटा" मधील प्रमुख भूमिके साठी निवडलं.   साल होता १९४४.…

आणि याच दरम्यान  प्रसिद्ध लेखक भगवती चरण वर्मा यांनी जहांगीर , वासुदेव  आणि दिलीपकुमार या तीन नावांमधून दिलीपकुमार हे नाव निश्चित केला आणि एक इतिहास जन्माला घातला. पहिला सिनेमा तसा फार चर्चिला गेला नाही. दरम्यान प्रतिभा १९४५ आणि मिलन १९४६ आले आणि  गेले या प्रकारातील होते.

पण १९४७ साली नूरजहान सोबत आलेला "जुगनू" दिलीपकुमारचा पहिला ब्लॉक बस्टर म्हणजेच गोल्डन जुबिली सिनेमा ठरला. १९४८ सालचा "शहीद" अजून एक माईल स्टोन ठरला.

पण यशाचा मुख्य  भागीदार ठरला १९४९ सालचा मेहबूब खानचा , राजकपूर, नर्गिस बरोबरचा  तिरंगी प्रेमाची कथा असलेला सुपर हिट "अंदाज" . ज्याला इंग्रजीत मेजर ब्रेक थ्रू  म्हणतात.  त्याच वर्षी आलेला मेला त्यानां  यशाच्या खूप जवळ घेउन गेला.  

अभिनयाचा बादशहा

१९५० च्या दशकात    झळकलेल्या   "जोगन" (१९५०) , "दिदार" (१९५१) , "दाग" (१९५२), "देवदास" (१९५५), "यहूदी" (१९५८) या सिनेमांमुळे  ट्रॅजेडी किंग अर्थात शोकांतिकांचा बादशहा हि त्यांची पडद्यावरील इमेज तयार झाली.   मधुबाला , नर्गिस , निम्मी , मीनाकुमारी, कामिनी कौशल या त्यावेळच्या काही लोकप्रिय अभिनेत्रींबरोबर त्यांची पडद्यावर जोडी विशेष  जमली.   त्याच दरम्यान त्यांनी  प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक मेहबूब खान यांचे अनुक्रमे "आन" (१९५२) हा हलकाफुलका सिनेमा आणि खलनायकी छटेचा "अमर" (१९५४) हे सिनेमे केले. यातील आन हा सुपर डुपर  हिट ठरला होता.

त्यांनी काही सामाजिक आणि संदेश प्रधान  सिनेमे सुद्धा केले.  जसे : "तराना" (१९५१), "फुटपाथ" (१९५३) , "नया दौर" व  "मुसाफिर"  (१९५७),   "पैगाम" (राजकुमार यांच्या बरोबर पहिला चित्रपट ) (१९५९). त्याच वेळी त्यांनी मनोरंजन प्रधान आणि हलके फुलके असे "आझाद" (१९५५) आणि "कोहिनूर" (१९६०)  सिनेमे केले.

१९६० सालीच त्यांचा के. आसिफ दिग्दर्शित भव्य दिव्य "मुगले-ए-आझम"  झळकला. हा सिनेमे १९७५ पर्यंत बॉक्स ऑफिसच्या बाबतीत १ न. (शोले प्रदर्शित होई पर्यंत) आणि त्यानंतर २००८ पर्यंत  न. २ (गझनी प्रदर्शित होई पर्यंत) वर होता.  या सिनेमातील कलाकार अनुक्रमे पृथ्वीराजकपूर , दिलीपकुमार , मधुबाला, दुर्गा खोटे.  चित्रपट प्रदर्शित झाला  त्यावेळी यातील बराचसा सिनेमा कृष्ण धवल आणि काही भागच रंगीत स्वरूपातील होता. नंतर हाच चित्रपट  २००४ मध्ये रंगीत स्वरूपात पुन्हा प्रदर्शित होता.

१९६१ साली त्यांची निर्मिती असलेला "गंगा जमुना" हा चित्रपट प्रदर्शित झाला . यामध्ये त्यांनी आणि त्यांचा सख्खा भाऊ नसीर खान यांनी अनुक्रमे गंगा आणि जमुना ह्या भूमिका साकारल्या होत्या.गंगा जमुना हा त्या वर्षातील एक यशस्वी चित्रपट होता.  हाच सिनेमा दिवार आणि शक्ती या दोन सिनेमांचा प्ररणा स्त्रोत मानला जातो.   १९६२ साली ब्रिटीश दिग्दर्शक डेविड लीन यांनी दिलीपकुमारना लॉरेंस ऑफ अरेबीया या इंग्रजी सिनेमातील शरीफ अली  या भूमिकेसाठी विचारणा केली होती. पण दिलीपकुमार यांनी त्याला नकार दिला. हीच भूमिका नंतर ओमार शरीफ या इजीप्शिअन  कलाकाराने  केली. १९६४ साली आला  "लीडर".   १९६६ मध्ये "दिल दिया दर्द लिया" या सिनेमाच सह-दिग्दर्शन   दिलीपकुमार यांनी केला होत. आणि १९६८ मध्ये मनोजकुमार आणि वहिदा यांच्या बरोबर त्यांचा "आदमी" हा चित्रपट प्रदर्शित झाला.

७० च्या दशकात त्यांची  कारकिर्द उताराला लागली. या दशकात आलेले  १९७० "गोपी" (सायरा बानू बरोबर पहिला), १९७२ "दास्तान"  आणि  १९७६ मध्ये  "बैराग" (तिहेरी भूमिका आणि  नायिका  सायरा बानू आणि लीना चन्दावरकर) फार यश मिळवू शकले नाहित. त्यामुळे त्यांनी ५ वर्ष सिनेमा पासून विश्रांती घेतली.

पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर १९८१ साली प्रदर्शित झालेला आणि स्वातंत्र्य संग्रामातील एका क्रांतिकारकाची व्यक्तिरेखा असलेला  "क्रांती"  सिनेमा हा त्या वर्षातील एक  यशस्वी सिनेमा होता. १९८२  साली त्यांचा सुभाष घई दिग्दर्शित   "विधाता"  आणि रमेश सिप्पी यांचा "शक्ती" हे  मल्टिस्टार चित्रपट  झकळले. यात विधाता मध्ये शम्मीकपूर , संजीवकुमार आणि संजय दत्त  आणि शक्ती मध्ये अमिताभ बच्चन हे कलाकार त्यांच्यासोबत होते. यातील "शक्ती" मधील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना आयुष्यातील आठवा फिल्म्फेअर पूरस्कार मिळाला.

१९८३ साली बी.आर. चोप्रा यांचा "मजदूर" राज बब्बर सोबत , १९८४ साली यश चोप्रा यांचा "मशाल" अनिलकपूर सोबत  आणि रमेश तलवार यांचा "दुनिया" ऋषी कपूर सोबत हे चित्रपट झळकले. यातील मशाल आणि मजदूर हे  त्या त्या वर्षातील  यशस्वी चित्रपट ठरले होते.  १९८६ साली आलेला सुभाष घई यांचा "कर्मा" एक सुपरहीट चित्रपट ठरला . यात सुद्धा नूतन, नसरुद्दिन शाह , अनिलकपूर,  जॅकि श्रॉफ अशी तगडी स्टार कास्ट होती.  १९९१ साली राज कूमार आणि दिलीपकूमार यांना परत एकदा एकत्र आणणारा सुभाष घई यांचा "सौदागर" हा चित्रपट झळकला. या आधी हे दोन कलाकार १९५९ साली "पैगाम" या चित्रपटात एकत्र आले होते.   सौदागर हा पण व्यावसायिक दृष्ट्या एक यशस्वी चित्रपट होता.

यानंतर त्यांनी प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकत "कलिंगा" चित्रपटाची घोषणा केली पण हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नहि. १९९८ साली त्यांची दुहेरी भूमिका असलेला "क्किल्ला" हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा त्यांच्या आयुष्यातील आतपर्यन्तचा शेवटचा चित्रपट आहे . 

त्यांनी फिल्म फ़ेअर पुरस्कार मिळवलेले चित्रपट :
१. दाग                    - १९५३
२. आझाद               - १९५५
३. देवदास               - १९५६
४. नया दौर             - १९५७
५. कोहिनूर             - १९६०
६. लीडर                 - १९६४
७. राम और श्याम   - १९६७
८. शक्ती                 - १९८२.

त्यांना मिळालेले इतर पुरस्कार
फिल्म फ़ेअर लाइफ़ टाईम अचिएवेमेन्ट अवार्ड १९९३. पद्मभूषण १९९१ आणि पद्मविभूषण २०१५. दादासाहेब फाळके पुरस्कार  १९९४. 

२०११ मध्ये गिनीज बुकात "हयात असलेल्या भारतीय कलाकारांपैकी सर्वात जास्त पुरस्कार मिळालेला कलाकार " या शीर्षका अंतर्गत दिलीपकुमार यांच नाव नोंदवण्यात आल.

                                 ----------०००----------
शब्दांकन आणि संकलन : प्रसन्न आठवले
आभार - विकिपीडिया

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...