Skip to main content

निर्माता


निर्माता 

शब्दघन येतात  जूळूनी चिंतनी सामर्थ्य वाहे 
मोजक्या शब्दात सांगे भाव ती जाई प्रवाहें 
काव्य ते स्फुरते सृजनता  देणं आहे  त्या प्रभूची 
स्वप्नवत वाटे अशी ही शक्ती जणू त्या शारदेची 

का कूणाला या इथे मन मांडता येते सहजची 
का कूणी येथे  खेळतो शब्द तेही  सोंगटीवत 
का कूणी येथे झगडतो मांडण्या त्या भावनाही 
का कूणी येथे अजूनही बोलतो त्या माऊलीप्रत  

हे असे आहे इथे अन बोलणे ते नाही राऊ 
असूनही येथे सृजनता बोलणे नाही देव  हा 
खेळ हा आहे तयाचा मानणे नाही कठीणहि 
दृष्टीचा तो दोष आहे सांधण्याचा फक्त सूर हा 

सुमनही आहेत येथे विविधरंगी विविधगंधी 
जीवही आहेत येथे सृजनता ती नाही कैसी 
ही दिशा या तारका हा चंद्र अन तो सूर्य हि 
कोण गेले निर्मुनी ही  अद्भुता नाहीच कैसी 

नेटके  तरी सांगणे मग जन्म तुमचा जाहला ना 
कि तुम्ही त्याही गोष्टी  ठेवणे विश्वास नाही 
रागदारी गायने हि ह्या कला आल्या कूठूनश्या 
ह्या कला चौसष्ठ तरीही आमुचा विश्वास नाही 

त्या सृजनशील वल्लरीविण कोण करू जाणेल ऐसे 
नव रसाची निर्मिती अन सप्त रंगी ल्यायले जग 
सप्त पाताळें नि स्वर्गे  सप्त गंधर्वही दिधले  
सप्तसूर अन कैक गंधी खूलूनही बघ राहिले जग

मान अथवा मान नाही दे तया आहे हे निश्चित
सांग अथवा सांग नाही तो तुला देईल निश्चित 
बोल अथवा मूक संमती दे तरी आहे हे निश्चित 
सांगणे इतकेच तू  त्या नमन कर,  आहे  हे निश्चित

कवी : प्रसन्न आठवले 
१०/०७/२०१७
१०. १९  







Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...