Skip to main content

Posts

Showing posts from April, 2015

कवडसा 2

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा) काळीज सुन्न करणारा तो दिवस आयुष्यात विसरायच म्हटल तरी या जन्मी शक्य नाही. चार वर्षांपूर्विचा तो काळा दिवस दुर्दैव घेऊन आलाय हे खरच कल्पनेत सुद्धा नव्हत. का कुणास ठाऊक पण त्या दिवशी मन उगाचच बेचैन होत सकाळ पासून. आज जाणवतोय अर्थ नियतीच्या संकेताचा, कारण वातावरण सुद्धा विचित्रच होत त्या दिवशी. आणि समरच्या इछेविरुद्धच  मी त्याला शहराबाहेरुन भाजी आणि इतर खरेदी करायला पाठवल. आणि तो नाखुशीनेच बाईक घेऊन  गेला. खरतर त्याला त्या दिवशी मस्त आराम करायचा होता सुट्टी असल्यामुळे . खरच मी नाही पण काळाने त्याच ऐकल आणि . . . . . तो घरातून बाहेर गेला असेल आणि अर्ध्या तासात सर्व जग इकडच  तिकडे झाल. अचानक वीज अंगावर कोसळावी तसा तो फोन एका अज्ञात व्यक्तिचा आणि मीच फोन उचलल्यामुळे कानावर झालेला तो बातमीचा आघात माझ किंचाळण, ते ऐकून धावत आलेल्या शेजारच्या  काकू आणि त्यापुढल मन सुन्न करणार ते दृश्य........ नंतरचे दोन दिवस काय घडल काही केल्या लक्षात येत नाही. अर्थात क...

कवडसा 1

कवडसा आज बरोबर चार वर्ष झाली , ती समरच्या अपघाताची छातीचा ठोका चुकवणारी आणि काळीज सुन्न करणारी बातमी आली, जणू  संपूर्ण विश्व सभोवताली अचानक फिरतंय अस झाल आणि भूकंपाचा धक्का बसावा, तसा जाणवलेला आघात आठवला तरी थरकाप होतो. समर विश्वास , शीतल समर आणि शर्वरी एक छान त्रिकोण फक्त एका दुर्घटनेने कायमचा विखरून गेला. आणि त्याआधी नुकताच केलेला केरळ प्रवास आठवला. ते केरळ मधील मजेत  घालवलेले ते दिवस आणि त्या …………  अजूनही सर्व आताच घडलय अस वाटतंय. ते समरच्या छाती वर डोकं ठेवून शांतपणे घालवलेले सर्व दिवस, त्याचा हात हातात घेवून ते तासनतास फिरणं , किती मजेच आयुष्य होत तोपर्यंत.  का हे दुःख या जगात फक्त माझ्याच वाट्याला आल, का हे एकटेपण मलाच मिळाल एखादा हक्क मिळावा तस. वाटत कधीतरी कुणीतरी या प्रश्नाची उत्तर आपल्याला देइल. आणि आता फक्त आठवणीत जगणं  व  जगलेल्या आठवणी एवढच शिल्लक उरलय. हि चार वर्ष आणि त्या वर्षातील प्रत्येक दिवस जणू एका जन्मासारखा भासतोय आणि आपणच हे जगलोय हा  खरच भास वाटतोय. आणि एकट्या स्त्री कडे बघण्याची समाजाची दृष्टी, ती विखारी नजर अजून...

श्रद्धा

।।श्रद्धा ।। बाबांचा दरबार पाहिला|| अंधश्रद्धेचा बाजार पाहिला|| श्रद्धेला लाचार पाहिला || पैशांचा सत्कार पाहिला|| भक्त हा विनाधार पाहिला|| निचांचा अधिकार पाहिला|| सत्तेचा साक्षात्कार पाहिला|| सोन्याचा दरबार पाहिला ||

जीवन मुक्त छंद

जीवन मुक्त छंद हळूवार फुंकर घातली कि खपली काढली ते माहित नाही   पण प्रयत्न फुंकर घालण्याचाच होता ।। अनाहूत  खपली निघाली असेल या जाणीवेने काहूर माजलय  तप्त वाळूचे चटके सहन केलेल्या तुझ्या सारख्याचे मन  शीतल वर्षावात उभा असलेल्या मला कस समजणार ।। पण नकळत चूक घडली असल्यास तू नक्की पोटात घेशील हे माहित आहे  कारण अनुभवांनी तुझ्या जाणीवा प्रगल्भ आणि मन विशाल बनलय  आणि माझ्या नजरेत तू आभाळासमान आहेस ।। माझ्या अंतरात्म्याचा आवाज तुझ्या अंतरात्म्यात पोचवण्याचे साधन म्हणजे हे शरीर  या व्यतिरिक्त ते शरीर आपला वेगळा आवाज पोचवेल हे संभवणार नाही ।। सोज्वळतेच्या  मुखवट्या आडून वेगळा विचार करण  हि समाजाची रीतच  पण माझा प्रवास वेगळा असेल आणि त्यात घातपात संभवणार नाही ।। जीवन जगणे म्हणजे लहान ओढ्याचा प्रवास वादळ, उन्ह, पाऊस काही आल तरी, शांतपणे वाहात राहाणे हा एकच धर्म तो ओढा जाणतो आणि तेवढेच अपेक्षित असत ।। मनाचही तसच आहे सर्व साक्षित्वाने पाहात जीवन  प्रवास  संथ पणे सुरु ठेवणे  मागे जाणाऱ्य...

मित्र

मित्र  खोल अर्थ असलेल्या अश्या शब्दाची पोकळ व्याख्या करणं इतक्या वर्षात  जमल नाही आणि म्हणून काही लिहिल नाही. पण आज त्याचा खोलवर दडलेला अर्थ उमगल्यावर लिहिण्यावाचून थांबू शकलो नाही आणि म्हणून हा खटाटोप.  मित्र हा खरच कसा असू शकतो त्याची व्याख्या अनेकांनी त्यांच्या परीने केलेली आहे. पण माझ्या दृष्टीने तो निरागस , निरलस, हृदयाच्या सर्वात आत असल्यामुळे, आतला आवाज ऐकू शकणारा, तुम्हाला समजून वागणारा, प्रसंगी तुम्हाला दटावणारा   असा असावा. काळाच्या कसोटीवर टिकणारी मैत्री कशी असू शकते हे आज पर्यंत कधी समजलच नाही पण समजायला लागल्यापासून आज प्रथम त्याचा अर्थ उमगला, कि अशी मैत्री एका विशिष्ट शब्दात बसवता येणार नाही. पण आज त्याचा अर्थ हृदयाला भिडलाय आणि बुद्धीलाही पटलाय. कारण असा एक मित्र मला मिळालाय. ज्याच हृद्यय  सश्यासारख मऊ , काळीज कापसासारखा मुलायम, मन स्फटिकासारख अंतर्बाह्य स्वच्छ आणि चुकांची कबुली देऊनही विसरण्याइतक मोठ , बुद्धी अजूनही न कोमेजलेली , जाणीवा प्रगल्भ, विचारांची खोली प्रचंड , स्वतः दुखः भोगूनही मन मान्सरोवरा सारख शांत.  अश्या ह्या म...

।।श्री हनुमान विजय स्त्रोत्र ।।

।।श्री हनुमान विजय स्त्रोत्र  ।। हनुमंते, बलावन्ते, बुद्धीवन्ते, गरुडासमेत महाविष्णू समीप, रक्षिते जगत्पिता ।। महाविष्णू विराजिते तस्य र्हुदयस्य मध्ये ।। सुमधुर भाषीते, श्रीराम भक्त, भजते तस्य दैवत, चतुर, वंदी चरण जानकी माते ।। महारुद्र, महेशस्य अवतार:, वज्रबाहू, सूक्ष्मरूपे अतिम्हाकाय रूपे क्षणमात्रे परिवर्तते ।। अतिबलवान, चपळ, मनोवेगे कार्याकृते, द्रोणागिरी पर्वते स्कन्धे लंके निवर्तते ।। लक्ष्मणस्य तारणहार, कालस्य काल: ।। कालीयुगस्य त्राता, मानवस्य उद्धारकर्ता, भक्तस्य इच्छा वायुवेगे तृप्ते कृते ।। इंद्रिये जीत:, वासना भक्तीरूपे परिवर्तते, शटरिपू  काल:,  रामायणस्य आधार: ।। मद्भक्ती स्वीकृत कारीश्यते, मम जन्म कृतकृत्य भवेत इति अशिर्वच वदेतम ।। मम आत्मा तृप्त तस्य दर्शन मात्रे, क्षणैक प्राप्नूत:, मम हृदयस्य शांती, तृषातृप्ती, आनंदमय करिष्ये ।। ।।इति इच्छाम ।।