Skip to main content

Posts

Showing posts from March, 2025

कालाय तस्मै नमः ३

कालाय तस्मै नमः ३ ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.   ९. या सर्वात ईश्वराने दिलेली सर्वोच्च देणगी म्हणजे मन. कारण हे मनच माणसाला त्याच्यातील प्राणी या संकल्पने पासून वेगळं करतं. हे मन माणसाला , त्या उच्च कार्यासाठी विचार प्रवृत्त, सक्षम आणि साधक बनवतं. १०. याच मनात देहाशी तादात्म्य पावणारी भावोत्कट वृत्ती, भौतिकता आणि देहापासून परावृत्त होऊन देवापर्यंत जाण्याची साधू वृत्ती मिळवून देते. त्यासाठी या मनाला चिंतनासाठी प्रवृत्त करावं लागतं.  ११. म्हणजेच प्रवृत, आवृत्त, परावृत्त अशा वृत्तीच्या सर्व अवस्था याच मनाच्या माध्यमातून आत्मा साधू शकतो. त्यातच भगवंतांनी स्वतः, आपलं अस्तित्व सांगताना म्हटलं आहे की, इंद्रियांमधे मी मन आहे.  १२. जरी आपण या देहाला संगणक किंवा भ्रमणध्वनी स्वरूप मानलं, तरीही या उपकरणांमध्ये नसलेली, self realisation and self upgradation ची किमया आणि गुणवत्ता, या मन असलेल्या देहात विधात्याने भरून ठेवली आहे.  १३. याच गुणवत्तेला ओळखून, तिला तावून, सुलाखून पुढील मार्गासाठी घेऊन जाणं, हीच प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक जन्माची इतिकर्तव्यता आहे....

कालाय तस्मै नमः २

कालाय तस्मै नमः २ ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले.  मागील लेखातील एक एक उदाहरण पुढे नेऊ. गोलाकार संरचना काळाची सुद्धा असणार, हे आपण सोदाहरण मागील लेखात जाणलं. मुळात या विश्वातील किंवा आपल्या सूर्य मंडळातील सर्व ग्रह वर्तुळाकारच आहेत. कोणत्याही ग्रहाबद्दल कोणतीही शंका किंवा विपरीत माहिती किंवा पुरावा नाही. या गोल आकाराचं इतकं महत्व किंवा मांडणी मी करत आहे कारण, जर काही विशिष्ट कालावधीत कोणत्याही गोष्टीची, गणितीय सूत्राने पुनरावृत्ती घडवायची असेल तर, गोलाकार रचना हेच एकमेव उत्तम परिमाण आहे.  याचा अजून एक अर्थ असा निघतो की, विधाता किंवा नियंता हा किती मोठा गणितज्ञ, खगोलशास्त्री, वैज्ञानिक, तत्ववेत्ता आणि सर्वज्ञ असला पाहिजे. त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, सर्वकाही वर्तुळाकार रचनेत मांडणारा निर्माता, काळ निर्मिती करताना काही चूक करेल हे संभवत नाही. म्हणजेच काळाची रचना सुद्धा वर्तुळाकार आहे, हा निष्कर्ष आपण काढू शकतो.  पण जितकं आकर्षण, कुतूहल, गूढ, उत्सुकता काळ या एका शब्दाबद्दल आहे, तितके क्वचितच कोणत्या शब्दाबद्दल असेल. अर्थात यालाच जोडून येणारा दुसरा भाग म्...

कालाय तस्मै नमः १

कालाय तस्मै नमः १  ©® संकल्पना, मांडणी आणि विचार: प्रसन्न आठवले. सद्गुरू श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने ही एक नवीन लेखमाला लिहायची प्रेरणा प्राप्त होत आहे. यामध्ये विषयाच्या ओघात काय काय येईल, हे फक्त माझे सद्गुरू जाणतात. त्यामुळे जे प्राप्त होईल ते मांडणं, इतकंच माझं काम आहे. ते काम निमूटपणे, प्रामाणिकपणे आणि भक्तिपूर्ण अंतःकरणाने करणं हा माझा धर्म असेल. म्हणून प्रेरणा सद्गुरूंची आणि लेखणी माझी. असो. आज आपण विषयाची ओळख करून घेऊया.  काळाचा महिमा अपरंपार आहे. तो वेद, उपनिषद्, श्रुती, स्मृती, पुराणं, धर्मग्रंथं, संत महंत, लेखक, कवी यांनी अनेक प्रकारे आणि अनेक पद्धतीने मांडला आहे. हा एक असा विषय आहे, जो देह समाप्ती नंतरच अनुभवता येतो आणि एकदा अनुभव घेतला तरी मागे येऊन जगाला सांगता येत नाही. संत महंत, ज्ञानीजन यांनी जे लिहिलं आहे किंवा जे काही आपल्याला अनेक ठिकाणांहून माहीत झालेलं आहे, ते प्रत्यक्षाच्या अत्यल्प प्रमाणात आहे आणि ते त्यांच्या अंतःप्रेरणेचा भाग आहे.  त्याला जाणण्याचा प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळणं हे महद् भाग्य आहे. याआधी ज्यांना ज्यांना अशी प्...