Skip to main content

मनाचिये गुंती, जाणिवांच्या जागृती -१

मनाचिये गुंती, जाणिवांच्या जागृती -१

माणसाचं संपूर्ण आयुष्य, कर्म, फल आणि सर्व व्यवहार हे, मन बुद्धी आणि देहाची वासना ठरवतात. त्यातही सर्वात श्रेष्ठ आणि अग्रस्थानी म्हणजेच नेतृत्व मनच करतं. कारण तोच ड्रायव्हिंग फोर्स असतो, प्रत्येक निर्णयात बुद्धी व देह यांना कार्याला जंपणारा. 

म्हणजे मन हे इंद्रिय किती महत्वाचं आहे. याबद्दल अनेकांनी लिहून झालंय. पंचमहाभूत स्वरूपात तत्वांचं देहातील प्रतिनिधित्व बघितलं, तर मन हे आकाश स्वरूप असतं. म्हणजे आकाशाला कसं वारा इकडून तिकडे नेतो. उष्णता एखाद्या भागात जास्त वाढली की, त्याचा ताळमेळ राखायला सृष्टी कर्त्याने अशी व्यवस्थाच निर्माण करून ठेवली आहे की, 

त्या ठिकाणी मेघ पाठवून, वातावरण आल्हाददायक करायचं. म्हणजेच जिथे ज्या गोष्टीची कमतरता असेल, तिथे ती गोष्ट पाठवायची आणि जगण्याचं संतुलन आणि ताळमेळ राखायचा. याचाच अर्थ निसर्गाने मूलतः नियम असा केला आहे की, ज्या गोष्टी जिथे गरजेच्या आहेत तिथे त्या निसर्गाला जितकं शक्य आहे तितकं पाठवून, सुव्यवस्था राखणं.

मनाच्या बाबत असं घडतं का याबाबत विचार करताना, हे लक्षात येईल की, ज्यावेळी मनात काही आंदोलन होत असतं किंवा मन ज्यावेळी अस्वस्थ असतं अथवा मनाला ज्यावेळी मरगळ येते वा मन ज्यावेळी अशांत असतं, त्यावेळी काही ना काही गोष्टी सकारात्मक घडतात आणि मनाला जरासं हलकं वाटतं. 

पण यात एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, निसर्गाला नियम निर्माण करवून, संतुलन राखावं लागतं. पण माणसाच्या मनाला स्वयंचलित, अर्थात एक Natural Intelligence प्रदान करून, विचारपूर्वक चिंतन करण्याची सोय विधात्याने, करून ठेवलेली आहे. म्हणजे निसर्गतः माणसाच्या मनाला प्रत्येक प्रसंगी अंतर्मुख होऊन, सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून, मगच निर्णय घेण्याची, मुभा, स्वातंत्र्य, क्षमता, पात्रता दिली आहे. 

माणसाच्या मनावर अनेक प्रकारचे दाब दबाव आले तरीही, त्याने दबून न जाता चिंतनपूर्वक आपल्या क्षमतेने, पात्रतेने निर्णय घेऊन मगच अंमलबजावणी करता येऊ शकते. पण याची जाणीव त्या त्यावेळी जागृत असणं, अत्यंत आवश्यक आणि महत्वाचं आहे. पण या जाणीवा काही सहजी जागृत नसतात. त्या प्रासंगिक दबावाने झाकलेल्या, झुकलेल्या आणि झोपलेल्या असतात. 

यावर पुढच्या लेखात अधिक चिंतन करूया.

©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले 
9049353809
9969762179
१९/१०/२०२४

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...