Skip to main content

Posts

Showing posts from November, 2023

#आत्मचिंतन_बोध भाग १०

#आत्मचिंतन_बोध भाग १० ©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले एका देहात स्थित झालेला हा आत्मा, सहसा, देह सोडून जाण्यास तयार नसतो. किंबहुना कोणताही जीव, अश्या तयारीत सहसा नसतो. त्याला त्या देहातून बाहेर काढणं, ही देखील एक मोठी जिकिरीची प्रक्रिया आहे. याचसाठी मृत्यू या व्यवस्थेची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. एका भुलोकी, (कदाचित या ब्रम्हांडात अनेक भुलोक आणि इतर सप्त लोक असू शकतील), करोडो देहातील एका देहात असलेला आत्मा, काढून न्यायचा. त्याचा हिशोब करायचा आणि त्याला पुन्हा दुसऱ्या देहात, जन्मात, जाण्यासाठी, नेऊन त्या त्या लोकात स्थापित करायचा.ही सर्व व्यवस्था, शतका नुशतके, युगानुयुगे सुरळीत, नियमबद्ध रीतीने सुरू आहे. हाच एक अद्भुत चमत्कार आहे. अगदी संगणकीय भाषेत सांगायचं तर, कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या व्यवस्थे प्रमाणे, सुरू आहे. या सर्व विवेचना वरून, लक्षात आलं असेल की, आपण इथे बसून फक्त या देहात असलेल्या भोग व उपभोग या चक्राचा, स्वतःच्या भाग्य दुर्भाग्य, दुर्दैव याचा विचार करण्यात मग्न असतो.  पण हे करताना, आपण, आपल्याच या आणि पुढील जन्मांची व्यवस्था सुरळीत करतो, की, त्याला अजून समस्येत...

#आत्मचिंतन_बोध भाग ९

#आत्मचिंतन_बोध भाग ९ कालच्या भागात आपण पाहिलं की आत्म्याचा श्वासांचा हिशोब संपला की एक श्वास देखील, अतिरिक्त, आत्मा त्या देहात थांबत नाही. थांबू दिला जात नाही. कारण त्या गणितावर, पुढची अनेक गणितं अवलंबून असतात. खूप क्लिष्ट नाही पण थोडं किचकट आहे.बघुया. या जन्मा तील मृत्यूनंतर, त्या आत्म्याचा प्रवास, जो त्याच्या कर्म फलाने ठरलेला आहे किंवा त्या आत्म्याने ठरवला आहे, तो पुढे नेण्याची मोठी जबाबदारी काळ पुरूष,यम, मृत्यूची व्यवस्था, या सर्वांवर सोपवलेली असते.  त्यात कसूर होऊन चालत नाही. कारण त्या आत्म्याचा पुढील जन्म, त्या जन्मातील, अनेक भोग उपभोग, कर्म फल, त्या आत्म्याशी निगडित सर्व आणि सर्वांचे त्या जन्मातील व्यवहार, हे त्या आत्म्याच्या या देहातील गमनावर अवलंबून असतात. म्हणजे एकाचं गणित चुकलं की, त्यावर अवलंबून कितीतरी गणितं चुकू शकतात. बरं ही पुढची गणितं एकाच नव्हे तर पुढील कित्येक जन्मातील, चुकणार. म्हणजे अनेकांच्या त्या आत्म्यासंबंधी कर्म करार चुकू शकतात.  कर्म करार, नवीन वाटला शब्द तरीही त्याचा अर्थ खूप सखोल आहे. तो अर्थ नंतर पाहू, पण पुन्हा मुद्यावर चर्चा करूया. म्हणजे किती ब...

#आत्मचिंतन_बोध भाग ८

#आत्मचिंतन_बोध भाग ८ भुलोकि जे नियम आहेत आणि जे काल पाहिले, ते खालीलप्रमाणे :  १. कर्मसिद्धांत.  २. इथलं कर्म इथेच फलित. ३. फलरहित कर्म नाही. चवथा नियम म्हणजे, जितके श्वास आहेत तितकं जगण्याचं बंधन आहे. म्हणजे जितक्या श्वासात आयुष्य लिहिलेलं आहे, ते आपल्याला जगूनच संपवणे क्रमप्राप्त आहे. याचे दोन अर्थ होतात, दोन्ही पाहूया. एक म्हणजे आपलं आयुष्य हे श्र्वासांचं आहे. याचं कारण म्हणजे, कालगणना हा मानवाने, या भूलोकात विकसित केलेला, या भुलोका साठीचा,गणिती प्रकार आहे. तो वेदकाळा पासून सुरू झाला असावा. पण हे ब्रम्हांड तयार केलं, त्यावेळी कालगणना ही श्र्वासांच्या लहरी किंवा कंपन यावर गणलं गेलं आहे. देहासाठीची ही मापन पद्धती, फक्त या मृत्युलोकासाठी आहे, हे देखील पाचवा नियम म्हणून लिहून घ्या.  ती मूळ सुरुवात किंवा मापन पद्धती आहे,जी विधात्याची उपलब्धी आहे. त्याच्या लेखी व त्यांच्या हिशोबात, आपलं आयुष्य, याच मापन पद्धतीने मोजलं जातं.म्हणजेच आपण मृत्यू पश्चात त्याच्या विशिष्ट व्यवस्थेपुढे जाऊ किंवा जातो, तेंव्हा तिथे आपला हिशोब श्वासांच्या आधारे किती झाला, याचा ताळेबंद काढला जातो. यातू...