#आत्मचिंतन_बोध भाग १० ©® संकल्पना आणि लेखन: प्रसन्न आठवले एका देहात स्थित झालेला हा आत्मा, सहसा, देह सोडून जाण्यास तयार नसतो. किंबहुना कोणताही जीव, अश्या तयारीत सहसा नसतो. त्याला त्या देहातून बाहेर काढणं, ही देखील एक मोठी जिकिरीची प्रक्रिया आहे. याचसाठी मृत्यू या व्यवस्थेची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. एका भुलोकी, (कदाचित या ब्रम्हांडात अनेक भुलोक आणि इतर सप्त लोक असू शकतील), करोडो देहातील एका देहात असलेला आत्मा, काढून न्यायचा. त्याचा हिशोब करायचा आणि त्याला पुन्हा दुसऱ्या देहात, जन्मात, जाण्यासाठी, नेऊन त्या त्या लोकात स्थापित करायचा.ही सर्व व्यवस्था, शतका नुशतके, युगानुयुगे सुरळीत, नियमबद्ध रीतीने सुरू आहे. हाच एक अद्भुत चमत्कार आहे. अगदी संगणकीय भाषेत सांगायचं तर, कृत्रिम बुध्दिमत्ता असलेल्या व्यवस्थे प्रमाणे, सुरू आहे. या सर्व विवेचना वरून, लक्षात आलं असेल की, आपण इथे बसून फक्त या देहात असलेल्या भोग व उपभोग या चक्राचा, स्वतःच्या भाग्य दुर्भाग्य, दुर्दैव याचा विचार करण्यात मग्न असतो. पण हे करताना, आपण, आपल्याच या आणि पुढील जन्मांची व्यवस्था सुरळीत करतो, की, त्याला अजून समस्येत...