Skip to main content

उमलत्या जाणिवा



उमलत्या जाणिवा 

आंम्ही रडून स्वतःचे जग निर्माण करण बंद करायचं ठरवलंय 
उधळून द्यायचं ठरवलेत पुष्पगुच्छ खोट्या आश्वासक स्तुतीचे 
बाद केलेत  विरोध होणाऱ्या आमच्या जाणिवाना मुद्दाम 
आणि मुद्द्याची लढाई वेळ प्रसंगी गुद्द्यानी लढायचं ठरवलंय 
अनेक प्रश्न हाताळू शकणार आमचं डोकं नेमकं त्याच वेळी 
का बंद पडत हा विचार करायचा आणि भूल सुधारायची 
उगाच उसंत नाही द्यायची वाऱ्याला सुद्धा फिकीर करायची आमची 
वागणंच जर सुधारायचं तर ते दोन्ही बाजूनेच व्हाव हे आता पक्क 
अन्यथा वाट शोधा आपली जग आहे खूप मोठं मुद्दाम जरी 
फिरायचं ठरवलं तरी शुद्ध मिळतील आमच्या जाणिवाना आकाश नवं 
म्हणूनच सुमार आयुष्य झोकून द्यायचं ठरवलंय आणि ठरवलंय 
नवीन जगात नवे पंख मिळतील जाणिवांना तिथे विहारायच 
मजेत भराऱ्या घ्यायच्या निर्भेळ सुख जिथं मिळेल तिथे. 
  
                                                  कवी : प्रसन्न आठवले 

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...