उमलत्या जाणिवा
आंम्ही रडून स्वतःचे जग निर्माण करण बंद करायचं ठरवलंय
उधळून द्यायचं ठरवलेत पुष्पगुच्छ खोट्या आश्वासक स्तुतीचे
बाद केलेत विरोध होणाऱ्या आमच्या जाणिवाना मुद्दाम
आणि मुद्द्याची लढाई वेळ प्रसंगी गुद्द्यानी लढायचं ठरवलंय
अनेक प्रश्न हाताळू शकणार आमचं डोकं नेमकं त्याच वेळी
का बंद पडत हा विचार करायचा आणि भूल सुधारायची
उगाच उसंत नाही द्यायची वाऱ्याला सुद्धा फिकीर करायची आमची
वागणंच जर सुधारायचं तर ते दोन्ही बाजूनेच व्हाव हे आता पक्क
अन्यथा वाट शोधा आपली जग आहे खूप मोठं मुद्दाम जरी
फिरायचं ठरवलं तरी शुद्ध मिळतील आमच्या जाणिवाना आकाश नवं
म्हणूनच सुमार आयुष्य झोकून द्यायचं ठरवलंय आणि ठरवलंय
नवीन जगात नवे पंख मिळतील जाणिवांना तिथे विहारायच
मजेत भराऱ्या घ्यायच्या निर्भेळ सुख जिथं मिळेल तिथे.
कवी : प्रसन्न आठवले
Comments
Post a Comment